म. टा. प्रतिनिधी, मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने पूर्ण तयारी केली असून, राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांत लढण्याची तयारी आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दर्शवली. 'वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या नावाची पहिली यादी ३० जुलै रोजी जाहीर करण्यात येईल', असे सांगतानाच, 'विधानसभेसाठी अद्याप कुठल्याही पक्षाशी आमची बोलणी अथवा संपर्क झालेला नाही', असे त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित जागा मिळू शकल्या नाहीत. त्यावर, 'आघाडीला सत्ताधारी भाजपने नव्हे तर ईव्हीएम यंत्रणेने पराभूत केले आहे', असा आरोप आंबेडकर यांनी केला. 'ईव्हीएम यंत्रणेत छेडछाड होऊ शकते. यापुढील निवडणुकांमध्ये ईव्हीएम यंत्रांचा वापर करता कामा नये. बऱ्याच मतदारसंघात मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणी यातील आकड्यात फरक आहे', असा दावा आंबेडकर यांनी केला. 'आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला दोन आकडी जागा मिळणार आहेत', असे भाकित त्यांनी केले. 'वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप धादांत खोटा आहे. आता त्यांनी बी-टीम असल्याचे पुरावे द्यावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना राज्यभरात ४० लाख मते देणाऱ्या मतदारांची माफी मागावी', अशी मागणी आंबेडकर यांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने पूर्ण तयारी केली असून, राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांत लढण्याची तयारी आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दर्शवली. 'वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या नावाची पहिली यादी ३० जुलै रोजी जाहीर करण्यात येईल', असे सांगतानाच, 'विधानसभेसाठी अद्याप कुठल्याही पक्षाशी आमची बोलणी अथवा संपर्क झालेला नाही', असे त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित जागा मिळू शकल्या नाहीत. त्यावर, 'आघाडीला सत्ताधारी भाजपने नव्हे तर ईव्हीएम यंत्रणेने पराभूत केले आहे', असा आरोप आंबेडकर यांनी केला. 'ईव्हीएम यंत्रणेत छेडछाड होऊ शकते. यापुढील निवडणुकांमध्ये ईव्हीएम यंत्रांचा वापर करता कामा नये. बऱ्याच मतदारसंघात मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणी यातील आकड्यात फरक आहे', असा दावा आंबेडकर यांनी केला. 'आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला दोन आकडी जागा मिळणार आहेत', असे भाकित त्यांनी केले. 'वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप धादांत खोटा आहे. आता त्यांनी बी-टीम असल्याचे पुरावे द्यावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना राज्यभरात ४० लाख मते देणाऱ्या मतदारांची माफी मागावी', अशी मागणी आंबेडकर यांनी केली.