म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
ड्रोन कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली बुधवारी वाशीतील घाऊक बाजार समितीमधील भाजीपाला आणि कांदा-बटाटा बाजार सुरू करण्यात आले. बाजारात मालाच्या गाड्या आणण्यावर निर्बंध घातल्याने व्यापाऱ्यांनी मोजक्याच गाड्या मागवल्या होत्या. त्यामुळे बाजारात शिस्तीत व्यापार सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. यापुढेही बाजारात हेच चित्र पाहायला मिळावे, अशी अपेक्षा व्यापारी कामगार आणि बाजार समिती घटकांनी व्यक्त केली आहे.
मुंबई आणि मुंबईला लागून असलेल्या उपनगरांना भाजीपाला आणि कांदा-बटाट्याचा पुरवठा करणारे बाजार ११ एप्रिलपासून बंद होते. घाऊक बाजार बंद असले तरी कांदा-बटाटा, भाजीपाल्याच्या गाड्या थेट शहरात जात होत्या. मात्र भाजीपाल्याचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत होता. त्यामुळे गुरुवारी अखेर वाशीतील घाऊक बाजार नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरू करण्यात आले. बुधवारी घाऊक भाजीपाला बाजारात १३ ट्रक आणि १८० टेम्पो अशी एकूण १९३ गाड्यांची आवक झाली तर ४९१ थ्री व्हीलर टेम्पो भाजीपाला बाजाराबाहेर गेला. वेगवगेळ्या चेकनाक्यांवरून ३९८ गाड्या भाजीपाला मुंबईत रवाना झाला.
भाजीपाला बाजारा प्रमाणेच कांदा-बटाटा बाजारही ११ एप्रिल पासून बंद होते. तेही बुधवारी सुरळीत सुरू झाले. कांदा-बटाटा बाजारातही एकूण १५० गाड्या आल्याची नोंद आहे, तर ६७ गाड्या माल बाजाराबाहेर गेला आहे. मात्र, बाजारात गर्दी मात्र नव्हती.
बाजारातील गर्दी आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आता दोन ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. यामुळे बाजारात कुठे काय सुरू आहे, हे कळेल. तसेच जिथे गर्दी होईल त्या ठिकाणी पोलिसांना लगेच पोहोचता येणार आहे. बाजारात सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करूनही गर्दी पूर्णपणे नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे आत्ता या ड्रोन कॅमेऱ्यांनी बाजारावर लक्ष ठेवले जाणार आहे.
अन्नधान्य आणि फळबाजार मात्र बंद आहे. हे बाजार सुरू करण्याबाबत बाजार समिती प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार अन्नधान्य बाजार आज, गुरुवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ड्रोन कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली बुधवारी वाशीतील घाऊक बाजार समितीमधील भाजीपाला आणि कांदा-बटाटा बाजार सुरू करण्यात आले. बाजारात मालाच्या गाड्या आणण्यावर निर्बंध घातल्याने व्यापाऱ्यांनी मोजक्याच गाड्या मागवल्या होत्या. त्यामुळे बाजारात शिस्तीत व्यापार सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. यापुढेही बाजारात हेच चित्र पाहायला मिळावे, अशी अपेक्षा व्यापारी कामगार आणि बाजार समिती घटकांनी व्यक्त केली आहे.
मुंबई आणि मुंबईला लागून असलेल्या उपनगरांना भाजीपाला आणि कांदा-बटाट्याचा पुरवठा करणारे बाजार ११ एप्रिलपासून बंद होते. घाऊक बाजार बंद असले तरी कांदा-बटाटा, भाजीपाल्याच्या गाड्या थेट शहरात जात होत्या. मात्र भाजीपाल्याचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत होता. त्यामुळे गुरुवारी अखेर वाशीतील घाऊक बाजार नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरू करण्यात आले. बुधवारी घाऊक भाजीपाला बाजारात १३ ट्रक आणि १८० टेम्पो अशी एकूण १९३ गाड्यांची आवक झाली तर ४९१ थ्री व्हीलर टेम्पो भाजीपाला बाजाराबाहेर गेला. वेगवगेळ्या चेकनाक्यांवरून ३९८ गाड्या भाजीपाला मुंबईत रवाना झाला.
भाजीपाला बाजारा प्रमाणेच कांदा-बटाटा बाजारही ११ एप्रिल पासून बंद होते. तेही बुधवारी सुरळीत सुरू झाले. कांदा-बटाटा बाजारातही एकूण १५० गाड्या आल्याची नोंद आहे, तर ६७ गाड्या माल बाजाराबाहेर गेला आहे. मात्र, बाजारात गर्दी मात्र नव्हती.
बाजारातील गर्दी आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आता दोन ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. यामुळे बाजारात कुठे काय सुरू आहे, हे कळेल. तसेच जिथे गर्दी होईल त्या ठिकाणी पोलिसांना लगेच पोहोचता येणार आहे. बाजारात सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करूनही गर्दी पूर्णपणे नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे आत्ता या ड्रोन कॅमेऱ्यांनी बाजारावर लक्ष ठेवले जाणार आहे.
अन्नधान्य आणि फळबाजार मात्र बंद आहे. हे बाजार सुरू करण्याबाबत बाजार समिती प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार अन्नधान्य बाजार आज, गुरुवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.