म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे साहित्य व विचार याविषयी पीएचडीसाठी संशोधन करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची पाठ्यवृत्ती भाजपातर्फे देण्यात येईल. राज्यातील सर्व तेरा विद्यापीठांमध्ये त्यांच्या विचारांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल व त्यासाठी राज्य सरकार वीस कोटी रुपयांची तरतूद करेल, अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी केली. तसेच वाजपेयींना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत आज, बुधवारी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत एनसीपीए सभागृहात आज, बुधवारी सायंकाळी ६ वाजता सभेचे आयोजन केले आहे. या सभेमध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे नेते सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरही सभेत सहभागी होतील. दुपारी चार वाजता अटलजींचा अस्थिकलश मुंबईत आणण्यात येईल. महाराष्ट्रातील मुंबई, पंढरपूर, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कराड, कर्जत, महाड व सांगली येथील नद्यांमध्ये अस्थिविसर्जन करण्यात येईल. जे नागरिक व कार्यकर्ते यांच्याकडे अटलजींच्या अनेक आठवणी व फोटो आहेत. त्यांनी आठवणींच्या नोंदी आणि छायाचित्रे atalsmruti@gmail.com या ईमेलवर तीस दिवसात पाठवाव्यात. त्यांचे संकलन करून एक पुस्तक तयार करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे साहित्य व विचार याविषयी पीएचडीसाठी संशोधन करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची पाठ्यवृत्ती भाजपातर्फे देण्यात येईल. राज्यातील सर्व तेरा विद्यापीठांमध्ये त्यांच्या विचारांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल व त्यासाठी राज्य सरकार वीस कोटी रुपयांची तरतूद करेल, अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी केली. तसेच वाजपेयींना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत आज, बुधवारी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत एनसीपीए सभागृहात आज, बुधवारी सायंकाळी ६ वाजता सभेचे आयोजन केले आहे. या सभेमध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे नेते सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरही सभेत सहभागी होतील. दुपारी चार वाजता अटलजींचा अस्थिकलश मुंबईत आणण्यात येईल. महाराष्ट्रातील मुंबई, पंढरपूर, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कराड, कर्जत, महाड व सांगली येथील नद्यांमध्ये अस्थिविसर्जन करण्यात येईल. जे नागरिक व कार्यकर्ते यांच्याकडे अटलजींच्या अनेक आठवणी व फोटो आहेत. त्यांनी आठवणींच्या नोंदी आणि छायाचित्रे atalsmruti@gmail.com या ईमेलवर तीस दिवसात पाठवाव्यात. त्यांचे संकलन करून एक पुस्तक तयार करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.