अ‍ॅपशहर

शिंदेंचे बंड जिव्हारी!; उद्धव ठाकरे बोलले, 'भाजपला शिवसेना-ठाकरे हे नातं तोडायचंय'

शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या बंडाने मोठी फूट पडली आहे. आधी ४० आमदार फुटले, १२ खासदार फुटेल आणि आता जिल्ह्यात आणि शहरांमध्ये अनेक कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी होत आहेत. एकनाथ शिंदेंचे हे बंड उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंडावरून भाजपवर निशाणा साधला.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2022, 9:31 pm
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या धक्क्यातून सावरत उद्धव ठाकरेंसह त्यांचे सुपुत्र आणि युवानेते आदित्य ठाकरे यांनी आता पक्ष बांधणीवर भर दिला आहे. उद्धव ठाकरे स्वतः वेगवेगळ्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी आणि बैठका घेत आहेत. आदित्य ठाकरेंनीही शिवसंवाद यात्रेतून कार्यकर्त्यांना साद घातली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत शिवडीमध्ये शाखेचं उद्घाटन केलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray lashes bjp
शिंदेंचे बंड जिव्हारी!; उद्धव ठाकरे बोलले, 'भाजपला शिवसेना-ठाकरे हे नातं तोडायचंय'


उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन केल्यानंतर जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह बंडखोरी केलेल्या आमदार आणि खासदारांवर हल्लाबोल केला. शिवसेनेला फोडण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले. पण आता शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न आहे. शिवेसेनेची पाळेमुळे एवढी घट्ट आहेत की यांच्या चार पिढ्या जरी आल्या तरी शिवसेना संपणार नाही. ती प्राणपणाने लढत राहिल, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

माझ्या बापाच्या नावावर मतं मागण्यापेक्षा तुमच्या बापाच्या नावावर मतं मागा, उद्धव ठाकरे बंडखोरांवर बरसले

एकनाथ शिंदेंच्या बंडावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. भाजपला शिवसेना आणि ठाकरे हे नातं तोडायचंय. पण त्यांना सांगू इच्छितो, बाळासाहेबांचा फोटो न लावता मतं मागून दाखवा, निवडून येऊन दाखवा. मला वाटतं, मराठी माणसांमध्ये आणि हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा हा डाव आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला. शिवसेना हिंदुत्वासाठी लढते. पण भाजपचे हिंदुत्व मात्र सत्तेसाठी आणि सत्तेच्या राजकारणासाठी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

'तुम्ही शिवसेनेत की शिंदे गटात', कट्टर शिवसैनिकाशी बोलताना रामदास कदम संतापले

५० - ५० टक्के सगळं ठरलं होतं. जागा वाटप ठरलं होतं. सत्तेचा वाटप सुद्धा अडीचवर्षे भाजपचा आणि अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असं ठरलं होतं. पण एकतर निवडणुकीत आपल्याला जागा कमी दिल्या. ज्या जागा दिल्या तिकडे बंडखोरी केली आणि जागा पाडल्या. आणि त्यानंतर कहरच केला. असं काही ठरलंच नव्हतं. शिवसेनाचा मुख्यमंत्री संभवच नाही. त्यावेळी संभव नव्हतं मग आता संभवानी युगे युगे कैसे हो गया? असं हिंदीत म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर खासकरून वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला.

महत्वाचे लेख