अ‍ॅपशहर

मुंबई अलर्टवर! ललित हॉटेलला उडवून देण्याची धमकी, ४ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती...

Threat of Terrorist Attack in Mumbai: गेल्या काही दिवसांआधी मुंबईला उडवून देण्यासाठी पाकिस्तानातून थेट पोलिसांच्या व्हॉट्सअॅवर २६ मेसेज आले होते. त्यानंतर आता पुन्हा हॉटेल उडवण्याची धमकी देण्यात आल्याने मुंबई सुरक्षित राहिली का? असाच प्रश्न विचारण्यात येत आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Aug 2022, 11:44 am
मुंबई : मुंबईला दहशतवादी हल्ला करत उडवून देण्याची धमकी आल्यानंतर आता पुन्हा एका धमकीच्या फोनने मुंबई अलर्टवर गेली आहे. मुंबईतील ललित होटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवार संध्याकाळी फोन करून ही धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Threat of Terrorist Attack in Mumbai


मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञाताने ललित हॉटेलमध्ये फोन करून पैशांची खंडणी मागितली. यामध्ये त्याने तब्बल ५ कोटींची खंडणी मागितली आहे. हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचं सांगितलं. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून फोन कोणी केला याचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.

Terror Attack Threat: मुंबई उडवण्याची धमकी देणाऱ्या नंबरवर रिपोर्टरने केला फोन; पाकिस्तानात माळीला लागला...

फोन केलेल्या व्यक्तीने हॉटेलमध्ये ४ ठिकाणी बॉम्ब ठेवला असल्याचं सांगितलं. खंडणी न मिळाल्यास हॉटेल उडवून देऊ अशी धमकी त्याने दिली. यानंतर हॉटेलमध्ये एकच धावपळ पाहायला मिळाली. तातडीने संपूर्ण सुरक्षा यंत्रणाकडून हॉटेलची झडती घेतली असता कुठेही बॉम्ब आढळून आला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये झडती घेतली असता बॉम्ब सापडला नाही आणि तो फेक कॉल होता, अशी पुष्टी पोलिसांनी केली आहे तर सध्या धमकी देणाऱ्या कॉलरचा शोध घेतला जात आहे. काही अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून मुंबईतील ललित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ६ वाजता अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले.

मुंबईला उडवण्याच्या धमकीनंतर पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई, विरारमधून एकाला अटक

बॉम्बचा स्फोट होऊ नये यासाठी फोन करणाऱ्याने हॉटेल प्रशासनाकडे ५ कोटी रुपये मागितले. हॉटेलने ही माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी सर्वत्र तपास केला. मात्र, पोलिसांना काहीही सापडले नाही, त्यानंतर सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३८५, ३३६, ५०७ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख