अ‍ॅपशहर

उद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री : नवाब मलिक

महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच असतील आणि त्यांनी यासाठी होकार दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे. महाराष्ट्राने त्यांचा अहंकार संपवला, अशा शब्दात नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2019, 5:54 pm
मुंबई : 'महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच असतील आणि त्यांनी यासाठी होकार दिला आहे', अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे. महाराष्ट्राने त्यांचा अहंकार संपवला, अशा शब्दात नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nawab malik


संन्यास घेण्याच्या अटीवर अजित पवारांची माघार

‘हंगामी अध्यक्षांच्या माध्यमातून ऑन कॅमेरा बहुमत सिद्ध करता येणार नाही हे त्यांच्या (भाजप) लक्षात आलं. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. हे गोवा, मणिपूर आणि कर्नाटक नाही हे पवार साहेबांनी कालच सांगितलं होतं. त्यांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे. आता आमदारांच्या बैठकीत नेता निवडीचा कार्यक्रम होईल. यापूर्वी पवार साहेबांच्या उपस्थितीत बैठक झाली तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं होतं की, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील आणि उद्धव ठाकरेंनी समोरासमोर होकार दिला आहे,’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

महाविकास आघाडीचे जनक शरद पवारच: राऊत

शिवसेना ही भाजपसोबत जाऊन बिघडली होती, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या हितासाठी झाला होता, असं नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, तीन चाकांचं सरकार टीकणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्यापूर्वी केली. पण हे सरकार फक्त पाच वर्षे नाही, तर त्यापुढेही चालेल असं उद्धव ठाकरे यांनी कालच सांगितलं आहे. त्यामुळे हे सरकार समर्थपणे काम करत राहिल, असंही मलिक म्हणाले.

शरद पवारांच्या 'पॉवर गेम' पुढं सगळेच फिके

फडणवीसांचा राजीनामा

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची घोषणा केली. 'राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवलं होतं. त्यामुळे अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एक गट आमच्याकडे आल्याने आम्ही त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार बनवले. सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश आम्हाला दिले. मात्र, सकाळी अजित पवार मला भेटले आणि त्यांनी काही कारणामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं. अजित पवार यांनी माझ्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ उरले नसल्याने मीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे', असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज