मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या राज्यात ज्या काही सुधारणा केल्या त्यामुळे देशाला नवी दिशा आणि नवा प्रकाश दिल्याचा गवगवा नेहमीच होत असतो. मग आता पैशांचे प्रयोग करून लोक विकत घेण्याचे व विरोधकांची तोंडं बंद करण्याचे प्रकार का सुरू आहेत? गुजरातच्या जनतेचा विश्वास गमावल्यामुळे कालपर्यंतच्या विरोधकांना साडीचोळी देऊन ‘विकासा’च्या लग्नात नाचवायचा कार्यक्रम आता सुरू आहे, असा संताप व्यक्त करतानाच सारा देश गरिबी, महागाई, बेरोजगारी व मंदीच्या तिरडीवर तडफडत असताना गुजरातमध्ये पैशांचा पाऊस कसा पडत आहे? लोकांनी हे वैभव आज पाहावे आणि कायमचे डोळे मिटून ‘हे राम’ म्हणावे काय?, अशी खोचक टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजरातमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या घोडेबाजारावर टीका करत भाजपची पिसे काढली. सत्ता व पैशांचे राजकारण ज्या पद्धतीने काँग्रेसने केले तोच मार्ग भारतीय जनता पक्षही स्वीकारत असेल तर मग देशात नक्की बदलले काय हा प्रश्नच आहे. ‘पटेल’ आंदोलकांची बोली लावली जात असल्याचे आरोप हार्दिक पटेल करीत आहेत. एकतर या आरोपांची ‘ईडी’कडून तत्काळ चौकशी व्हायला हवी व मुंबईतील ‘ईडी’ स्पेशालिस्ट भाजप नेत्यांनी गुजरातच्या भूमीवर जाऊन या ५०० कोटींसंदर्भात चौकशीची मागणी करायला हवी. मुंबईत सहा नगरसेवकांचे शिवसेनेत आगमन झाले तो भ्रष्टाचार आहे असे ज्यांना वाटते त्यांनी गुजरातेत चाललेला ‘नोटाबंदी’चा ‘गरबा’ही ईडीच्या टिपऱ्यांनी घुमवायला नको काय?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखातून केला आहे.
घोषणांचा पाऊस आणि धमक्यांचा गडगडाट का?
मोदी यांनी गुजरात विकासाचे जे ‘मॉडेल’ भाषणबाजी व सोशल मीडियातून समोर आणले ते खरे आहे असे एकवेळ मान्य केले तर मग ऐन निवडणुकीत गुजरातेत बसून त्यांना घोषणांचा पाऊस व धमक्यांचा गडगडाट करावा लागत आहे?, असा सवाल करतानाच पंतप्रधान मोदी यांनी दोन आठवडय़ांत तीनवेळा आणि सप्टेंबरपासून पाचवेळा गुजरातचा दौरा करून अगदी लहान प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण वगैरे कार्यक्रम केले व जे लोक विकासाला विरोध करतील त्यांना एक दमडीही केंद्राकडून मिळणार नसल्याचे बजावले. म्हणजे भाजपला मत दिले नाही तर याद राखा असेच त्यांना सांगायचे आहे, अशी टीकाही उद्धव यांनी केली.
उद्धव यांचे फटकारे...
> गुजरातमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून सध्या जो धुरळा उडत आहे त्यामुळे देशाची करमणूक होत आहे. एखाद्या राज्यास तेथील राजकारणी कसे बदनाम करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरात. सध्या तिथे जो ‘तीन पत्ती’ जुगाराचा डाव खेळला जात आहे तो पाहता हे राज्य आता महात्मा गांधी व सरदार पटेलांचे राहिले नसून ते पैशांच्या जोरावर राज्य करणाऱ्यांचे झाले आहे. पैशांचे राज्य व पैशांचे राजकारण म्हणजे नक्की काय असते ते गुजरातमधील घडामोडींवरून स्पष्ट दिसते. गुजरातमधील विकास ‘गांडो’ झाल्यानंतर म्हणजे ठार वेडा झाल्यानंतर आता विजय विकत घेण्याच्या हालचाली सत्ताधारी पक्ष करीत आहे.
> पंतप्रधान मोदी हे बरेच दिवस परदेश दौऱ्यावर गेलेले नाहीत. अलीकडे त्यांनी जास्तीत जास्त वेळ गुजरातला दिला आहे. म्हणजेच गुजरातमध्ये भाजपला आव्हान आहे व त्या पक्षासाठी विधानसभेचे मैदान सोपे नाही. मोदी म्हणजे गुजरातचे सर्वेसर्वा व हृदयसम्राट असतील आणि त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत गुजरातचा प्रचंड विकास केला असेल तर मग प्रचाराचा धुरळा न उडवता त्यांना सहज मोठा विजय मिळवता आला असता.
> आधी महाराष्ट्रात व आता गुजरातमध्ये पैशांचा ‘राजकीय खेळ’ खेळला जात आहे. पंतप्रधानांच्या गृहराज्यात त्यांचा पक्ष अडचणीत येऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही एका तळमळीने हे सगळे सांगत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या राज्यात ज्या काही सुधारणा केल्या त्यामुळे देशाला नवी दिशा आणि नवा प्रकाश दिल्याचा गवगवा नेहमीच होत असतो. मग आता पैशांचे प्रयोग करून लोक विकत घेण्याचे व विरोधकांची तोंडं बंद करण्याचे प्रकार का सुरू आहेत? गुजरातच्या जनतेचा विश्वास गमावल्यामुळे कालपर्यंतच्या विरोधकांना साडीचोळी देऊन ‘विकासा’च्या लग्नात नाचवायचा कार्यक्रम आता सुरू आहे, असा संताप व्यक्त करतानाच सारा देश गरिबी, महागाई, बेरोजगारी व मंदीच्या तिरडीवर तडफडत असताना गुजरातमध्ये पैशांचा पाऊस कसा पडत आहे? लोकांनी हे वैभव आज पाहावे आणि कायमचे डोळे मिटून ‘हे राम’ म्हणावे काय?, अशी खोचक टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजरातमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या घोडेबाजारावर टीका करत भाजपची पिसे काढली. सत्ता व पैशांचे राजकारण ज्या पद्धतीने काँग्रेसने केले तोच मार्ग भारतीय जनता पक्षही स्वीकारत असेल तर मग देशात नक्की बदलले काय हा प्रश्नच आहे. ‘पटेल’ आंदोलकांची बोली लावली जात असल्याचे आरोप हार्दिक पटेल करीत आहेत. एकतर या आरोपांची ‘ईडी’कडून तत्काळ चौकशी व्हायला हवी व मुंबईतील ‘ईडी’ स्पेशालिस्ट भाजप नेत्यांनी गुजरातच्या भूमीवर जाऊन या ५०० कोटींसंदर्भात चौकशीची मागणी करायला हवी. मुंबईत सहा नगरसेवकांचे शिवसेनेत आगमन झाले तो भ्रष्टाचार आहे असे ज्यांना वाटते त्यांनी गुजरातेत चाललेला ‘नोटाबंदी’चा ‘गरबा’ही ईडीच्या टिपऱ्यांनी घुमवायला नको काय?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखातून केला आहे.
घोषणांचा पाऊस आणि धमक्यांचा गडगडाट का?
मोदी यांनी गुजरात विकासाचे जे ‘मॉडेल’ भाषणबाजी व सोशल मीडियातून समोर आणले ते खरे आहे असे एकवेळ मान्य केले तर मग ऐन निवडणुकीत गुजरातेत बसून त्यांना घोषणांचा पाऊस व धमक्यांचा गडगडाट करावा लागत आहे?, असा सवाल करतानाच पंतप्रधान मोदी यांनी दोन आठवडय़ांत तीनवेळा आणि सप्टेंबरपासून पाचवेळा गुजरातचा दौरा करून अगदी लहान प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण वगैरे कार्यक्रम केले व जे लोक विकासाला विरोध करतील त्यांना एक दमडीही केंद्राकडून मिळणार नसल्याचे बजावले. म्हणजे भाजपला मत दिले नाही तर याद राखा असेच त्यांना सांगायचे आहे, अशी टीकाही उद्धव यांनी केली.
उद्धव यांचे फटकारे...
> गुजरातमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून सध्या जो धुरळा उडत आहे त्यामुळे देशाची करमणूक होत आहे. एखाद्या राज्यास तेथील राजकारणी कसे बदनाम करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरात. सध्या तिथे जो ‘तीन पत्ती’ जुगाराचा डाव खेळला जात आहे तो पाहता हे राज्य आता महात्मा गांधी व सरदार पटेलांचे राहिले नसून ते पैशांच्या जोरावर राज्य करणाऱ्यांचे झाले आहे. पैशांचे राज्य व पैशांचे राजकारण म्हणजे नक्की काय असते ते गुजरातमधील घडामोडींवरून स्पष्ट दिसते. गुजरातमधील विकास ‘गांडो’ झाल्यानंतर म्हणजे ठार वेडा झाल्यानंतर आता विजय विकत घेण्याच्या हालचाली सत्ताधारी पक्ष करीत आहे.
> पंतप्रधान मोदी हे बरेच दिवस परदेश दौऱ्यावर गेलेले नाहीत. अलीकडे त्यांनी जास्तीत जास्त वेळ गुजरातला दिला आहे. म्हणजेच गुजरातमध्ये भाजपला आव्हान आहे व त्या पक्षासाठी विधानसभेचे मैदान सोपे नाही. मोदी म्हणजे गुजरातचे सर्वेसर्वा व हृदयसम्राट असतील आणि त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत गुजरातचा प्रचंड विकास केला असेल तर मग प्रचाराचा धुरळा न उडवता त्यांना सहज मोठा विजय मिळवता आला असता.
> आधी महाराष्ट्रात व आता गुजरातमध्ये पैशांचा ‘राजकीय खेळ’ खेळला जात आहे. पंतप्रधानांच्या गृहराज्यात त्यांचा पक्ष अडचणीत येऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही एका तळमळीने हे सगळे सांगत आहोत.