मुंबई:
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात कारावास भोगणारे आणि पत्रकारितेतील लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठी नेहमी झगडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना मुंबई प्रेस क्लबचा यंदाचा रेडइंक २०१९ जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. रणदिवे यांच्यासह ज्येष्ठ वृत्तछायाचित्रकार सेबेस्टियन डिसोझा यांनाही जीवनगौरव पुरस्कारानं गौरविण्यात आलं. २८ जून रोजी एनसीपीएतील जमशेद भाभा सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
निडरपणे प्रश्न विचारणाऱ्या आणि ज्यांच्या प्रश्न विचारण्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून आला अशा ३२ विजेत्या पत्रकारांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि बांगलादेशमधील प्रसिद्ध पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते शाहिदुल आलम यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्यात डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी मीडियाच्या सकारात्मक प्रभाविषयी चर्चा केली. ' शहरापासून दूर गाव-खेड्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक चांगल्या माणसांचे कार्य आज मीडियामुळे लोकांपर्यंत पोहोचते आहे. हेमलकासाला आम्ही करत असलेल्या कामाला मीडियाने प्रसिद्धी दिली. त्यामुळे आपल्या समाजातील तरुणवर्ग आमच्या कामाविषयी बोलू लागला आहे, आमच्या प्रकल्पासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करू लागला आहे. मीडियामुळे लोक आपल्या जबाबदारीबद्दल जागरूक झाले.' असं ते म्हणाले. \
बांगलादेशमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकणारे प्रसिद्ध पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते शाहिदुल आलम यांना ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेविरोधात जगभरातील समविचारी लोकांनी आंदोलनं केल्यामुळे त्यांना सोडण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले. 'पत्रकार नेहमीच एका कड्यावर उभा असतो असं मला वाटतं. अत्यंत धोकादायक ठिकाणी तो असतो. तुम्ही जास्त खोल जायचा प्रयत्न केला तर त्याची झळ तुम्हाला सोसावी लागते आणि तुम्ही एक पाऊल मागे घेतलं तर तुम्ही सुसंगत वाटेनासे होता. त्यामुळे पत्रकाराचं काम जोखमीचं आहे आणि ते करत राहिलं पाहिजे' असं मत शाहिदुल आलम यांनी व्यक्त केलं.
मुंबई प्रेस क्लबच्यावतीने ट्रिब्युनच्या पत्रकार रचना खैरा यांना 'जर्नलिस्ट ऑफ द ईयर' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रचना यांनी आधार डेटा सुरक्षित नसल्याचा गौप्यस्फोट करणारं वृत्त दिलं होतं. मुंबई मेट्रो व अन्य विकासकामे होत असताना कशाप्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, यावर विविध अंगांनी वार्तांकन करणारे 'मिड डे'चे पत्रकार रणजीत जाधव यांना 'स्टार मुंबई रिपोर्टर' हा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय अन्य १२ रेडइंक पुरस्कार विजेत्यांची सत्कार झाला.
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात कारावास भोगणारे आणि पत्रकारितेतील लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठी नेहमी झगडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना मुंबई प्रेस क्लबचा यंदाचा रेडइंक २०१९ जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. रणदिवे यांच्यासह ज्येष्ठ वृत्तछायाचित्रकार सेबेस्टियन डिसोझा यांनाही जीवनगौरव पुरस्कारानं गौरविण्यात आलं. २८ जून रोजी एनसीपीएतील जमशेद भाभा सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
निडरपणे प्रश्न विचारणाऱ्या आणि ज्यांच्या प्रश्न विचारण्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून आला अशा ३२ विजेत्या पत्रकारांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि बांगलादेशमधील प्रसिद्ध पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते शाहिदुल आलम यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्यात डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी मीडियाच्या सकारात्मक प्रभाविषयी चर्चा केली. ' शहरापासून दूर गाव-खेड्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक चांगल्या माणसांचे कार्य आज मीडियामुळे लोकांपर्यंत पोहोचते आहे. हेमलकासाला आम्ही करत असलेल्या कामाला मीडियाने प्रसिद्धी दिली. त्यामुळे आपल्या समाजातील तरुणवर्ग आमच्या कामाविषयी बोलू लागला आहे, आमच्या प्रकल्पासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करू लागला आहे. मीडियामुळे लोक आपल्या जबाबदारीबद्दल जागरूक झाले.' असं ते म्हणाले. \
बांगलादेशमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकणारे प्रसिद्ध पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते शाहिदुल आलम यांना ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेविरोधात जगभरातील समविचारी लोकांनी आंदोलनं केल्यामुळे त्यांना सोडण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले. 'पत्रकार नेहमीच एका कड्यावर उभा असतो असं मला वाटतं. अत्यंत धोकादायक ठिकाणी तो असतो. तुम्ही जास्त खोल जायचा प्रयत्न केला तर त्याची झळ तुम्हाला सोसावी लागते आणि तुम्ही एक पाऊल मागे घेतलं तर तुम्ही सुसंगत वाटेनासे होता. त्यामुळे पत्रकाराचं काम जोखमीचं आहे आणि ते करत राहिलं पाहिजे' असं मत शाहिदुल आलम यांनी व्यक्त केलं.
मुंबई प्रेस क्लबच्यावतीने ट्रिब्युनच्या पत्रकार रचना खैरा यांना 'जर्नलिस्ट ऑफ द ईयर' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रचना यांनी आधार डेटा सुरक्षित नसल्याचा गौप्यस्फोट करणारं वृत्त दिलं होतं. मुंबई मेट्रो व अन्य विकासकामे होत असताना कशाप्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, यावर विविध अंगांनी वार्तांकन करणारे 'मिड डे'चे पत्रकार रणजीत जाधव यांना 'स्टार मुंबई रिपोर्टर' हा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय अन्य १२ रेडइंक पुरस्कार विजेत्यांची सत्कार झाला.