अ‍ॅपशहर

वर्सोवा उड्डाणपुलाचा प्रश्न न्यायालयात

मुंबई व ठाण्याला जोडणाऱ्या, पाच दशकांहून अधिक जुन्या वर्सोवा उड्डाणपुलाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात आला आहे. या पुलाची दुरुस्ती करून कोणताही उपयोग होणार नसल्याने हा जुना पूल पाडून नवा बांधण्याची विनंती करणारी जनहित याचिका काही स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Maharashtra Times 19 Apr 2017, 1:49 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम versova bridge issue in court
वर्सोवा उड्डाणपुलाचा प्रश्न न्यायालयात


मुंबई व ठाण्याला जोडणाऱ्या, पाच दशकांहून अधिक जुन्या वर्सोवा उड्डाणपुलाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात आला आहे. या पुलाची दुरुस्ती करून कोणताही उपयोग होणार नसल्याने हा जुना पूल पाडून नवा बांधण्याची विनंती करणारी जनहित याचिका काही स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी या पुलाची पाहणी केल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी करतानाच इशाराही दिला होता. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले असल्याने नागरिकांचा प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी या पुलाची तीन वेळा दुरुस्ती होऊनही पुन्हा वाईट अवस्था झाली आहे.

अवजड वाहनांना बंदी घालूनही दिवसाढवळ्या त्याचे उल्लंघन करत, अशी वाहने पुलावरून धावतच असतात. महामार्ग प्राधिकरणाकडूनही पुलाच्या दुरवस्थेसाठी तेच कारण सांगितले जाते. त्यामुळे पुन्हा पुन्हा दुरुस्ती करण्याऐवजी याठिकाणी नवा पूल बांधण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती अॅड. जिम्मी गोन्साल्वीस व अन्य काहींनी याचिकेत केली आहे. तसेच प्रवाशांना वाहतूककोंडीचा प्रचंड त्रास होत असल्याने विरारजवळच्या खानिवडे व ठाण्याजवळच्या टोलनाक्यावरील टोलवसुली थांबवण्याची विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर काही दिवसांत न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज