खासगीकरण व व्यापारीकरणामुळे सध्याचे शिक्षण दुर्बल घटकातील मुलांसाठी सोडाच, पण बऱ्यापैकी सांपत्तिक स्थिती असलेल्या कुटुंबासाठीही महागडे झाले आहे. आपल्या देशातील जातीभेद, लिंगभेद, धर्मभेद, ग्रामीण-शहरी भेद आणि सर्व प्रकारच्या घटकांमध्ये असलेले दारिद्र्य लक्षात घेता, स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, शिक्षणाचे सार्वत्रीकरण होऊन ते सक्तीचे झाले, तरीही दुर्बल घटकातील गुणी व बुद्धिमान मुलांना शिक्षणाचा लाभ घेता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. सुजाण, समंजस व प्रगल्भ नागरिक होण्यासाठी औपचारिक शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
आपल्या देशात दानाची परंपरा आहे. त्यातही विद्यादान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. ज्ञानाचा मर्यादित अर्थ 'शिक्षण' असा घेतला, तर असे शिक्षण आज व्यक्तिगत तसेच सार्वजनिक जीवनातही महत्त्वाचे झाले आहे. व्यक्तिगत जीवनात भौतिकदृष्ट्या संपन्न व सांस्कृतिक तसेच सामाजिकदृष्ट्या किमान समंजस जीवन जगण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर 'मटा'चा 'बळ हवे पंखांना' उपक्रम हा बिकट आर्थिक परिस्थतीमुळे उच्च शिक्षणापर्यंत झेप न घेता येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांना खरोखरच बळ देणारा आहे. हा उपक्रम गेली अनेक वर्ष ज्या जोमाने व निष्ठेने सुरू आहे, त्याबद्दल कौतुक करण्यास शब्द अपुरे आहेत. पैशाअभावी ज्या मुलांचे शिक्षण खंडित होत आहे, अशा मुलांना 'मटा'ने एक नवी उमेद दिली आहे. दरवर्षी अधिकाधिक मुलांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'मटा'चे वाचक आणि या राज्यातील लोकांनीही 'मटा'वर जो विश्वास दाखवला आहे, त्यातच या उपक्रमाचे यश दिसून येते.
या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे. वंचित मुलांना सहकार्याचा हात देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असे समजावे.
'मटा हेल्पलाइन' या विद्यार्थी-वाचक उपक्रमाचे यंदाचे अकरावे वर्ष. या उपक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून पाठिंबा दिला आहे. गरजू मुलांना शैक्षणिक मदतीचा हात देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असे ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले.
- डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ अर्थतज्ञ
आपल्या देशात दानाची परंपरा आहे. त्यातही विद्यादान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. ज्ञानाचा मर्यादित अर्थ 'शिक्षण' असा घेतला, तर असे शिक्षण आज व्यक्तिगत तसेच सार्वजनिक जीवनातही महत्त्वाचे झाले आहे. व्यक्तिगत जीवनात भौतिकदृष्ट्या संपन्न व सांस्कृतिक तसेच सामाजिकदृष्ट्या किमान समंजस जीवन जगण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर 'मटा'चा 'बळ हवे पंखांना' उपक्रम हा बिकट आर्थिक परिस्थतीमुळे उच्च शिक्षणापर्यंत झेप न घेता येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांना खरोखरच बळ देणारा आहे. हा उपक्रम गेली अनेक वर्ष ज्या जोमाने व निष्ठेने सुरू आहे, त्याबद्दल कौतुक करण्यास शब्द अपुरे आहेत. पैशाअभावी ज्या मुलांचे शिक्षण खंडित होत आहे, अशा मुलांना 'मटा'ने एक नवी उमेद दिली आहे. दरवर्षी अधिकाधिक मुलांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'मटा'चे वाचक आणि या राज्यातील लोकांनीही 'मटा'वर जो विश्वास दाखवला आहे, त्यातच या उपक्रमाचे यश दिसून येते.
या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे. वंचित मुलांना सहकार्याचा हात देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असे समजावे.
'मटा हेल्पलाइन' या विद्यार्थी-वाचक उपक्रमाचे यंदाचे अकरावे वर्ष. या उपक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून पाठिंबा दिला आहे. गरजू मुलांना शैक्षणिक मदतीचा हात देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असे ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले.
- डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ अर्थतज्ञ