म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
पश्चिम रेल्वेने जादा फेऱ्यांप्रमाणेच लोकलसेवा जलदगतीने चालवण्यासाठी नवनवीन बदल केले आहेत. यात सकाळच्या सत्रात चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकलचे मरिन लाइन्स, ग्रँट रोड, चर्नी रोडमधील थांबे रद्द करण्यात आले आहेत. मात्र वक्तशीरपणासाठी केलेल्या बदलांचा प्रवाशांना त्रासच होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे हे थांबे पूर्ववत सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा 'आम्ही गिरगावकर' या सामाजिक संस्थेने दिला आहे.
पश्चिम रेल्वेने १ नोव्हेंबरपासून वेगवेगळ्या पद्धतीने बदल केले आहेत. त्यातील मालाड, गोरेगावहून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या सहा लोकलना जोगेश्वरीतील थांबा रद्द करण्याचा समावेश होता. पण प्रवाशांच्या मागणीमुळे हा निर्णय मागे घेत जोगेश्वरीत थांबे देण्यात आले. त्याचवेळी चर्चगेटहून विराराच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलचे मरिन लाइन्स, ग्रँट रोड, चर्नी रोड येथील थांबे सकाळी ८.३२ ते दु. ११.०५पर्यंत रद्द केले आहेत. हा निर्णय व्यवस्थापनाच्या दृष्टीने चपखल असला तरीही या तिन्ही स्थानकांतील थांबे रद्द केल्याने हजारो प्रवाशांची अडचण होत आहे. सकाळच्या वेळेत विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलसाठी प्रवाशांना मुंबई सेंट्रल स्थानकाकडे जाण्यासाठी बरीच धावपळ करावी लागत असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर या तिन्ही स्थानकांतील प्रवाशांना विरारच्या दिशेने जाण्यासाठी जलद लोकल पकडणे सोयीचे होण्यासाठी हा निर्णय मागे घेण्याची मागणी 'आम्ही गिरगावकर'ने केली आहे.
रेल्वे सकारात्मक
नव्या वेळापत्रकाने झवेरी बाजार, भुलेश्वरसह अन्य बाजारपेठांमधील व्यापारी, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अन्य नोकरदार, व्यावसायिक या सर्वांना त्याचा फटका बसत आहे. इथल्या हजारो प्रवाशांचे होणारे हाल टळण्यासाठी पश्चिम रेल्वेने हा निर्णय मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी 'आम्ही गिरगावकर'चे सचिव मिलिंद वेदपाठक, गौरव सागवेकर आदींनी केली आहे. त्यासाठी संस्थेच्या शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांनी भेट घेऊन निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन पुकारू असा इशारा दिला आहे. याबाबत रेल्वेने सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले.
पश्चिम रेल्वेने जादा फेऱ्यांप्रमाणेच लोकलसेवा जलदगतीने चालवण्यासाठी नवनवीन बदल केले आहेत. यात सकाळच्या सत्रात चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकलचे मरिन लाइन्स, ग्रँट रोड, चर्नी रोडमधील थांबे रद्द करण्यात आले आहेत. मात्र वक्तशीरपणासाठी केलेल्या बदलांचा प्रवाशांना त्रासच होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे हे थांबे पूर्ववत सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा 'आम्ही गिरगावकर' या सामाजिक संस्थेने दिला आहे.
पश्चिम रेल्वेने १ नोव्हेंबरपासून वेगवेगळ्या पद्धतीने बदल केले आहेत. त्यातील मालाड, गोरेगावहून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या सहा लोकलना जोगेश्वरीतील थांबा रद्द करण्याचा समावेश होता. पण प्रवाशांच्या मागणीमुळे हा निर्णय मागे घेत जोगेश्वरीत थांबे देण्यात आले. त्याचवेळी चर्चगेटहून विराराच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलचे मरिन लाइन्स, ग्रँट रोड, चर्नी रोड येथील थांबे सकाळी ८.३२ ते दु. ११.०५पर्यंत रद्द केले आहेत. हा निर्णय व्यवस्थापनाच्या दृष्टीने चपखल असला तरीही या तिन्ही स्थानकांतील थांबे रद्द केल्याने हजारो प्रवाशांची अडचण होत आहे. सकाळच्या वेळेत विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलसाठी प्रवाशांना मुंबई सेंट्रल स्थानकाकडे जाण्यासाठी बरीच धावपळ करावी लागत असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर या तिन्ही स्थानकांतील प्रवाशांना विरारच्या दिशेने जाण्यासाठी जलद लोकल पकडणे सोयीचे होण्यासाठी हा निर्णय मागे घेण्याची मागणी 'आम्ही गिरगावकर'ने केली आहे.
रेल्वे सकारात्मक
नव्या वेळापत्रकाने झवेरी बाजार, भुलेश्वरसह अन्य बाजारपेठांमधील व्यापारी, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अन्य नोकरदार, व्यावसायिक या सर्वांना त्याचा फटका बसत आहे. इथल्या हजारो प्रवाशांचे होणारे हाल टळण्यासाठी पश्चिम रेल्वेने हा निर्णय मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी 'आम्ही गिरगावकर'चे सचिव मिलिंद वेदपाठक, गौरव सागवेकर आदींनी केली आहे. त्यासाठी संस्थेच्या शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांनी भेट घेऊन निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन पुकारू असा इशारा दिला आहे. याबाबत रेल्वेने सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले.