उत्तरपत्रिका चोरीनंतर बोर्डाचे स्पष्टीकरण, चौकशीसाठी समिती
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
दहिसर येथील इस्रा शाळेतून झालेल्या दहावीच्या ५१६ उत्तरपत्रिकांच्या चोरीप्रकरणी बोर्डाची संपूर्ण मदार ही पोलिस तपासावर अवलंबून आहे. शाळेतील अंतर्गत वादातून ही चोरी झाल्याचा संशय बोर्डाकडून बुधवारी पुन्हा वर्तविण्यात आला. याप्रकरणी अधिक तपासासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले. या प्रकरणी कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी बोर्डाकडून घेतली जाईल, त्यामुळे विद्यार्थी पालकांनी चिंता न करण्याचे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले.
दहिसरच्या इस्त्रा पेपर चोरीप्रकरणी दहिसर पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांची चौकशी सुरू केली आहे. या प्रश्नपत्रिका कशा चोरीला गेल्या, यामागे कोण आहे, याबाबतही माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. वेळ पडल्यास बोर्डाच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल. - सुभाष सावंत,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दहिसर
गोपनीय पद्धत नियमानुसारच ?
दहावी उत्तरपत्रिका चोरीच्या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका सध्या बोर्डाच्या कार्यालयात पार पडल्या आहेत. त्यानुसार या विद्यार्थ्यांना जर गुण देण्याची वेळ आल्यास त्यासाठी बोर्डाच्या नियामवलीनुसारच त्यांना गुण दिले जातील, या प्रक्रियेत कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेण्यात येत असल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
दहिसर येथील इस्रा शाळेतून झालेल्या दहावीच्या ५१६ उत्तरपत्रिकांच्या चोरीप्रकरणी बोर्डाची संपूर्ण मदार ही पोलिस तपासावर अवलंबून आहे. शाळेतील अंतर्गत वादातून ही चोरी झाल्याचा संशय बोर्डाकडून बुधवारी पुन्हा वर्तविण्यात आला. याप्रकरणी अधिक तपासासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले. या प्रकरणी कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी बोर्डाकडून घेतली जाईल, त्यामुळे विद्यार्थी पालकांनी चिंता न करण्याचे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले.
दहिसरच्या इस्त्रा पेपर चोरीप्रकरणी दहिसर पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांची चौकशी सुरू केली आहे. या प्रश्नपत्रिका कशा चोरीला गेल्या, यामागे कोण आहे, याबाबतही माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. वेळ पडल्यास बोर्डाच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल. - सुभाष सावंत,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दहिसर
गोपनीय पद्धत नियमानुसारच ?
दहावी उत्तरपत्रिका चोरीच्या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका सध्या बोर्डाच्या कार्यालयात पार पडल्या आहेत. त्यानुसार या विद्यार्थ्यांना जर गुण देण्याची वेळ आल्यास त्यासाठी बोर्डाच्या नियामवलीनुसारच त्यांना गुण दिले जातील, या प्रक्रियेत कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेण्यात येत असल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.