म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
दिवाळी म्हणजे फटाक्यांचा कर्णकर्कश आवाज, फटाक्यांचा विचित्र वास आणि वायूप्रदूषणाचा त्रास... पण हे समीकरण बदलायचं कसं? लहान मुलं व तरुणांना यापासून परावृत्त करायचं कसं? असा प्रश्न अनेकांना पडतो. नेमकं याचंच उत्तर लोअर परळमधील नऊ चाळींमधल्या पालकांनी शोधलंय... त्यामुळे दरवर्षी या चाळींमधली शंभरहून अधिक लहान मुलं आणि तरुण-तरुणी दिवाळीच्या दिवसांत एका वेगळ्याच 'सांस्कृतिक' विश्वात दंग राहतात आणि मग स्वाभाविकपणे या चाळींमध्ये आपसूकच फटाकेविरहित आणि सर्वांना हवीहवीशी अशी 'दिवाळी' साजरी होते...
ध्वनी व वायूप्रदूषणामुळे दिवाळीतल्या फटाक्यांचा प्रश्नही ऐरणीवर आल्यानं त्यावर निर्बंध आणण्यासाठी यंदा खुद्द सर्वोच्च न्यायालयाला आदेश द्यावे लागले. त्यानंतर नागरिकांमध्ये फटाक्यांच्या दुष्परिणामांविषयीची संवेदनशीलता वाढली आहे. परंतु, त्याचवेळी लहान मुलं व तरुणांना फटाके वाजवण्यापासून परावृत्त कसं करायचं? असा प्रश्नही अनेकांच्या मनात उभा राहिला आहे. पण याचं उत्तर लोअर परळमधील नऊ चाळींचा समावेश असलेल्या संयुक्त नवी चाळ उत्सव समितीनं सात वर्षांपूर्वीच शोधलं आहे.
'सात वर्षांपूर्वीपर्यंत या चाळींमधली बहुतेक सर्व मुलं पहाटेच खाली उतरून दोन चाळींच्या मध्ये असलेल्या आवारात सुतळी बॉम्ब, लवंगी, ताजमहाल बार यासारखे अनेक फटाके वाजवून सर्वांना भंडावून सोडायचे. त्यामुळे दिवाळी सर्वांसाठीच त्रासदायक ठरत होती. यावर तोडगा काढायचा कसा? असा प्रश्न उभा राहिल्यावर दिवाळी पहाटची कल्पना पुढे आली आणि चाळींमधल्या सर्व मुला-मुलींना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त करण्याचे ठरले. त्यानुसार, गायन, नृत्य, एकांकिका, रांगोळी, किल्ले बांधणी अशा विविध स्पर्धांचं आयोजन सुरू केलं. आयोजन करण्यातही प्रामुख्यानं तरुण पिढीच पुढे असते. त्यामुळे दिवाळी सुरू होण्यापूर्वीच स्पर्धांची तयारी आणि त्यांच्या आयोजनात चाळींमधली सर्व मुलं-मुली व्यस्त होऊ लागली. या साऱ्याचा परिणाम असा झाला की ते फटाके फोडण्यापासून परावृत्त झाले आणि पालकांकडे फटाक्यांसाठी दरवर्षी होणारी त्यांची मागणीही बंद झाली. त्यामुळे एकीकडे दिवाळी सणाचा आनंद लुटतानाच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही सर्व रहिवाशांना दरवर्षी मिळत असते', अशी माहिती समितीचे सचिव सदानंद शिंदे यांनी 'मटा'ला दिली.
शब्दश: 'दिवाळी पहाट'
शहरातल्या अनेक भागांमध्ये 'दिवाळी पहाट' फटाक्यांच्या आवाजानं सुरू होते, पण जवळपास ७५० कुटुंबं राहत असलेल्या या चाळींमध्ये शब्दश: 'दिवाळी पहाट' साजरी होते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासूनच चाळींमधली तमाम मुलं-मुली स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात दंग होतात आणि त्याचा आनंद लुटण्यात त्यांचे पालकही व्यस्त होतात. त्यामुळे या चाळींमध्ये फटाक्यांचं नावच नसतं. अशाप्रकारे या चाळींनी इतर चाळी व हाऊसिंग सोसायट्यांसमोर एकप्रकारे आदर्शच ठेवला आहे.
दिवाळी म्हणजे फटाक्यांचा कर्णकर्कश आवाज, फटाक्यांचा विचित्र वास आणि वायूप्रदूषणाचा त्रास... पण हे समीकरण बदलायचं कसं? लहान मुलं व तरुणांना यापासून परावृत्त करायचं कसं? असा प्रश्न अनेकांना पडतो. नेमकं याचंच उत्तर लोअर परळमधील नऊ चाळींमधल्या पालकांनी शोधलंय... त्यामुळे दरवर्षी या चाळींमधली शंभरहून अधिक लहान मुलं आणि तरुण-तरुणी दिवाळीच्या दिवसांत एका वेगळ्याच 'सांस्कृतिक' विश्वात दंग राहतात आणि मग स्वाभाविकपणे या चाळींमध्ये आपसूकच फटाकेविरहित आणि सर्वांना हवीहवीशी अशी 'दिवाळी' साजरी होते...
ध्वनी व वायूप्रदूषणामुळे दिवाळीतल्या फटाक्यांचा प्रश्नही ऐरणीवर आल्यानं त्यावर निर्बंध आणण्यासाठी यंदा खुद्द सर्वोच्च न्यायालयाला आदेश द्यावे लागले. त्यानंतर नागरिकांमध्ये फटाक्यांच्या दुष्परिणामांविषयीची संवेदनशीलता वाढली आहे. परंतु, त्याचवेळी लहान मुलं व तरुणांना फटाके वाजवण्यापासून परावृत्त कसं करायचं? असा प्रश्नही अनेकांच्या मनात उभा राहिला आहे. पण याचं उत्तर लोअर परळमधील नऊ चाळींचा समावेश असलेल्या संयुक्त नवी चाळ उत्सव समितीनं सात वर्षांपूर्वीच शोधलं आहे.
'सात वर्षांपूर्वीपर्यंत या चाळींमधली बहुतेक सर्व मुलं पहाटेच खाली उतरून दोन चाळींच्या मध्ये असलेल्या आवारात सुतळी बॉम्ब, लवंगी, ताजमहाल बार यासारखे अनेक फटाके वाजवून सर्वांना भंडावून सोडायचे. त्यामुळे दिवाळी सर्वांसाठीच त्रासदायक ठरत होती. यावर तोडगा काढायचा कसा? असा प्रश्न उभा राहिल्यावर दिवाळी पहाटची कल्पना पुढे आली आणि चाळींमधल्या सर्व मुला-मुलींना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त करण्याचे ठरले. त्यानुसार, गायन, नृत्य, एकांकिका, रांगोळी, किल्ले बांधणी अशा विविध स्पर्धांचं आयोजन सुरू केलं. आयोजन करण्यातही प्रामुख्यानं तरुण पिढीच पुढे असते. त्यामुळे दिवाळी सुरू होण्यापूर्वीच स्पर्धांची तयारी आणि त्यांच्या आयोजनात चाळींमधली सर्व मुलं-मुली व्यस्त होऊ लागली. या साऱ्याचा परिणाम असा झाला की ते फटाके फोडण्यापासून परावृत्त झाले आणि पालकांकडे फटाक्यांसाठी दरवर्षी होणारी त्यांची मागणीही बंद झाली. त्यामुळे एकीकडे दिवाळी सणाचा आनंद लुटतानाच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही सर्व रहिवाशांना दरवर्षी मिळत असते', अशी माहिती समितीचे सचिव सदानंद शिंदे यांनी 'मटा'ला दिली.
शब्दश: 'दिवाळी पहाट'
शहरातल्या अनेक भागांमध्ये 'दिवाळी पहाट' फटाक्यांच्या आवाजानं सुरू होते, पण जवळपास ७५० कुटुंबं राहत असलेल्या या चाळींमध्ये शब्दश: 'दिवाळी पहाट' साजरी होते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासूनच चाळींमधली तमाम मुलं-मुली स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात दंग होतात आणि त्याचा आनंद लुटण्यात त्यांचे पालकही व्यस्त होतात. त्यामुळे या चाळींमध्ये फटाक्यांचं नावच नसतं. अशाप्रकारे या चाळींनी इतर चाळी व हाऊसिंग सोसायट्यांसमोर एकप्रकारे आदर्शच ठेवला आहे.