मुंबई:
एकविसाव्या शतकात डोंगराळ भागातील घाटातून लोकशाहीची गाडी जात आहे. वाटेत खूप वळणे आहेत. कडेकपाऱ्यांमधून जाणाऱ्या या मार्गात अनेक धोकेही आहेत. या गाडीचा ड्रायव्हर मतदार आहे. त्याने गाडी कशी चालवावी, मतदान कोणाला करावे यासाठी पाच कसोट्या मी सुचवू इच्छितो.
पहिली कसोटी: भारतीय समाजाला तोडणाऱ्या व्यक्तीला मतदाराने मत देऊ नये. केवळ भगवी वस्त्रे घातल्याने कुणी साध्वी होत नाही. हिंसाचार आणि धर्मद्वेष या आधारावर मत देणे म्हणजे देश तोडणे आहे. पुन्हा देशाची फाळणी होणे नको असेल आणि या देशात तालिबानी चळवळ पसरू द्यायची नसेल तर भारतातील सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या व्यक्तीलाच मत द्यायला हवे.
दुसरी कसोटी: हा देश मोठा आणि वैविध्य असलेला आहे. एक मंत्रिमंडळ, एक पक्ष किंवा एक व्यक्ती तो चालवू शकत नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण होणे हे या देशासाठी आवश्यक आहे.
तिसरी कसोटी : दहावी, बारीवी, पदवीधर असे कोट्यावधी युवा बेरोजगार आहेत. आदिवासींना थारा नाही, शेतकरी-शेतमजूर हैराण आहेत. या सर्वांना रोजगार मिळेल असा कार्यक्रम देण्यास कोण तयार आहे, अशी आर्थिक विकासाची दिशा कोणाकडे आहे, हे प्रश्न मतदारांनी स्वतःला विचारायला हवेत.
चौथी कसाटी : ग्लोबल वॉर्मिगच्या धोक्यासमोर सगळ्यांना एकत्र येऊन मात करण्याची गरज आहे. त्यामुळे मतदान करताना पर्यावणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा कोणाचा विचार आहे हेही लक्षात घ्यायला हवं.
पाचवी कसोटी: दारू पाजून मत विकत घेण्याची मोठी प्रथा निवडणुकीपूर्वी चालते. याविरोधात गडचिरोलीमध्ये मोठं आंदोलन झालं. मागासलेल्या गडचिरोलीने यावर्षी निवडणूक दारूमुक्त केली. जो उमेदवार दारू पाजेल त्याला नक्की पाडू या निग्रहाने स्त्रियांनी निवडणुकीत दारूविरोधात कडक भूमिका घेतली. म्हणून मतदारांनी दारूचा वापर करणाऱ्याला अजिबात मत देऊ नये.
एकविसाव्या शतकात डोंगराळ भागातील घाटातून लोकशाहीची गाडी जात आहे. वाटेत खूप वळणे आहेत. कडेकपाऱ्यांमधून जाणाऱ्या या मार्गात अनेक धोकेही आहेत. या गाडीचा ड्रायव्हर मतदार आहे. त्याने गाडी कशी चालवावी, मतदान कोणाला करावे यासाठी पाच कसोट्या मी सुचवू इच्छितो.
पहिली कसोटी: भारतीय समाजाला तोडणाऱ्या व्यक्तीला मतदाराने मत देऊ नये. केवळ भगवी वस्त्रे घातल्याने कुणी साध्वी होत नाही. हिंसाचार आणि धर्मद्वेष या आधारावर मत देणे म्हणजे देश तोडणे आहे. पुन्हा देशाची फाळणी होणे नको असेल आणि या देशात तालिबानी चळवळ पसरू द्यायची नसेल तर भारतातील सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या व्यक्तीलाच मत द्यायला हवे.
दुसरी कसोटी: हा देश मोठा आणि वैविध्य असलेला आहे. एक मंत्रिमंडळ, एक पक्ष किंवा एक व्यक्ती तो चालवू शकत नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण होणे हे या देशासाठी आवश्यक आहे.
तिसरी कसोटी : दहावी, बारीवी, पदवीधर असे कोट्यावधी युवा बेरोजगार आहेत. आदिवासींना थारा नाही, शेतकरी-शेतमजूर हैराण आहेत. या सर्वांना रोजगार मिळेल असा कार्यक्रम देण्यास कोण तयार आहे, अशी आर्थिक विकासाची दिशा कोणाकडे आहे, हे प्रश्न मतदारांनी स्वतःला विचारायला हवेत.
चौथी कसाटी : ग्लोबल वॉर्मिगच्या धोक्यासमोर सगळ्यांना एकत्र येऊन मात करण्याची गरज आहे. त्यामुळे मतदान करताना पर्यावणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा कोणाचा विचार आहे हेही लक्षात घ्यायला हवं.
पाचवी कसोटी: दारू पाजून मत विकत घेण्याची मोठी प्रथा निवडणुकीपूर्वी चालते. याविरोधात गडचिरोलीमध्ये मोठं आंदोलन झालं. मागासलेल्या गडचिरोलीने यावर्षी निवडणूक दारूमुक्त केली. जो उमेदवार दारू पाजेल त्याला नक्की पाडू या निग्रहाने स्त्रियांनी निवडणुकीत दारूविरोधात कडक भूमिका घेतली. म्हणून मतदारांनी दारूचा वापर करणाऱ्याला अजिबात मत देऊ नये.