मुंबई :
'आणीबाणीत राजकीय विरोधकांना ‘पंगू’ करण्यासाठी शासन यंत्रणेने गुंडगिरी केली व त्यास इंदिराजींचे बळ मिळाले, पण हिंदुस्थानात आता हिंदुत्ववाद्यांनाच भय व दहशत वाटत असेल तर मोदी व शहा यांनी पुढे येऊन खुलासा करायला हवा,' असं सांगतानाच 'नवी राजवट आल्यापासून लालकृष्ण आडवाणींसह अनेकांची ‘वाचा’ गेली आहे. हे भय आहे की मौन आहे हादेखील एक प्रश्न आहेच, पण प्रवीण तोगडियांनी जे घडले त्यास ‘वाचा’ फोडली आहे. मात्र त्यांचे अश्रू हिमतीचे नसून भीतीचे आहेत. देश भयाच्या सावटाखाली आहे काय?,' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी हा सवाला केला आहे. ' नको असलेली माणसे ‘गायब’ करण्याचे प्रकार रशिया व चीनच्या कम्युनिस्ट राजवटीत घडले आहेत. कदाचित पाकिस्तान, इराकमध्येही घडले असतील, असं सांगतानाच देशात सध्या अनेक प्रकरणांनी अचानक उचल खाल्ली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन वादळ निर्माण केले आहे. न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूने अमित शहांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. एका जबरदस्त तणावाखाली लोया यांच्या मुलाने पत्रकार परिषद घेतली. तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. सोहराबुद्दीन हत्या प्रकरणातही राजस्थानचेच पोलीस गुजरातमध्ये घुसले होते, पण प्रवीण तोगडिया म्हणजे सोहराबुद्दीन नाहीत हे विसरता येणार नाही,' असा टोलाही उद्धव यांनी भाजपला हाणला.
उद्धव म्हणाले...
>> चार न्यायमूर्ती त्यांची घुसमट व न्याय व्यवस्थेतील हस्तक्षेपाचा पर्दाफाश करण्यासाठी लोकांसमोर आले तेव्हा त्यांना काँग्रेसचे एजंट व राष्ट्रविरोधी ठरविण्याचा प्रचार सुरू झाला. तो अद्यापि थांबलेला नाही. त्यामुळे प्रवीण तोगडिया यांना कोणती ‘उपाधी’ बहाल होते तेच आता पाहायचे.
>> तोगडियांनी काल अश्रू ढाळले व मोदीही अधूनमधून अश्रूंना वाट करून देत असतात. मात्र देशाच्या दोन हिंदुहृदयसम्राटांनी म्हणजे वीर सावरकर व बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच अश्रू ढाळून मनाचा कमकुवतपणा दाखवला नाही. व्यासपीठावरून एरव्ही गर्जना करणारा तोगडियांसारखा नेता जेव्हा मुळापासून हादरलेला दिसतो तेव्हा आश्चर्य वाटते. गेल्या काही वर्षांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे तोगडिया यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून त्रास दिला जात आहे व आवाज दाबण्यासाठी देशभरात खटले दाखल केले जात असल्याचे तोगडिया सांगत आहेत. हे सर्व राजकीय दबावाने सुरू आहे असे ते म्हणत आहेत. तथापि देशात व गुजरातमध्ये हिंदुत्ववादी मोदी सरकारचे राज्य आहे हे त्यांनी विसरू नये.
'आणीबाणीत राजकीय विरोधकांना ‘पंगू’ करण्यासाठी शासन यंत्रणेने गुंडगिरी केली व त्यास इंदिराजींचे बळ मिळाले, पण हिंदुस्थानात आता हिंदुत्ववाद्यांनाच भय व दहशत वाटत असेल तर मोदी व शहा यांनी पुढे येऊन खुलासा करायला हवा,' असं सांगतानाच 'नवी राजवट आल्यापासून लालकृष्ण आडवाणींसह अनेकांची ‘वाचा’ गेली आहे. हे भय आहे की मौन आहे हादेखील एक प्रश्न आहेच, पण प्रवीण तोगडियांनी जे घडले त्यास ‘वाचा’ फोडली आहे. मात्र त्यांचे अश्रू हिमतीचे नसून भीतीचे आहेत. देश भयाच्या सावटाखाली आहे काय?,' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी हा सवाला केला आहे. ' नको असलेली माणसे ‘गायब’ करण्याचे प्रकार रशिया व चीनच्या कम्युनिस्ट राजवटीत घडले आहेत. कदाचित पाकिस्तान, इराकमध्येही घडले असतील, असं सांगतानाच देशात सध्या अनेक प्रकरणांनी अचानक उचल खाल्ली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन वादळ निर्माण केले आहे. न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूने अमित शहांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. एका जबरदस्त तणावाखाली लोया यांच्या मुलाने पत्रकार परिषद घेतली. तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. सोहराबुद्दीन हत्या प्रकरणातही राजस्थानचेच पोलीस गुजरातमध्ये घुसले होते, पण प्रवीण तोगडिया म्हणजे सोहराबुद्दीन नाहीत हे विसरता येणार नाही,' असा टोलाही उद्धव यांनी भाजपला हाणला.
उद्धव म्हणाले...
>> चार न्यायमूर्ती त्यांची घुसमट व न्याय व्यवस्थेतील हस्तक्षेपाचा पर्दाफाश करण्यासाठी लोकांसमोर आले तेव्हा त्यांना काँग्रेसचे एजंट व राष्ट्रविरोधी ठरविण्याचा प्रचार सुरू झाला. तो अद्यापि थांबलेला नाही. त्यामुळे प्रवीण तोगडिया यांना कोणती ‘उपाधी’ बहाल होते तेच आता पाहायचे.
>> तोगडियांनी काल अश्रू ढाळले व मोदीही अधूनमधून अश्रूंना वाट करून देत असतात. मात्र देशाच्या दोन हिंदुहृदयसम्राटांनी म्हणजे वीर सावरकर व बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच अश्रू ढाळून मनाचा कमकुवतपणा दाखवला नाही. व्यासपीठावरून एरव्ही गर्जना करणारा तोगडियांसारखा नेता जेव्हा मुळापासून हादरलेला दिसतो तेव्हा आश्चर्य वाटते. गेल्या काही वर्षांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे तोगडिया यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून त्रास दिला जात आहे व आवाज दाबण्यासाठी देशभरात खटले दाखल केले जात असल्याचे तोगडिया सांगत आहेत. हे सर्व राजकीय दबावाने सुरू आहे असे ते म्हणत आहेत. तथापि देशात व गुजरातमध्ये हिंदुत्ववादी मोदी सरकारचे राज्य आहे हे त्यांनी विसरू नये.