सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीत गुंतले असतानाच, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने दोन मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थाने यांच्यात बदल करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. त्यानुसार राज्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल सुखदेवराव बोंडे यांना सागर हा शासकीय बंगला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कृषिमंत्री डॉ. बोंडे वास्तव्य करीत असलेला नीलांबरी ३०२ हे शासकीय निवासस्थान महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या जयप्रकाश ठाकूर यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दोन मंत्र्यांचे बंगले बदलले
सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीत गुंतले असतानाच, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने दोन मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थाने यांच्यात बदल ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Sep 2019, 4:00 am