अ‍ॅपशहर

पावसाच्या सरींसोबत तापाचा जोर

पावसाच्या सरींसोबत संसर्गजन्य तापाचा त्रासही मुंबईकरांना जाणवू लागला आहे. वातावरणामध्ये झालेल्या बदलांमुळे व्हायरल तापाचा जोर वाढू लागला आहे.

Maharashtra Times 8 Jun 2018, 4:00 am
मुंबई: पावसाच्या सरींसोबत संसर्गजन्य तापाचा त्रासही मुंबईकरांना जाणवू लागला आहे. वातावरणामध्ये झालेल्या बदलांमुळे व्हायरल तापाचा जोर वाढू लागला आहे. उकाडा संपून पावसाच्या सरींचा शिडकावा सुरू झाल्यामुळे वातावरणामध्ये बदल झाला आहे. संसर्गजन्य तापासाठी असे वातावरण पोषक असते. आहारामध्ये, सवयीमध्ये आणि पाण्यामध्येही फरक पडल्याने तापाचा जोर अजून वाढतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thunderstorms with rain shaws
पावसाच्या सरींसोबत तापाचा जोर


अंगदुखी, डोकेदुखी, काही तासांनी ताप येणे, सर्दी खोकला, पाय दुखणे अशी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे मुंबईकरांमध्ये दिसू लागली आहेत.

संसर्गजन्य तापाचे निदान व्हावे यासाठी निदान चाचण्यांची मदत घेऊनही तापाची कारणे निष्पन्न होत नाही. मलेरिया, डेंग्यू वा इतर तापांप्रमाणे संसर्गजन्य तापाचे निदान तपासण्यामध्ये लगेच होत नाही. ठराविक मुदतीच्या या तापाचा जोर काही ठराविक दिवसांनी कमी होतो. पावसाची सुरुवात होत असताना, यंदाही संसर्गजन्य तापाच्या साथीची सुरुवात झाल्याचे दिसत आहे, अशी माहिती डॉ. सुहास पिंगळे यांनी दिली.

ही काळजी घ्या!

- उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नका.

- उकळलेले पाणी प्या.

- स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा.

- औषधे स्वतःच्या मनाने घेऊ नका.

- डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स अर्धवट सोडू नका.

- शिळे, आंबट, फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खाऊ नका.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज