अ‍ॅपशहर

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतल्यानंतर मंडळाने आता हा उद्घाटकपदाचा मान एका सामान्य महिलेला दिला आहे. वैशाली सुधाकर येडे असं या महिलेचं नाव आहे. वैशाली ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2019, 7:28 pm
मुंबई :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vaishali-yede


९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतल्यानंतर मंडळाने आता हा उद्घाटकपदाचा मान एका सामान्य महिलेला दिला आहे. वैशाली सुधाकर येडे असं या महिलेचं नाव आहे. वैशाली ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आहे.

वैशाली येडे या कळंब तालुक्यातील राजुर येथील रहिवासी आहेत. त्यांना दोन मुले आहेत, तसेच त्यांची तीन एकर जमीन आहे. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्यांच्या शेतकरी पतीने आत्महत्या केली. त्यानंतर त्या 'तेरव' या नाटकाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्येविरोधात काम करतात. हे नाटक श्याम पेठकर यांनी लिहिले असून हरीश इथापे यांनी दिग्दर्शित केले आहे. वैशालीची या नाटकात भूमिका आहे. एका सामान्य महिलेला साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटकपदाचा मान मिळाला आहे. महामंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी ही घोषणा केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज