मुंबई: 'पंडित नेहरू यांनी चीनशी मैत्री केली ती अंगलट आली. नेहरू यांच्यावर टीका करण्याची एकही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडत नाहीत. मात्र नेहरू यांच्या ‘पंचशील’च्याच मार्गाने मोदी चीनचा प्रश्न सोडवू पाहत आहेत,' असं सांगतानाच 'नेहरू हे ‘पंचशील’चे उद्गाता होते. मोदी हे पंचसूत्राचे पाठीराखे बनले पण विचार नेहरुंचाच आहे. ‘युद्ध नको तर बुद्धच हवा’ हे नेहरूंप्रमाणे मोदी यांनाही पटले आहे असे दिसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यावर काय म्हणणे आहे?,' असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या चीन दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून मोदींवर तोंडसुख घेतले आहे. 'मोदी यांना चीनच्या सीमेवर शांतता हवी आहे. पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निदान निवडणूक काळात चीनने कटकटी वाढवू नयेत. एकदा निवडणूक होऊन जाऊ द्या, मग काय ते बघू अशी एकंदरीत मोदी यांची भूमिका दिसते,' अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली आहे.
>> मोदी हे चीन तसेच अन्य देशांची मुशाफिरी करून भारताच्या ‘दौऱ्यावर’ परतले आहेत. मोदी यांच्या चीन दौऱ्यातून नेमके हाती काय लागले यावर आता चर्चा सुरू आहे. विदेश मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की, कोणत्याही विशेष ‘अजेंड्या’शिवाय म्हणजे कामाशिवाय हा चीनचा दौरा होता. म्हणजे देशाचे पंतप्रधान हे बिनकामाचे आहेत व भरपूर मोकळा वेळ असल्याने ते सहज चीनला फेरफटका मारून आले.
>> चीन मात्र पाकिस्तानला आजही मोठी मदत करीत आहे व भारताला अस्थिर करणे हाच त्यामागचा हेतू आहे. नेपाळ हे एकमेव हिंदूराष्ट्र चीनने गिळले आहे व चीनच्या प्रेरणेने नेपाळ भारताला दुश्मन मानू लागला आहे. बाजूच्या मालदीव, श्रीलंका, बांगलादेश व म्यानमारसारख्या राष्ट्रांतही चीनची घुसखोरी सुरू आहे. भूतानच्या सीमेवरील डोकलामला चिनी सैन्य जबरदस्तीने उभे करून भारताची डोकेदुखी वाढविण्याचे काम चीन करीत आहे, पण या एकाही विषयावर दोन देशांत चर्चा झाली नाही. अरुणाचलच्या सीमेवर भारताच्या हद्दीत चीनने बांधकामे सुरू केली आहेत. तिथून व उत्तराखंडात चिनी सैन्य नेहमीच घुसखोरी करीत असते. ही घुसखोरी लेह-लडाखपर्यंत सुरूच असून या विषयावरसुद्धा मोदी व शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली नाही.
>> चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा मार्ग पाकच्या ताब्यातील कश्मीरमधून जातो व आधीच्या मनमोहन सिंग सरकारने त्यास विरोध केला होता, पण हा गंभीर विषय दोघांच्या चर्चेत निघाला नाही. कोणत्याही वादग्रस्त विषयांवर बोलण्याचे टाळले असे आमच्या परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले. मग मोदी यांनी चीनला जाऊन नेमके काय केले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या चीन दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून मोदींवर तोंडसुख घेतले आहे. 'मोदी यांना चीनच्या सीमेवर शांतता हवी आहे. पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निदान निवडणूक काळात चीनने कटकटी वाढवू नयेत. एकदा निवडणूक होऊन जाऊ द्या, मग काय ते बघू अशी एकंदरीत मोदी यांची भूमिका दिसते,' अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली आहे.
>> मोदी हे चीन तसेच अन्य देशांची मुशाफिरी करून भारताच्या ‘दौऱ्यावर’ परतले आहेत. मोदी यांच्या चीन दौऱ्यातून नेमके हाती काय लागले यावर आता चर्चा सुरू आहे. विदेश मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की, कोणत्याही विशेष ‘अजेंड्या’शिवाय म्हणजे कामाशिवाय हा चीनचा दौरा होता. म्हणजे देशाचे पंतप्रधान हे बिनकामाचे आहेत व भरपूर मोकळा वेळ असल्याने ते सहज चीनला फेरफटका मारून आले.
>> चीन मात्र पाकिस्तानला आजही मोठी मदत करीत आहे व भारताला अस्थिर करणे हाच त्यामागचा हेतू आहे. नेपाळ हे एकमेव हिंदूराष्ट्र चीनने गिळले आहे व चीनच्या प्रेरणेने नेपाळ भारताला दुश्मन मानू लागला आहे. बाजूच्या मालदीव, श्रीलंका, बांगलादेश व म्यानमारसारख्या राष्ट्रांतही चीनची घुसखोरी सुरू आहे. भूतानच्या सीमेवरील डोकलामला चिनी सैन्य जबरदस्तीने उभे करून भारताची डोकेदुखी वाढविण्याचे काम चीन करीत आहे, पण या एकाही विषयावर दोन देशांत चर्चा झाली नाही. अरुणाचलच्या सीमेवर भारताच्या हद्दीत चीनने बांधकामे सुरू केली आहेत. तिथून व उत्तराखंडात चिनी सैन्य नेहमीच घुसखोरी करीत असते. ही घुसखोरी लेह-लडाखपर्यंत सुरूच असून या विषयावरसुद्धा मोदी व शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली नाही.
>> चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा मार्ग पाकच्या ताब्यातील कश्मीरमधून जातो व आधीच्या मनमोहन सिंग सरकारने त्यास विरोध केला होता, पण हा गंभीर विषय दोघांच्या चर्चेत निघाला नाही. कोणत्याही वादग्रस्त विषयांवर बोलण्याचे टाळले असे आमच्या परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले. मग मोदी यांनी चीनला जाऊन नेमके काय केले?