म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यपाल म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची नेमणूक होत असेल, तर त्यांनी देशाचे नेतृत्व करायला काय हरकत आहे, असा सवाल करत सरसंघचालक मोहन भागवत यांचे आम्ही राष्ट्रपतीपदासाठी सुचवलेले नाव हे मनापासून आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा स्पष्ट केले.
राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार कोण हे भाजपने अद्याप गुलदस्त्यात ठेवले असून पाठिंबा देण्यापूर्वी आधी कोण उमेदवार आहे याची चर्चा तरी करायला पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी उद्धव यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले. शरद पवारांनी राष्टपतिपदासाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे सुचवले आहे. त्यात त्यांचेही नाव पुढे आले आहे, त्याविषयी विचारले असता उद्धव म्हणाले, ‘शरद पवार हे मोदींचे गुरू आहेत, असे मोदींनी सांगितले आहे. त्यांना पद्मविभूषण दिले आहे. मला माहित नाही कुणाच्या मनात काय येईल. पण एकमेकांची मन जाणून घ्यायला जवळीक लागते.’
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना उद्धव म्हणाले, ‘एखादा जिल्हा आत्महत्याग्रस्त होईपर्यंत वाट न पाहता, शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नये. शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकरी रस्त्यावर उतरले, तेव्हाच पटकन दखल घेतली पाहिजे, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज लागणार नाही, असा कारभार केला पाहिजे.’
मुंबईत पेट्रोलचे दर वाढविल्याबाबत बोलताना उद्धव म्हणाले, ‘जागतिक बाजारपेठेत पेट्रोल, डिझेलचे भाव खाली आले, तरी आपल्या देशात दर खाली आले नाहीत. समान कर लावणार असू, तर देशभरात दरही समान असायला हवेत. मुंबईत सगळ्यात जास्त दराने पेट्रोल विकल जात असेल तर ते चूक आहे.’ नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाबाबतच्या बातम्यांबाबत विचारले असता, फार बोलण्याचे टाळताना ‘राणे आणि भाजप अशा दोघांनाही शुभेच्छा’ एवढेच उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यपाल म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची नेमणूक होत असेल, तर त्यांनी देशाचे नेतृत्व करायला काय हरकत आहे, असा सवाल करत सरसंघचालक मोहन भागवत यांचे आम्ही राष्ट्रपतीपदासाठी सुचवलेले नाव हे मनापासून आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा स्पष्ट केले.
राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार कोण हे भाजपने अद्याप गुलदस्त्यात ठेवले असून पाठिंबा देण्यापूर्वी आधी कोण उमेदवार आहे याची चर्चा तरी करायला पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी उद्धव यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले. शरद पवारांनी राष्टपतिपदासाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे सुचवले आहे. त्यात त्यांचेही नाव पुढे आले आहे, त्याविषयी विचारले असता उद्धव म्हणाले, ‘शरद पवार हे मोदींचे गुरू आहेत, असे मोदींनी सांगितले आहे. त्यांना पद्मविभूषण दिले आहे. मला माहित नाही कुणाच्या मनात काय येईल. पण एकमेकांची मन जाणून घ्यायला जवळीक लागते.’
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना उद्धव म्हणाले, ‘एखादा जिल्हा आत्महत्याग्रस्त होईपर्यंत वाट न पाहता, शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नये. शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकरी रस्त्यावर उतरले, तेव्हाच पटकन दखल घेतली पाहिजे, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज लागणार नाही, असा कारभार केला पाहिजे.’
मुंबईत पेट्रोलचे दर वाढविल्याबाबत बोलताना उद्धव म्हणाले, ‘जागतिक बाजारपेठेत पेट्रोल, डिझेलचे भाव खाली आले, तरी आपल्या देशात दर खाली आले नाहीत. समान कर लावणार असू, तर देशभरात दरही समान असायला हवेत. मुंबईत सगळ्यात जास्त दराने पेट्रोल विकल जात असेल तर ते चूक आहे.’ नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाबाबतच्या बातम्यांबाबत विचारले असता, फार बोलण्याचे टाळताना ‘राणे आणि भाजप अशा दोघांनाही शुभेच्छा’ एवढेच उद्धव ठाकरे म्हणाले.