मुंबई मिरर
स्वच्छता मोहीम राबवून वर्सोवा समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अबाधित ठेवणाऱ्या आणि पर्यावरण रक्षणात खारीचा वाटा उचलणारा मुंबईतील स्वच्छतादूत अफरोज शहाला काही समाजकंटकांनी शिवीगाळ आणि धमकावल्याची घटना समोर आली आहे. यामुळे दुखावलेल्या अफरोजने ही स्वच्छता मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या कार्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्याचे 'मन की बात'मधून कौतुक केले होते.
हा देश, शहर आणि पर्यावरण रक्षणासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. पण मी आता हरलो आहे, अशी खंत अफरोजनं व्यक्त केली आहे. तब्बल १०९ आठवड्यानंतर वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहीम बंद करत आहे, असेही त्याने जाहीर केले आहे. समुद्रकिनारी स्वच्छता करणाऱ्या स्वयंसेवकांना धमकावणाऱ्यांवर कारवाई, तसेच किनाऱ्यावर जमा झालेला कचरा उचलण्यासाठी मुंबई महापालिकेने सहकार्य केल्यास ही मोहीम पुन्हा सुरू करण्याची इच्छा आहे, असेही तो म्हणाला.
गेल्या रविवारी काही लोकांनी समुद्रकिनारी स्वच्छता करणाऱ्या स्वयंसेवकांना शिवीगाळ तसेच धमकावले. पोलिसांना बोलावण्याचा प्रयत्न केला. पण ते वेळेत पोहोचले नाहीत, असेही शहाने सांगितले. समुद्रकिनारी रात्री मद्यपार्टी करणाऱ्या लोकांनी हे कृत्य केले असावे, असा संशय त्याला आहे. वर्सोव्यातील स्थानिक लोकांनी हे कृत्य केलेले नाही याची मला खात्री आहे. त्यांनी स्वच्छता मोहिमेला नेहमीच पाठिंबा दिला आहे. हे कृत्य कोणीतरी बाहेरच्या व्यक्तींनी केले आहे, असेही तो म्हणाला.
स्वच्छता मोहीम राबवून वर्सोवा समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अबाधित ठेवणाऱ्या आणि पर्यावरण रक्षणात खारीचा वाटा उचलणारा मुंबईतील स्वच्छतादूत अफरोज शहाला काही समाजकंटकांनी शिवीगाळ आणि धमकावल्याची घटना समोर आली आहे. यामुळे दुखावलेल्या अफरोजने ही स्वच्छता मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या कार्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्याचे 'मन की बात'मधून कौतुक केले होते.
हा देश, शहर आणि पर्यावरण रक्षणासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. पण मी आता हरलो आहे, अशी खंत अफरोजनं व्यक्त केली आहे. तब्बल १०९ आठवड्यानंतर वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहीम बंद करत आहे, असेही त्याने जाहीर केले आहे. समुद्रकिनारी स्वच्छता करणाऱ्या स्वयंसेवकांना धमकावणाऱ्यांवर कारवाई, तसेच किनाऱ्यावर जमा झालेला कचरा उचलण्यासाठी मुंबई महापालिकेने सहकार्य केल्यास ही मोहीम पुन्हा सुरू करण्याची इच्छा आहे, असेही तो म्हणाला.
गेल्या रविवारी काही लोकांनी समुद्रकिनारी स्वच्छता करणाऱ्या स्वयंसेवकांना शिवीगाळ तसेच धमकावले. पोलिसांना बोलावण्याचा प्रयत्न केला. पण ते वेळेत पोहोचले नाहीत, असेही शहाने सांगितले. समुद्रकिनारी रात्री मद्यपार्टी करणाऱ्या लोकांनी हे कृत्य केले असावे, असा संशय त्याला आहे. वर्सोव्यातील स्थानिक लोकांनी हे कृत्य केलेले नाही याची मला खात्री आहे. त्यांनी स्वच्छता मोहिमेला नेहमीच पाठिंबा दिला आहे. हे कृत्य कोणीतरी बाहेरच्या व्यक्तींनी केले आहे, असेही तो म्हणाला.