मुंबई: उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे १३ आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. पुढील काही दिवसांमध्ये भाजपमधील नेते दररोज पक्ष सोडतील. यामध्ये भाजपच्या १३ आमदार आणि काही ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असल्याचे पवार यांनी सांगितले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समजावादी पक्ष आणि इतर लहान पक्षांसोबत मिळून उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. उत्तर प्रदेशातील चित्र बदलत असून तिथे परिवर्तन होणार आहे. लोकांना बदल हवा आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपचा राजीनामा दिला ही तर सुरुवात आहे. पुढील काही दिवसांत भाजपचे आणखी नेते परिवर्तनाच्या प्रक्रियेत सामील होतील. दररोज एक नवा चेहरा पक्ष सोडेल, असे शरद पवार यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप
उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक दिग्गज नेता अशी ओळख असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज बॉम्ब फोडला. मौर्य यांनी मंत्रिपद आणि पक्षाचा त्याग करत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर भाजपला आणखीही धक्के बसले असून तीन आमदारांनीही आज भाजपला रामराम ठोकला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे. खुद्द उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. स्वामीप्रसाद मौर्य यांनी राजीनामा का दिला, मला माहीत नाही. त्यांनी घाईघाईत असा निर्णय घेऊ नये. काही मुद्दे असतील तर त्यावर चर्चा करता येईल. असे घाईत घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात, असे नमूद करत केशव प्रसाद मौर्य यांनी एकप्रकारे स्वामी प्रसाद यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, स्वामी प्रसाद हे आता माघार घेतील, अशी सूतराम शक्यता नाही.
स्वामीप्रसाद मौर्य यांच्यापाठोपाठ आणखी तीन धक्के आजच भाजपला बसले आहेत. मौर्य यांचे समर्थक मानले जाणारे बांदा येथील तिंदवारी मतदारसंघाचे आमदार ब्रजेश प्रजापती, शाहजहानपूरमधील तिलहरचे आमदार रोशनलाल वर्मा आणि कानपूरमधील बिल्हौरचे आमदार भगवती सागर यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. हे तिन्ही आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करणार हेसुद्धा निश्चित झाले आहे.
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप
उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक दिग्गज नेता अशी ओळख असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज बॉम्ब फोडला. मौर्य यांनी मंत्रिपद आणि पक्षाचा त्याग करत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर भाजपला आणखीही धक्के बसले असून तीन आमदारांनीही आज भाजपला रामराम ठोकला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे. खुद्द उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. स्वामीप्रसाद मौर्य यांनी राजीनामा का दिला, मला माहीत नाही. त्यांनी घाईघाईत असा निर्णय घेऊ नये. काही मुद्दे असतील तर त्यावर चर्चा करता येईल. असे घाईत घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात, असे नमूद करत केशव प्रसाद मौर्य यांनी एकप्रकारे स्वामी प्रसाद यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, स्वामी प्रसाद हे आता माघार घेतील, अशी सूतराम शक्यता नाही.
स्वामीप्रसाद मौर्य यांच्यापाठोपाठ आणखी तीन धक्के आजच भाजपला बसले आहेत. मौर्य यांचे समर्थक मानले जाणारे बांदा येथील तिंदवारी मतदारसंघाचे आमदार ब्रजेश प्रजापती, शाहजहानपूरमधील तिलहरचे आमदार रोशनलाल वर्मा आणि कानपूरमधील बिल्हौरचे आमदार भगवती सागर यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. हे तिन्ही आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करणार हेसुद्धा निश्चित झाले आहे.