मुंबई: गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाच्या लंपडावामुळे मुंबईत साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. मुंबईत ताप, सर्दी, डोकेदुखीसह व्हायरल फिवरनं थैमान घातलं असून पालिका आणि खासगी रुग्णालयात तापांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्या शिवाय मुंबईतील काही भागात काविळीचंही प्रमाण वाढलं आहे.
मुंबईमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये वातावरणामध्ये वेगाने बदल होतो, पावसाळा स्थिर होईपर्यंत साथीच्या आजारांचा जोरही वाढलेला असतो. यंदा पावसाचा जोर वाढता असला तरीही पाऊस थांबल्यानंतर वातावरणामध्ये उष्म्याचा प्रभाव जाणवतो, त्यामुळे संसर्गजन्य तापाचा जोर वाढल्याचे निरीक्षण डॉक्टर नोंदवतात.खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले आहे. या रुग्णांमधील लक्षणे ही बहुंताशवेळा समान असल्याचे दिसुन येते. बाहेरचे पदार्थ खाणे, पाणी पिणे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे हा त्रास वाढत असल्याचे फिजिशिअन डॉ. गौरांग माणिक म्हात्रे यांनी सांगितले. एफडीए तसेच डॉक्टरांकडूनही या काळात उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, असे आवाहन वारंवार केले जाते. पाणी उकळून व गाळून प्या, असे सांगितले तरीही ते पथ्य पाळले जात नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या महिला, मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना हा त्रास अधिक प्रमाणात भेडसावतो, असेही ते म्हणाले.
ताप आल्यानंतर रुग्णांना औषधांचा ठराविक दिवसांचा डोस दिला जातो, काही दिवसांनी हे औषध बंद केले जाते. मात्र काही रुग्ण औषधांचा कोर्स पूर्ण करण्यापूर्वीच ती बंद करतात, त्यामुळे मलेरिया, डेंग्युसारखे ताप पुन्हापुन्हा डोके वर काढतात. असे करणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असते, असे वारंवार सांगूनही अनेक रुग्ण त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे पुनःपुन्हा येणाऱ्या तापाचा जोर वाढतो.
लसीकरणावर भर
पूर्वी तापासाठी देण्यात येणाऱ्या लसीकरणाकडे पालकांचा कल नव्हता. आता मात्र ही परिस्थिती बदलत आहे. मुलांना या ठराविक कालावधीमध्ये ताप येऊ नये यासाठी त्यांना लसीकरण करावे का?, असा प्रश्न पालकांकडून विचारला जातो. ही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. सुभाष मोरे यांनी सांगितले.
मुंबईमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये वातावरणामध्ये वेगाने बदल होतो, पावसाळा स्थिर होईपर्यंत साथीच्या आजारांचा जोरही वाढलेला असतो. यंदा पावसाचा जोर वाढता असला तरीही पाऊस थांबल्यानंतर वातावरणामध्ये उष्म्याचा प्रभाव जाणवतो, त्यामुळे संसर्गजन्य तापाचा जोर वाढल्याचे निरीक्षण डॉक्टर नोंदवतात.खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले आहे. या रुग्णांमधील लक्षणे ही बहुंताशवेळा समान असल्याचे दिसुन येते. बाहेरचे पदार्थ खाणे, पाणी पिणे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे हा त्रास वाढत असल्याचे फिजिशिअन डॉ. गौरांग माणिक म्हात्रे यांनी सांगितले. एफडीए तसेच डॉक्टरांकडूनही या काळात उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, असे आवाहन वारंवार केले जाते. पाणी उकळून व गाळून प्या, असे सांगितले तरीही ते पथ्य पाळले जात नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या महिला, मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना हा त्रास अधिक प्रमाणात भेडसावतो, असेही ते म्हणाले.
ताप आल्यानंतर रुग्णांना औषधांचा ठराविक दिवसांचा डोस दिला जातो, काही दिवसांनी हे औषध बंद केले जाते. मात्र काही रुग्ण औषधांचा कोर्स पूर्ण करण्यापूर्वीच ती बंद करतात, त्यामुळे मलेरिया, डेंग्युसारखे ताप पुन्हापुन्हा डोके वर काढतात. असे करणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असते, असे वारंवार सांगूनही अनेक रुग्ण त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे पुनःपुन्हा येणाऱ्या तापाचा जोर वाढतो.
लसीकरणावर भर
पूर्वी तापासाठी देण्यात येणाऱ्या लसीकरणाकडे पालकांचा कल नव्हता. आता मात्र ही परिस्थिती बदलत आहे. मुलांना या ठराविक कालावधीमध्ये ताप येऊ नये यासाठी त्यांना लसीकरण करावे का?, असा प्रश्न पालकांकडून विचारला जातो. ही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. सुभाष मोरे यांनी सांगितले.