मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
नोटाबंदीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रसरकारवर निशाना साधला आहे. काश्मीरात अतिरेक्यांना आर्थिक मदत म्हणून घरपोच पैसे पुरविले जात आहेत. पण देशप्रेमींना पैशांसाठी रांगेत उभे रहावे लागत आहे, अशा शब्दांत उद्घव ठाकरे यांनी केंद्रसरकारवर हल्ला चढविला.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते हेमराज शहा, जयंतीभाई मोदी आणि भाजपचे गुजराती विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोशी यांच्यासह गुजराती समाजातील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रेवश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्घव ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर पुन्हा तोफ डागत जिल्हा बँकांवरील निर्बंध उठविण्याच्या मागणीचाही पुनरूच्चार केला. जिल्हा बँकात शेतकऱ्यांचे आणि गरीबांचे पैसे आहेत. या बँकांवर निर्बंध लादून सरकारने काय मिळविले, असा संताप व्यक्त करतानाच विजय मल्ल्याने जिल्हा बँकेतून कर्ज घेतले होते काय? असा सवाल त्यांनी केला. अॅक्सिस बँकेचा घोटाळाबाहेर येताच या घोटाळ्याला सरकारने क्लिनचीट दिल्याचेही त्यांनी माध्यमांच्या निदर्शनास आणून दिले.
जनता पाहत आहे
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणातात, त्यांना संसदेत बोलू दिले जात नाही. मोदी ही तेच म्हणत आहेत, यावर त्यांची प्रतिक्रीया विचारली असता 'जनता समजूतदार आहे. कोण काय काय बोलतय ते पाहत आहे,' अशी मार्मिक टिपण्णी त्यांनी केली.
रांगेत उभं राहणं राष्ट्रीय कार्यक्रम
गुजराती समाजाने शिवसेने सोबत यावे, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नेहमी वाटायचे. पण शिवसेनेबद्दल अनेक गैरसमज पसरविण्यात आले होते, असे सांगतानाच आतापर्यंत गुजराती समाजाचा केवळ वापर केला गेला. युज अँड थ्रो केल्या गेलं. सध्या रांगेत उभं राहणं हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे, असा टोला हाणतानाच पण मी तुम्हाला शिवसेनेत रांगेत उभं करणार नाही, असे आश्वासन त्यांनी गुजराती नेत्यांना दिले. नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या नगरसेवकाकडे सापडलेली रक्कम मंत्री सुभाष देशमुखांसारखी आहे काय, हे तपासून पाहत असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.
नोटाबंदीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रसरकारवर निशाना साधला आहे. काश्मीरात अतिरेक्यांना आर्थिक मदत म्हणून घरपोच पैसे पुरविले जात आहेत. पण देशप्रेमींना पैशांसाठी रांगेत उभे रहावे लागत आहे, अशा शब्दांत उद्घव ठाकरे यांनी केंद्रसरकारवर हल्ला चढविला.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते हेमराज शहा, जयंतीभाई मोदी आणि भाजपचे गुजराती विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोशी यांच्यासह गुजराती समाजातील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रेवश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्घव ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर पुन्हा तोफ डागत जिल्हा बँकांवरील निर्बंध उठविण्याच्या मागणीचाही पुनरूच्चार केला. जिल्हा बँकात शेतकऱ्यांचे आणि गरीबांचे पैसे आहेत. या बँकांवर निर्बंध लादून सरकारने काय मिळविले, असा संताप व्यक्त करतानाच विजय मल्ल्याने जिल्हा बँकेतून कर्ज घेतले होते काय? असा सवाल त्यांनी केला. अॅक्सिस बँकेचा घोटाळाबाहेर येताच या घोटाळ्याला सरकारने क्लिनचीट दिल्याचेही त्यांनी माध्यमांच्या निदर्शनास आणून दिले.
जनता पाहत आहे
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणातात, त्यांना संसदेत बोलू दिले जात नाही. मोदी ही तेच म्हणत आहेत, यावर त्यांची प्रतिक्रीया विचारली असता 'जनता समजूतदार आहे. कोण काय काय बोलतय ते पाहत आहे,' अशी मार्मिक टिपण्णी त्यांनी केली.
रांगेत उभं राहणं राष्ट्रीय कार्यक्रम
गुजराती समाजाने शिवसेने सोबत यावे, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नेहमी वाटायचे. पण शिवसेनेबद्दल अनेक गैरसमज पसरविण्यात आले होते, असे सांगतानाच आतापर्यंत गुजराती समाजाचा केवळ वापर केला गेला. युज अँड थ्रो केल्या गेलं. सध्या रांगेत उभं राहणं हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे, असा टोला हाणतानाच पण मी तुम्हाला शिवसेनेत रांगेत उभं करणार नाही, असे आश्वासन त्यांनी गुजराती नेत्यांना दिले. नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या नगरसेवकाकडे सापडलेली रक्कम मंत्री सुभाष देशमुखांसारखी आहे काय, हे तपासून पाहत असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.