म. टा. प्रतिनिधी, मुंबई
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत (टीस) गेल्या बुधवारपासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आता अधिक तीव्र करण्याचा निर्धार मंगळवारी विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केला. विद्यार्थी संघटनांनी पुकारलेले चक्का जाम आंदोलन स्थानिकांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आले खरे; मात्र, याच दरम्यान प्रशासनाने विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीसंदर्भात दिलेला प्रस्ताव नाकारल्याने येत्या काळात हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केंद्र सरकारतर्फे शिष्यवृत्तीपोटी देण्यात येणारा निधी बंद करण्यात आल्याने गेल्या बुधवारपासून विद्यार्थ्यांनी 'टीस'च्या चेंबूर कॅम्पस येथे आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी, विद्यार्थ्यांनी कॅम्पसच्या प्रवेशद्वारासमोर चक्का जाम करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनामुळे स्थानिकांना आत बाहेर ये-जा करण्यास अडथळे निर्माण झाल्याने रहिवाशांनी थेट 'टीस' प्रशासनाकडे तक्रार केली. याची दखल घेत प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांनी चक्का जाम आंदोलन मागे घेतले. पण, 'टीस'च्या कर्मचाऱ्यांना प्रवेश रोखण्याचा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतल्याने स्थिती तणावपूर्ण झाली होती.
नंतर 'टीस' प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भात एक प्रस्ताव विद्यार्थ्यांपुढे मांडला. मात्र, त्याने विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थी संघटनांनी जाहीर केले. या प्रस्तावात प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शुल्क प्रलंबित असतानाही परीक्षेला बसण्याचा पर्याय व निकालपत्र देण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली. सोबतच संबंधित विद्यार्थ्यांना वसतीगृह शुल्कातून मुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते. येथील उपहारगृहातील शुल्कही नोकरी लागल्यानंतर किंवा शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर देण्याचा पर्याय प्रशासनाने सुचविला होता.
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत (टीस) गेल्या बुधवारपासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आता अधिक तीव्र करण्याचा निर्धार मंगळवारी विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केला. विद्यार्थी संघटनांनी पुकारलेले चक्का जाम आंदोलन स्थानिकांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आले खरे; मात्र, याच दरम्यान प्रशासनाने विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीसंदर्भात दिलेला प्रस्ताव नाकारल्याने येत्या काळात हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केंद्र सरकारतर्फे शिष्यवृत्तीपोटी देण्यात येणारा निधी बंद करण्यात आल्याने गेल्या बुधवारपासून विद्यार्थ्यांनी 'टीस'च्या चेंबूर कॅम्पस येथे आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी, विद्यार्थ्यांनी कॅम्पसच्या प्रवेशद्वारासमोर चक्का जाम करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनामुळे स्थानिकांना आत बाहेर ये-जा करण्यास अडथळे निर्माण झाल्याने रहिवाशांनी थेट 'टीस' प्रशासनाकडे तक्रार केली. याची दखल घेत प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांनी चक्का जाम आंदोलन मागे घेतले. पण, 'टीस'च्या कर्मचाऱ्यांना प्रवेश रोखण्याचा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतल्याने स्थिती तणावपूर्ण झाली होती.
नंतर 'टीस' प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भात एक प्रस्ताव विद्यार्थ्यांपुढे मांडला. मात्र, त्याने विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थी संघटनांनी जाहीर केले. या प्रस्तावात प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शुल्क प्रलंबित असतानाही परीक्षेला बसण्याचा पर्याय व निकालपत्र देण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली. सोबतच संबंधित विद्यार्थ्यांना वसतीगृह शुल्कातून मुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते. येथील उपहारगृहातील शुल्कही नोकरी लागल्यानंतर किंवा शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर देण्याचा पर्याय प्रशासनाने सुचविला होता.