म. टा. प्रतिनिधी, मुंबई
'हा छंद जिवाला लावी पिसे' म्हणत ८१ व्या वर्षातही तासन् तास सायकल चालवणाऱ्या सांगली येथील गोविंदकाका परांजपे यांनी सायकलवरून नेपाळ गाठण्याचा संकल्प केला आहे. त्यांना पुण्यातील प्रकाश पाटील (६२) या दुसऱ्या अवलिया सायकलस्वाराची साथ लाभली आहे. ही दुकलीने बुधवारी सकाळी गेट वे ऑफ इंडियाहून नेपाळच्या दिशेने प्रयाण केले. आतापर्यंत या दोघांनी अनेक वेळा स्वतंत्रपणे सायकल मोहिमा यशस्वी केल्या आहेत.
सांगलीतील माझानगर परिसरात राहणारे गोविंद परांजपे (८१) यांनी लहानपणापासून सायकल चालवण्याचा छंद जोपासला आहे. आयआयटीत निदेशक पदावर ३० वर्षे सेवा बजावून ते १९९६मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र सायकलशी त्यांचे नाते कायम राहिले. आतापर्यंत त्यांनी तीन वेळा कन्याकुमारीपर्यंत सायकलस्वारी केली आहे. देशातील अनेक भागात त्यांनी सायकल मोहिमा केल्या आहेत. लखनऊ, उज्जैन, इंदूर, हैदराबाद, तिरुपती यांना सालकलने भेट दिली आहे. पत्नी, तीन मुले, सहा नातवंडे या सर्वांचा पाठिंबा मोलाचे असल्याने आज ८१ व्या वर्षीही सायकलवारीचा छंद जोपासता येत असल्याचे परांजपे यांनी सांगितले. परांजपे यांनी यापूर्वी २००२ मध्ये नेपाळपर्यंत सायकलस्वारी केली होती. त्यावेळी ४० दिवसांत ४,८०० किमी अंतर पार करणाऱ्या परांजपे यांनी जिद्दीने ही नवीन मोहीम हाती घेतली आहे.
त्यांच्या सोबत असणारे पुण्यातील मोशी भागातील प्रकाश पाटील हे पुण्याच्या पीएमटीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. लहानपणापासून सायकलसोबत नाते जोडलेल्या पाटील यांनी आतापर्यंत दाक्षिणात्य राज्यांसह विविध ठिकाणी सायकल मोहिमा केल्या आहेत. आता हाती घेतलेली नेपाळची मोहीमही निश्चित यशस्वी होईल, असा ठाम विश्वास ते व्यक्त करतात.
दोन महिन्यांचा प्रवास
सांगलीतून २६ एप्रिलपासून सुरू झालेली ही नेपाळयात्रा सुमारे दोन महिन्यांची आहे. मुंबईत आगमन झालेली ही दुक्कल बुधवारी गेट वे ऑफ इंडियाहून नेपाळच्या दिशेने रवाना झाली. कल्याण, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, अमरावती, जबलपूर, गोरखपूरमार्गे ते नेपाळमध्ये प्रवेश करतील. पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत आणि त्यानंतर सायंकाळी उन्हे उतरली की पाच वाजल्यानंतर सूर्य मावळेपर्यंत सायकलवरून ही मार्गक्रमणा चालणार आहे.
'हा छंद जिवाला लावी पिसे' म्हणत ८१ व्या वर्षातही तासन् तास सायकल चालवणाऱ्या सांगली येथील गोविंदकाका परांजपे यांनी सायकलवरून नेपाळ गाठण्याचा संकल्प केला आहे. त्यांना पुण्यातील प्रकाश पाटील (६२) या दुसऱ्या अवलिया सायकलस्वाराची साथ लाभली आहे. ही दुकलीने बुधवारी सकाळी गेट वे ऑफ इंडियाहून नेपाळच्या दिशेने प्रयाण केले. आतापर्यंत या दोघांनी अनेक वेळा स्वतंत्रपणे सायकल मोहिमा यशस्वी केल्या आहेत.
सांगलीतील माझानगर परिसरात राहणारे गोविंद परांजपे (८१) यांनी लहानपणापासून सायकल चालवण्याचा छंद जोपासला आहे. आयआयटीत निदेशक पदावर ३० वर्षे सेवा बजावून ते १९९६मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र सायकलशी त्यांचे नाते कायम राहिले. आतापर्यंत त्यांनी तीन वेळा कन्याकुमारीपर्यंत सायकलस्वारी केली आहे. देशातील अनेक भागात त्यांनी सायकल मोहिमा केल्या आहेत. लखनऊ, उज्जैन, इंदूर, हैदराबाद, तिरुपती यांना सालकलने भेट दिली आहे. पत्नी, तीन मुले, सहा नातवंडे या सर्वांचा पाठिंबा मोलाचे असल्याने आज ८१ व्या वर्षीही सायकलवारीचा छंद जोपासता येत असल्याचे परांजपे यांनी सांगितले. परांजपे यांनी यापूर्वी २००२ मध्ये नेपाळपर्यंत सायकलस्वारी केली होती. त्यावेळी ४० दिवसांत ४,८०० किमी अंतर पार करणाऱ्या परांजपे यांनी जिद्दीने ही नवीन मोहीम हाती घेतली आहे.
त्यांच्या सोबत असणारे पुण्यातील मोशी भागातील प्रकाश पाटील हे पुण्याच्या पीएमटीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. लहानपणापासून सायकलसोबत नाते जोडलेल्या पाटील यांनी आतापर्यंत दाक्षिणात्य राज्यांसह विविध ठिकाणी सायकल मोहिमा केल्या आहेत. आता हाती घेतलेली नेपाळची मोहीमही निश्चित यशस्वी होईल, असा ठाम विश्वास ते व्यक्त करतात.
दोन महिन्यांचा प्रवास
सांगलीतून २६ एप्रिलपासून सुरू झालेली ही नेपाळयात्रा सुमारे दोन महिन्यांची आहे. मुंबईत आगमन झालेली ही दुक्कल बुधवारी गेट वे ऑफ इंडियाहून नेपाळच्या दिशेने रवाना झाली. कल्याण, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, अमरावती, जबलपूर, गोरखपूरमार्गे ते नेपाळमध्ये प्रवेश करतील. पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत आणि त्यानंतर सायंकाळी उन्हे उतरली की पाच वाजल्यानंतर सूर्य मावळेपर्यंत सायकलवरून ही मार्गक्रमणा चालणार आहे.