म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या कारणांवरून तिघांची हत्या करण्यात आली. यात वांद्रे व मालाडमध्ये दोन महिला आणि गोरेगावमधील एका तरुणाच्या हत्येचा समावेश आहे.
गोरेगाव पूर्वेला राहणाऱ्या निलेश गावस्कर आणि सुनील पाटील यांच्यात पैशावरून वाद होता. दोघांमधील या वादातूनच पाटीलने गावस्करची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.
वांद्रे पूर्वेतील भारतनगरमधील टाटा वसाहतीत मुमताज (५०) हिची हत्या करण्यात आली. तिच्या हल्लेखोराचा शोध वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस ठाण्याकडून घेतला जात आहे, तर मालाड पूर्वेतील सेंट जोसेफ शाळेजवळ शालूबाई जगदाळे (४८) या महिलेची हत्या दिगंबर खिलारे याने केली. दारू पिण्याच्या वादातून ही हत्या झाली असून, दिंडोशी पोलिसांनी खिलारेला अटक केली आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या कारणांवरून तिघांची हत्या करण्यात आली. यात वांद्रे व मालाडमध्ये दोन महिला आणि गोरेगावमधील एका तरुणाच्या हत्येचा समावेश आहे.
गोरेगाव पूर्वेला राहणाऱ्या निलेश गावस्कर आणि सुनील पाटील यांच्यात पैशावरून वाद होता. दोघांमधील या वादातूनच पाटीलने गावस्करची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.
वांद्रे पूर्वेतील भारतनगरमधील टाटा वसाहतीत मुमताज (५०) हिची हत्या करण्यात आली. तिच्या हल्लेखोराचा शोध वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस ठाण्याकडून घेतला जात आहे, तर मालाड पूर्वेतील सेंट जोसेफ शाळेजवळ शालूबाई जगदाळे (४८) या महिलेची हत्या दिगंबर खिलारे याने केली. दारू पिण्याच्या वादातून ही हत्या झाली असून, दिंडोशी पोलिसांनी खिलारेला अटक केली आहे.