म. टा. प्रतिनिधी, मुंबई
ज्येष्ठ अभिनेत्री आणि ‘मी...मिठाची बाहुली’ या आत्मचरित्राने साहित्यविश्वात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या लेखिका वंदना मिश्र यांचे शुक्रवारी बोरिवली येथे राहत्या घरी झोपेतच निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. ज्येष्ठ पत्रकार, लेखक अंबरिश मिश्र यांच्या त्या आई होत्या.
वंदना मिश्र यांनी वयाच्या १५व्या वर्षी घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. ‘सारस्वत’ या मामा वरेरकरांच्या नाटकामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांनी विविध दिग्दर्शक आणि कलावंतांसोबत काम केले. गुजराती, राजस्थानी नाटकांमध्येही त्यांनी काम केले. त्यांनी ‘मी…मिठाची बाहुली’मधून आपला गुजराती, राजस्थानी रंगभूमीवरचा प्रवास, स्वातंत्र्यपूर्व भारतातील मुंबई, तेव्हाचे समाजजीवन, राजकीय चळवळी, फाळणीचे पडसाद आदी विषयांचा वेध घेतला आहे. त्यांच्या या पुस्तकाचा इंग्रजीमधून अनुवाद झालेला आहे. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक विश्वातील दिग्गज उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेत्री आणि ‘मी...मिठाची बाहुली’ या आत्मचरित्राने साहित्यविश्वात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या लेखिका वंदना मिश्र यांचे शुक्रवारी बोरिवली येथे राहत्या घरी झोपेतच निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. ज्येष्ठ पत्रकार, लेखक अंबरिश मिश्र यांच्या त्या आई होत्या.
वंदना मिश्र यांनी वयाच्या १५व्या वर्षी घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. ‘सारस्वत’ या मामा वरेरकरांच्या नाटकामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांनी विविध दिग्दर्शक आणि कलावंतांसोबत काम केले. गुजराती, राजस्थानी नाटकांमध्येही त्यांनी काम केले. त्यांनी ‘मी…मिठाची बाहुली’मधून आपला गुजराती, राजस्थानी रंगभूमीवरचा प्रवास, स्वातंत्र्यपूर्व भारतातील मुंबई, तेव्हाचे समाजजीवन, राजकीय चळवळी, फाळणीचे पडसाद आदी विषयांचा वेध घेतला आहे. त्यांच्या या पुस्तकाचा इंग्रजीमधून अनुवाद झालेला आहे. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक विश्वातील दिग्गज उपस्थित होते.