मुंबई: माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबाबत निर्णय जाहीर करताना झालेल्या गोंधळामुळे शिवसेनेने स्वत:ची चांगलीच शोभा करुन घेतली आहे. आज सकाळी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त आढळराव पाटील (Adhalrao Patil) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, त्यानंतर काही तासांमध्येच शिवसेनेकडून (Shivsena) शुद्धिपत्रक काढून आढळराव पाटील हे शिवसेनेतच कार्यरत राहतील, असे स्पष्टीकरण देण्यात आले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला फोन केल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केल्याचा आढळराव पाटील यांनी सांगितले. या प्रकारानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रविवारी पत्रकारपरिषदही घेतली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत भविष्यात वेगळा विचार करण्याचे संकेत दिले. या कारवाईतून माझी राज्यभर बदनामी झाली, त्याचं काय? आज दिवसभर मी विचार करेन. हवं तर उद्धव ठाकरेंना भेटेन. मग पुढचा निर्णय ठरवूयात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नेमकं काय म्हटलं?
आज सकाळपासून मला अनेकांचे फोन आले. सामनामध्ये तुमच्या हकालपट्टीची बातमी वाचल्याचं त्यांनी सांगितलं. सुरुवातीला मला ती मस्करी वाटली. आधी मला विश्वासच वाटेना. त्यानंतर मी सामना वाचला आणि मला धक्का बसला. काल रात्रीच माझं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बोलणं झालं होतं. मतदारसंघातले ५० कार्यकर्ते तुम्हाला उद्या भेटायला येतील, असं मी त्यांना फोनवर सांगितलं होतं, असं पाटलांनी पत्रकारांना सांगितलं.
मी पक्षाविरोधात कोणती कारवाई केली ते कळायला मार्ग नाही. उद्धव ठाकरेंनी काल फोनवर बोलताना मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणाऱ्या माझ्या पोस्टचा उल्लेख केला. त्या पोस्टबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यात काहीच गैर नसल्याचं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं. त्यावर जे झालं ते झालं, असं ठाकरे म्हणाले. शिवाजीराव आढळराव पाटील पक्ष सोडून जाणार. राष्ट्रवादी, भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा अनेकदा झाल्या. मात्र तुम्ही पक्ष सोडून गेला नाहीत याचं कौतुक वाटतं, असं ठाकरेंनी म्हटल्याचं पाटलांनी सांगितलं. तुम्ही जाणार अशी चर्चा असतानाही तुम्ही कधी गेला नाहीत आणि जे कधीही जाणार नाहीत अशी खात्री वाटत होती ते मात्र सोडून गेले, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. राष्ट्रवादीविरुद्ध लढतो त्याचीच शिक्षा बहुधा मला मिळाली असावी. मी अस्वस्थ आहे. काय बोलावं ते कळत नाही. एक दोन दिवस विचार करेन आणि पुढचं काय ते ठरवेन, असे आढळराव पाटील यांनी म्हटले.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नेमकं काय म्हटलं?
आज सकाळपासून मला अनेकांचे फोन आले. सामनामध्ये तुमच्या हकालपट्टीची बातमी वाचल्याचं त्यांनी सांगितलं. सुरुवातीला मला ती मस्करी वाटली. आधी मला विश्वासच वाटेना. त्यानंतर मी सामना वाचला आणि मला धक्का बसला. काल रात्रीच माझं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बोलणं झालं होतं. मतदारसंघातले ५० कार्यकर्ते तुम्हाला उद्या भेटायला येतील, असं मी त्यांना फोनवर सांगितलं होतं, असं पाटलांनी पत्रकारांना सांगितलं.
मी पक्षाविरोधात कोणती कारवाई केली ते कळायला मार्ग नाही. उद्धव ठाकरेंनी काल फोनवर बोलताना मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणाऱ्या माझ्या पोस्टचा उल्लेख केला. त्या पोस्टबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यात काहीच गैर नसल्याचं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं. त्यावर जे झालं ते झालं, असं ठाकरे म्हणाले. शिवाजीराव आढळराव पाटील पक्ष सोडून जाणार. राष्ट्रवादी, भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा अनेकदा झाल्या. मात्र तुम्ही पक्ष सोडून गेला नाहीत याचं कौतुक वाटतं, असं ठाकरेंनी म्हटल्याचं पाटलांनी सांगितलं. तुम्ही जाणार अशी चर्चा असतानाही तुम्ही कधी गेला नाहीत आणि जे कधीही जाणार नाहीत अशी खात्री वाटत होती ते मात्र सोडून गेले, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. राष्ट्रवादीविरुद्ध लढतो त्याचीच शिक्षा बहुधा मला मिळाली असावी. मी अस्वस्थ आहे. काय बोलावं ते कळत नाही. एक दोन दिवस विचार करेन आणि पुढचं काय ते ठरवेन, असे आढळराव पाटील यांनी म्हटले.