@anujaacMT
मुंबई : तानसा तलाव आणि मोडक सागर तलावातून मुंबईला पाणीपुरवठा होता. या दोन्ही तलावांमध्ये अनुक्रमे तानसा नदी आणि वैतरणा नद्यांचे पाणी जाते. या दोन्ही नद्यांच्या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया होऊन पुढे हे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असले तरी या दोन्ही नद्यांच्या काठांवर वसलेल्या गावांमध्ये सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प नसल्याने गावांमधील सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळत आहे.
तानसा नदी ठाणे जिल्ह्याच्या कडेने वाहते. या नदीकाठी आठ गावे वसली आहेत. या गावांमधील सांडपाणी, मैला थेट नदीत सोडला जातो. त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये या नदीच्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण ५.९ ते ७.१ मिलीग्रॅम प्रती लीटर असे होते. मात्र नदीचे पाणी मुक्तपणे वाहत असतानाच्या काळातील हे प्रमाण आहे. ज्या वेळी नदीचे पाणी वाहत नसते, तेव्हा ही नदी प्रदूषित असते. पाणी धरणात सोडण्याचे हे चक्र साधारण २१ ते ४५ दिवसांचे असते. इतर वेळी सांडपाण्यामुळे प्रदूषित पाणी डोळ्यांनाही दिसते', असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. यशवंत सोनटक्के यांनी स्पष्ट केले. या पाण्यातील बायो-केमिकल ऑक्सिजन डिमांडचे प्रमाण मोजले असता हे धोकादायक असल्याचे निरीक्षण मंडळाच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.
वैतरणाच्या काठावर मुख्यत्वे वाडा तालुका वसलेला आहे. या तालुक्याची लोकसंख्या सुमारे १ लाख ४२ हजारांहून अधिक आहे. सरसी, गंधारे, पिंपरोळी, कोयना या गावांमधून १८७ घनमीटर सांडपाणी आणि मैला प्रती दिन निर्माण होतो आणि यापैकी कोणत्याही गावात सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प नाही. वैतरणेचे पाणीही जेव्हा वाहते नसते, तेव्हा ते प्रदूषित असते. या पाण्याची चाचणी केल्यावर त्यामध्ये प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचे प्रमाण असल्याचे समोर आले आहे. वैतरणेच्या पाण्याचा दर्जा सुधारावा यासाठीही सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन या सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त सर्व रुग्णालयांनी कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी अशी अपेक्षाही या सूचनांमध्ये आहे. तसेच पुनर्प्रक्रिया न केलेले पाणी जमिनीवर, खड्ड्यांमध्ये, विहिरींमध्ये आणि टाक्यांमध्ये जाऊ नये यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष ठेवेल तसेच कठोर कारवाई करेल असाही उपाय या कृती आराखड्यामध्ये मांडण्यात आला आहे. (क्रमशः - उद्याच्या भागात मिठी नदीच्या पाण्याची स्थिती)
सांडपाणी रोखण्याचा कृती आराखडा
केमिकल ऑक्सिजन डिमांडच्या आकडेवारीवरून या पाण्यात औद्योगिक प्रदूषणाचे प्रमाण असल्याचे सिद्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर घरांमधून येणारे सांडपाणी थांबवण्याला कृती आराखड्यात महत्त्व देण्यात आले. कपडे धुणे, भांडी घासणे, अंघोळ करणे या कृती थांबवण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी सुका आणि ओला कचरा वेगळा करणे महत्त्वाचे आहे तसेच गावांमध्ये सेप्टिक टँक गरजेची असल्याचीही सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे. पाण्याच्या दर्जावर देखरेखीसाठी ऑनलाइन यंत्रणेची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी सन २०२२चे ध्येय मंडळाकडून ठेवण्यात आले आहे.
मुंबई : तानसा तलाव आणि मोडक सागर तलावातून मुंबईला पाणीपुरवठा होता. या दोन्ही तलावांमध्ये अनुक्रमे तानसा नदी आणि वैतरणा नद्यांचे पाणी जाते. या दोन्ही नद्यांच्या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया होऊन पुढे हे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असले तरी या दोन्ही नद्यांच्या काठांवर वसलेल्या गावांमध्ये सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प नसल्याने गावांमधील सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळत आहे.
तानसा नदी ठाणे जिल्ह्याच्या कडेने वाहते. या नदीकाठी आठ गावे वसली आहेत. या गावांमधील सांडपाणी, मैला थेट नदीत सोडला जातो. त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये या नदीच्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण ५.९ ते ७.१ मिलीग्रॅम प्रती लीटर असे होते. मात्र नदीचे पाणी मुक्तपणे वाहत असतानाच्या काळातील हे प्रमाण आहे. ज्या वेळी नदीचे पाणी वाहत नसते, तेव्हा ही नदी प्रदूषित असते. पाणी धरणात सोडण्याचे हे चक्र साधारण २१ ते ४५ दिवसांचे असते. इतर वेळी सांडपाण्यामुळे प्रदूषित पाणी डोळ्यांनाही दिसते', असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. यशवंत सोनटक्के यांनी स्पष्ट केले. या पाण्यातील बायो-केमिकल ऑक्सिजन डिमांडचे प्रमाण मोजले असता हे धोकादायक असल्याचे निरीक्षण मंडळाच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.
वैतरणाच्या काठावर मुख्यत्वे वाडा तालुका वसलेला आहे. या तालुक्याची लोकसंख्या सुमारे १ लाख ४२ हजारांहून अधिक आहे. सरसी, गंधारे, पिंपरोळी, कोयना या गावांमधून १८७ घनमीटर सांडपाणी आणि मैला प्रती दिन निर्माण होतो आणि यापैकी कोणत्याही गावात सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प नाही. वैतरणेचे पाणीही जेव्हा वाहते नसते, तेव्हा ते प्रदूषित असते. या पाण्याची चाचणी केल्यावर त्यामध्ये प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचे प्रमाण असल्याचे समोर आले आहे. वैतरणेच्या पाण्याचा दर्जा सुधारावा यासाठीही सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन या सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त सर्व रुग्णालयांनी कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी अशी अपेक्षाही या सूचनांमध्ये आहे. तसेच पुनर्प्रक्रिया न केलेले पाणी जमिनीवर, खड्ड्यांमध्ये, विहिरींमध्ये आणि टाक्यांमध्ये जाऊ नये यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष ठेवेल तसेच कठोर कारवाई करेल असाही उपाय या कृती आराखड्यामध्ये मांडण्यात आला आहे. (क्रमशः - उद्याच्या भागात मिठी नदीच्या पाण्याची स्थिती)
सांडपाणी रोखण्याचा कृती आराखडा
केमिकल ऑक्सिजन डिमांडच्या आकडेवारीवरून या पाण्यात औद्योगिक प्रदूषणाचे प्रमाण असल्याचे सिद्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर घरांमधून येणारे सांडपाणी थांबवण्याला कृती आराखड्यात महत्त्व देण्यात आले. कपडे धुणे, भांडी घासणे, अंघोळ करणे या कृती थांबवण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी सुका आणि ओला कचरा वेगळा करणे महत्त्वाचे आहे तसेच गावांमध्ये सेप्टिक टँक गरजेची असल्याचीही सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे. पाण्याच्या दर्जावर देखरेखीसाठी ऑनलाइन यंत्रणेची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी सन २०२२चे ध्येय मंडळाकडून ठेवण्यात आले आहे.