मुंबई: मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या छोटेखानी पण तडाखेबंद भाषणात भाजपवर घणाघाती शब्दांत टीका केली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्त केलेल्या भाषणाचा संदर्भ देत उद्धव यांनी भाजप तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावाचा उल्लेख टाळून टीका केली. 'घंटा वाजवा, थाळ्या बडवा हेच तुमचे हिंदुत्व आहे का?' असा सवाल करताना तुमच्या टोपीखाली जर डोकं असेल तर मोहन भागवत यांनी काय सांगितले त्याचा जरा विचार करा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. ( Uddhav Thackeray Slams BJP Over Hindutva )
वाचा: क्रांतिकारकांनी भाजपसाठी हा देश स्वतंत्र केलेला नाही: मुख्यमंत्री ठाकरे
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... अशी साद घालत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सर्वप्रथम सरकारबद्दल ते बोलले व भाजपला त्यांनी आव्हान दिले. 'पुढच्या महिन्यात आपल्या सरकारला एक वर्ष होत आहे. समोरचे तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्यात. मी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदी बसून कारभाराला सुरुवात केली, त्या दिवसापासून अनेक जणं स्वप्न बघत आहेत की हे सरकार पडेल, सरकार पाडू. तेव्हा दिलेलं आव्हान मी आज सुद्धा देतोय, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा,' असे खुले आव्हान पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.
'हिंदुत्व हा शब्द केवळ पूजेपुरता मर्यादित नाही. अनेकांनी यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत भ्रम पसरविण्याचे काम केले आहे. संघाच्या दृष्टीने हिंदुत्व म्हणजे आपल्या देशातील अध्यात्मआधारित परंपरेचे सनातन सातत्य आणि मूल्यसंपदेसह अभिव्यक्ती देणारा तो शब्द आहे. त्यात विश्व मानवतेचाही अंतर्भाव आहे. स्वदेशीमधील देशी ही नीती आणि ‘स्व’ म्हणजे हिंदुत्व आहे. हिंदू हा विविधतेला स्वीकारणारा शब्द आहे', असे आज सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते. तोच धागा पकडत मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करणाऱ्या भाजपला आणि आपण सेक्युलर झालात का?, अशी विचारणा करणाऱ्या राज्यपालांच्या पत्रावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीका केली. 'सकाळी मोहन भागवत यांनी हिंदीतून देशाला उद्देशून एक भाषण केलं. हिंदू, हिंदुत्त्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है' हे त्यांचं वाक्य आहे, माझं नाही. तेव्हा जे त्यांना मानणारे आहेत, त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत. त्या टोपीखाली जर का डोकं असेल तर त्या डोक्याला म्हणावं विचार करा, हे हिंदुत्व तुम्हाला पटतं का?, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी टीका केली. सरसंघचालकांकडून जरा हिंदुत्व शिकून घ्या, असा सल्ला देत देव, मंदिर, पूजा, अर्चा हे आमचं हिंदुत्व नाही, बाळासाहेबांनी सांगितलेलं आमचं हिंदुत्व आहे, असे ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व यात जमीन आसमानाचे अंतर आहे, असे नमूद करताना इथे गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता असेच तुमचे धोरण असल्याचा निशाणा उद्धव यांनी साधला.
वाचा: संजय राऊतांचा फडणवीसांना चिमटा; म्हणाले, लवकर बरे व्हा...
वाचा: क्रांतिकारकांनी भाजपसाठी हा देश स्वतंत्र केलेला नाही: मुख्यमंत्री ठाकरे
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... अशी साद घालत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सर्वप्रथम सरकारबद्दल ते बोलले व भाजपला त्यांनी आव्हान दिले. 'पुढच्या महिन्यात आपल्या सरकारला एक वर्ष होत आहे. समोरचे तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्यात. मी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदी बसून कारभाराला सुरुवात केली, त्या दिवसापासून अनेक जणं स्वप्न बघत आहेत की हे सरकार पडेल, सरकार पाडू. तेव्हा दिलेलं आव्हान मी आज सुद्धा देतोय, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा,' असे खुले आव्हान पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.
'हिंदुत्व हा शब्द केवळ पूजेपुरता मर्यादित नाही. अनेकांनी यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत भ्रम पसरविण्याचे काम केले आहे. संघाच्या दृष्टीने हिंदुत्व म्हणजे आपल्या देशातील अध्यात्मआधारित परंपरेचे सनातन सातत्य आणि मूल्यसंपदेसह अभिव्यक्ती देणारा तो शब्द आहे. त्यात विश्व मानवतेचाही अंतर्भाव आहे. स्वदेशीमधील देशी ही नीती आणि ‘स्व’ म्हणजे हिंदुत्व आहे. हिंदू हा विविधतेला स्वीकारणारा शब्द आहे', असे आज सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते. तोच धागा पकडत मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करणाऱ्या भाजपला आणि आपण सेक्युलर झालात का?, अशी विचारणा करणाऱ्या राज्यपालांच्या पत्रावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीका केली. 'सकाळी मोहन भागवत यांनी हिंदीतून देशाला उद्देशून एक भाषण केलं. हिंदू, हिंदुत्त्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है' हे त्यांचं वाक्य आहे, माझं नाही. तेव्हा जे त्यांना मानणारे आहेत, त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत. त्या टोपीखाली जर का डोकं असेल तर त्या डोक्याला म्हणावं विचार करा, हे हिंदुत्व तुम्हाला पटतं का?, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी टीका केली. सरसंघचालकांकडून जरा हिंदुत्व शिकून घ्या, असा सल्ला देत देव, मंदिर, पूजा, अर्चा हे आमचं हिंदुत्व नाही, बाळासाहेबांनी सांगितलेलं आमचं हिंदुत्व आहे, असे ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व यात जमीन आसमानाचे अंतर आहे, असे नमूद करताना इथे गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता असेच तुमचे धोरण असल्याचा निशाणा उद्धव यांनी साधला.
वाचा: संजय राऊतांचा फडणवीसांना चिमटा; म्हणाले, लवकर बरे व्हा...