मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेतच राहणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. राज्यातील युती सरकारमधून बाहेर पडण्याच्या राजकीय चर्चांना उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी सत्तेत राहून सरकारविरोधी भूमिका घेऊ आणि सरकावर अंकुश ठेवू, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या योजनेवर प्रश्न उपस्थित केले. अच्छे दिनची वाट बघत एल्फिन्स्टन दुर्घटनेत लोकं मेली. बुलेट ट्रेन कोणासाठी? मुंबईकरांच्या खांद्यावर बुलेट ट्रेनचं ओझं कशासाठी? बुलेट ट्रेन म्हणजे फुकटचा नागोबा आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी बुलेट ट्रेन करा मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच का? असा सवाल उद्धव यांनी केला. नोटाबंदी, जीएसटी आणि महागाईमुळे संपूर्ण देशामध्ये कारभाराचा विचका झालेला आहे. चिखलातून कमळ उगवतं असं म्हणतात. पण मळ दिसतोय कमळ कुठे दिसत नाही, कारभाराचा सगळा चिखल केला आहे, अशी बोचरी टीका उद्धव यांनी केली.
शिवसेना आंदोलन करत राहणार
महागाई, हिंदुत्व, महिलांचं रक्षण आणि शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने पुकारलेले आंदोलन सुरूच राहणार. सहनशिलतेचा अंत बघू नका. जेव्हा वाटेल तेव्हा सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन मोकळे होऊ, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल
वाराणसीतील हिंदू विद्यापीठातील मुलींवरील लाठीमारावर आणि गोमांसच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. गाईला जपायचे आणि ताईला मारणारे आमचे हिंदुत्व नाही. एकीकडे गोव्यात गोमांस चालतंय दुसरीकडे बंदी. तुमच्या हिंदुत्वची व्याख्या काय? हिंदुत्व फुटेल तेव्हा तुमचे नशिबही फुटेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेतच राहणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. राज्यातील युती सरकारमधून बाहेर पडण्याच्या राजकीय चर्चांना उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी सत्तेत राहून सरकारविरोधी भूमिका घेऊ आणि सरकावर अंकुश ठेवू, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या योजनेवर प्रश्न उपस्थित केले. अच्छे दिनची वाट बघत एल्फिन्स्टन दुर्घटनेत लोकं मेली. बुलेट ट्रेन कोणासाठी? मुंबईकरांच्या खांद्यावर बुलेट ट्रेनचं ओझं कशासाठी? बुलेट ट्रेन म्हणजे फुकटचा नागोबा आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी बुलेट ट्रेन करा मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच का? असा सवाल उद्धव यांनी केला. नोटाबंदी, जीएसटी आणि महागाईमुळे संपूर्ण देशामध्ये कारभाराचा विचका झालेला आहे. चिखलातून कमळ उगवतं असं म्हणतात. पण मळ दिसतोय कमळ कुठे दिसत नाही, कारभाराचा सगळा चिखल केला आहे, अशी बोचरी टीका उद्धव यांनी केली.
शिवसेना आंदोलन करत राहणार
महागाई, हिंदुत्व, महिलांचं रक्षण आणि शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने पुकारलेले आंदोलन सुरूच राहणार. सहनशिलतेचा अंत बघू नका. जेव्हा वाटेल तेव्हा सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन मोकळे होऊ, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल
वाराणसीतील हिंदू विद्यापीठातील मुलींवरील लाठीमारावर आणि गोमांसच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. गाईला जपायचे आणि ताईला मारणारे आमचे हिंदुत्व नाही. एकीकडे गोव्यात गोमांस चालतंय दुसरीकडे बंदी. तुमच्या हिंदुत्वची व्याख्या काय? हिंदुत्व फुटेल तेव्हा तुमचे नशिबही फुटेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.