म. टा. प्रतिनिधी, मुंबई: नवरात्रोत्सव संपला तरी अद्याप पावसाळा संपलेला नाही. याचा भाज्यांवर विपरित परिणाम झाला आहे. आवक रोडवल्यामुळे घाऊक बाजारातच सर्व भाज्या सरासरी ५० रुपये किलोच्या वर गेल्या आहेत. त्यातून माल खराब असल्याने विक्रेते त्रस्त आहेत.
यंदा प्रचंड पाऊस व पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यातील मुख्य पीक वाहून गेले किंवा खराब झाले. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी तेच पीक उशिराने घेतले. पण अनेक भागांत अद्यापही पाऊस असल्याने त्याचा या पिकालाही फटका बसला आहे. याबाबत मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक व्यापारी प्रशांत जगताप यांनी सांगितले की, 'आधीची अतिवृष्टी व आताच्या लांबलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका फळभाज्यांना बसला आहे. महाराष्ट्रातील माल खराब असल्याने अन्य राज्यांतून भाज्या मागविण्याचा विचार झाला. पण मध्य प्रदेशसारख्या अन्य राज्यांतही सध्या पूरस्थिती आहे. याचा भाज्यांची आवक व किमतीवर परिणाम झाला आहे.'
आवक घसरली
मुंबई व परिसरासाठी या काळात दररोज साधारण चार हजार टन भाज्यांची आवक होत असते. यंदा ती २,८००-३,००० टनांपर्यंत घसरली आहे. यंदा पावसामुळे बराच माल खराब दर्जाचा आहे. एखादा किरकोळ विक्रेता १०० किलो भाजी घाऊक बाजारातून विकत घेत असल्यास त्याला ३० ते ४० किलो भाजी फेकावी लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे त्याला ६० किलोत १०० किलोचा खर्च भरून काढावा लागत आहे. हेच दरवाढीचे मुख्य कारण ठरत आहे.
आता सर्वत्र बऱ्यापैकी पाऊस थांबला असल्याने, वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या भाजीपाल्याची आवक होत आहे. त्यामुळे दर कमी झाले असून भाजीपाला खराब होण्याचे प्रकारही थांबले आहेत. मात्र अनेक किरकोळ व्यापारी माल खराब असल्याचे सांगून, चढ्या दराने भाजीपाल्याची विक्री करत आहेत.
- सोपान मेहर, घाऊक व्यापारी
प्रमुख भाज्यांचे किरकोळ दर (प्रति किलो रुपये)
भाजी आधी आता
भेंडी ८०-१०० १००-१२०
फुलकोबी १२० १२०-१४०
घेवडा ६०-८० ८०-१००
फरसबी ६०-८० ९०-१००
गवार ४०-६० ६०-८०
ढोबळी मिरची ४०-५० ६०-८०
पडवळ ४० ६०
टोमॅटो ४०-५० ६०-८०
हिरवी मिरची ४० ६०
तोंडली ६० ८०-१००
काकडी ४० ६०
यंदा प्रचंड पाऊस व पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यातील मुख्य पीक वाहून गेले किंवा खराब झाले. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी तेच पीक उशिराने घेतले. पण अनेक भागांत अद्यापही पाऊस असल्याने त्याचा या पिकालाही फटका बसला आहे. याबाबत मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक व्यापारी प्रशांत जगताप यांनी सांगितले की, 'आधीची अतिवृष्टी व आताच्या लांबलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका फळभाज्यांना बसला आहे. महाराष्ट्रातील माल खराब असल्याने अन्य राज्यांतून भाज्या मागविण्याचा विचार झाला. पण मध्य प्रदेशसारख्या अन्य राज्यांतही सध्या पूरस्थिती आहे. याचा भाज्यांची आवक व किमतीवर परिणाम झाला आहे.'
आवक घसरली
मुंबई व परिसरासाठी या काळात दररोज साधारण चार हजार टन भाज्यांची आवक होत असते. यंदा ती २,८००-३,००० टनांपर्यंत घसरली आहे. यंदा पावसामुळे बराच माल खराब दर्जाचा आहे. एखादा किरकोळ विक्रेता १०० किलो भाजी घाऊक बाजारातून विकत घेत असल्यास त्याला ३० ते ४० किलो भाजी फेकावी लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे त्याला ६० किलोत १०० किलोचा खर्च भरून काढावा लागत आहे. हेच दरवाढीचे मुख्य कारण ठरत आहे.
आता सर्वत्र बऱ्यापैकी पाऊस थांबला असल्याने, वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या भाजीपाल्याची आवक होत आहे. त्यामुळे दर कमी झाले असून भाजीपाला खराब होण्याचे प्रकारही थांबले आहेत. मात्र अनेक किरकोळ व्यापारी माल खराब असल्याचे सांगून, चढ्या दराने भाजीपाल्याची विक्री करत आहेत.
- सोपान मेहर, घाऊक व्यापारी
प्रमुख भाज्यांचे किरकोळ दर (प्रति किलो रुपये)
भाजी आधी आता
भेंडी ८०-१०० १००-१२०
फुलकोबी १२० १२०-१४०
घेवडा ६०-८० ८०-१००
फरसबी ६०-८० ९०-१००
गवार ४०-६० ६०-८०
ढोबळी मिरची ४०-५० ६०-८०
पडवळ ४० ६०
टोमॅटो ४०-५० ६०-८०
हिरवी मिरची ४० ६०
तोंडली ६० ८०-१००
काकडी ४० ६०