अ‍ॅपशहर

माध्यमांना मसाला मोदींनीच पुरवला: शिवसेना

बलात्कार प्रकरणावरून बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या मंत्री आणि खासदारांना तोंड आवरण्याचा आणि प्रसारमाध्यमांना मसाला न पुरविण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मोदींच्या या सल्ल्याची शिवसेनेने खिल्ली उडविली असून कालपर्यंत माध्यमांना मसाला पुरविण्याचं काम मोदींनीच केलं होतं, अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Apr 2018, 9:45 am
मुंबई: बलात्कार प्रकरणावरून बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या मंत्री आणि खासदारांना तोंड आवरण्याचा आणि प्रसारमाध्यमांना मसाला न पुरविण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मोदींच्या या सल्ल्याची शिवसेनेने खिल्ली उडविली असून कालपर्यंत माध्यमांना मसाला पुरविण्याचं काम मोदींनीच केलं होतं, अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray criticizes bjp leaders controversial statements
माध्यमांना मसाला मोदींनीच पुरवला: शिवसेना


दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'माध्यमांना मसाला देऊ नका असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, पण २०१४ पर्यंत माध्यमांना लोणची, मसाले व पापड पुरवूनच ‘भाजप’ने स्वतःची खिचडी पकवली. त्यामुळे मसाल्याची बात भाजपने करावी याची गंमत वाटते,' असा चिमटा काढतानाच 'भाजपचे अनेक पुढारी व मंत्रीदेखील तोंडास येईल ते बोलत असतात, पण त्यांनी ही प्रेरणा आमच्या पंतप्रधानांपासूनच घेतली असावी. कालपर्यंत प्रसारमाध्यमांना मसाला पुरवण्याचे काम मोदी करीतच होते,' अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

>> ‘तोंड आवरा’ असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी स्वपक्षाच्याच आमदार-खासदारांना दिला आहे. तोंडास लगाम घालण्याच्या सूचना याआधीही मोदी यांनी भाजपच्या आमदार-खासदारांना दिल्या होत्या. संसदीय पक्षाच्या बैठकीतही त्यांनी अनेकदा अनेकांची कानउघाडणी केली आहे, पण त्या ‘मोदी’ मंत्राचा उपयोग झाला नाही व अनेक जण तोंडास येईल ते बोलत राहिले. मोदी मंत्रिमंडळातील एक मंत्री संतोष गंगवार यांनी आता ‘बलात्कार’ प्रकरणात जे महनीय विचार मांडले आहेत ते धक्कादायक आहेत.

>> २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी राज्याचे त्यावेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीही अशीच जीभ घसरली होती. ‘इतने बडे शहर में ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है’ या त्यांच्या विधानावर एकच काहूर माजले व भारतीय जनता पक्षाने तर पाटलांना पळता भुई थोडी केली. शेवटी पाटील यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संतोष गंगवारांचा गुन्हा त्यापेक्षादेखील गंभीर आहे. तरीही ते मंत्रीपदावर चिकटून आहेत व महिलांचा हा असा अपमान केल्याबद्दल त्यांचा राजीनामा कोणी मागितलेला नाही. फक्त ‘तोंड आवरा’ इतकाच महत्त्वाचा सल्ला मिळाला आहे.

>> अटलबिहारी वाजपेयी हेसुद्धा देशाचे पंतप्रधान होते, पण ते मोजके व नेटके बोलत. स्वतः पंतप्रधानांनी कमीत कमी बोलावे असे संकेत आहेत, पण मोदी ऊठसूट कोणत्याही विषयावर बोलत असतात, असे त्यांचे विरोधक म्हणतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज