म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
अभ्यासाची स्पर्धा आणि शर्यतीत धावण्याचा ताण यामुळे सध्याची तरुणाई अनेकदा तणावाखाली दिसून येते आणि यातूनच ते आत्महत्येचे पाऊल उचलतात. अनिकेते अंभोरे हा आयआयटीमध्ये शिकणारा मुलगा २०१४ मध्ये अशाच ताणाचा बळी ठरला आणि नैराश्यात जाऊन त्याने आत्महत्या केली. मात्र इतर कोणी त्याच्यासारखे पाऊल उचलू नये यासाठी आता त्याचे आई-वडील प्रयत्न करणार असून ती त्याला खरी श्रद्धांजली ठरेल असे त्यांना वाटते.
आपला मुलगा गेला, मात्र तरुण मुलाने असे सोडून जाण्याचे दु:ख इतर मातापित्यांच्या वाटेला येऊ नये यासाठी अनिकेतची एसआयईएस कॉलेजध्ये हिंदी भाषेची शिक्षिका असलेली आई सुनिता आणि वडील संजय यांनी पुढाकार घेतला असून त्याच्या नावाने अनिकेत फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या माध्यमातून ते शाळाशाळांमध्ये जाऊन मुलांचे समुपदेशन करणार आहेत. यासाठी ते विविध क्षेत्रातील मान्यवरांची मदतही घेणार आहेत. सध्याची तरुणाई मोठ्या ताणाखाली असलेली दिसून येते. अशावेळी त्यांना योग्य तो सल्ला मिळणे आवश्यक असते. तसे न झाल्यास स्पर्धेत ते भरकटतात आणि त्यांना नैराश्य येते. म्हणून अशा विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा मानस असल्याचे सुनिता अंबोरे यांनी सांगितले. सुरुवातीला कवी अरुण म्हात्रे यांच्यासोबत एक समुपदेशक घेऊन शाळांमध्ये जाऊन या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळत आहे, याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर भविष्यात एखादा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे पाहिले सत्र येत्या उद्या, ३० ऑक्टोबर रोजी ऐरोली येथील ज्ञानदीप विद्यालयात होणार आहे. यात कवी अरुण म्हात्रे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
हलक्या फुलक्या गप्पांत रमवणार
मुलांना सल्ला देण्यापेक्षा हलक्या फुलक्या गप्पांतून त्यांना समजावलेले लवकर लक्षात राहते. हाच धागा पकडत कवी अरुण म्हात्रे यांनी कविता व गप्पांचा कार्यक्रम शाळांमध्ये करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या या कार्यक्रमात एक समुपदेशकही असतील जे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. सध्याच्या काळात अशा कार्यक्रमांची गरज असून भविष्यात असे कार्यक्रम करत असताना सेलिब्रिटींनाही सहभागी करून घेण्याचा मानस असल्याचे कवी म्हात्रे यांनी सांगितले. या सहभागामुळे मुले अधिक खुलतील व मोकळेपणाने बोलतील आणि हळूहळू ती ताणमुक्त होतील, अशी त्यांची अपेक्षा आहे.
अभ्यासाची स्पर्धा आणि शर्यतीत धावण्याचा ताण यामुळे सध्याची तरुणाई अनेकदा तणावाखाली दिसून येते आणि यातूनच ते आत्महत्येचे पाऊल उचलतात. अनिकेते अंभोरे हा आयआयटीमध्ये शिकणारा मुलगा २०१४ मध्ये अशाच ताणाचा बळी ठरला आणि नैराश्यात जाऊन त्याने आत्महत्या केली. मात्र इतर कोणी त्याच्यासारखे पाऊल उचलू नये यासाठी आता त्याचे आई-वडील प्रयत्न करणार असून ती त्याला खरी श्रद्धांजली ठरेल असे त्यांना वाटते.
आपला मुलगा गेला, मात्र तरुण मुलाने असे सोडून जाण्याचे दु:ख इतर मातापित्यांच्या वाटेला येऊ नये यासाठी अनिकेतची एसआयईएस कॉलेजध्ये हिंदी भाषेची शिक्षिका असलेली आई सुनिता आणि वडील संजय यांनी पुढाकार घेतला असून त्याच्या नावाने अनिकेत फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या माध्यमातून ते शाळाशाळांमध्ये जाऊन मुलांचे समुपदेशन करणार आहेत. यासाठी ते विविध क्षेत्रातील मान्यवरांची मदतही घेणार आहेत. सध्याची तरुणाई मोठ्या ताणाखाली असलेली दिसून येते. अशावेळी त्यांना योग्य तो सल्ला मिळणे आवश्यक असते. तसे न झाल्यास स्पर्धेत ते भरकटतात आणि त्यांना नैराश्य येते. म्हणून अशा विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा मानस असल्याचे सुनिता अंबोरे यांनी सांगितले. सुरुवातीला कवी अरुण म्हात्रे यांच्यासोबत एक समुपदेशक घेऊन शाळांमध्ये जाऊन या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळत आहे, याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर भविष्यात एखादा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे पाहिले सत्र येत्या उद्या, ३० ऑक्टोबर रोजी ऐरोली येथील ज्ञानदीप विद्यालयात होणार आहे. यात कवी अरुण म्हात्रे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
हलक्या फुलक्या गप्पांत रमवणार
मुलांना सल्ला देण्यापेक्षा हलक्या फुलक्या गप्पांतून त्यांना समजावलेले लवकर लक्षात राहते. हाच धागा पकडत कवी अरुण म्हात्रे यांनी कविता व गप्पांचा कार्यक्रम शाळांमध्ये करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या या कार्यक्रमात एक समुपदेशकही असतील जे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. सध्याच्या काळात अशा कार्यक्रमांची गरज असून भविष्यात असे कार्यक्रम करत असताना सेलिब्रिटींनाही सहभागी करून घेण्याचा मानस असल्याचे कवी म्हात्रे यांनी सांगितले. या सहभागामुळे मुले अधिक खुलतील व मोकळेपणाने बोलतील आणि हळूहळू ती ताणमुक्त होतील, अशी त्यांची अपेक्षा आहे.