मुंबई: आपलं सरकार एका कुटुंबासारखं काम करेल. जनतेला हे सरकार आपलं वाटलं काम आपण करून दाखवू. आपण चांगला महाराष्ट्र आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवू, असं सांगतानाच माझं सरकार कुणाशीही सुडबुद्धीने वागणार नाही. पण कुणी आडवं आलं तर त्याला बघून घ्यायला माझे वाघ तयार आहेत, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे यांनी दिला.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीची आज हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर उपस्थितांचे आभार मानताना उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून माझ्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असलं तरी तुम्ही सर्वच माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री आहात. हे केवळ माझं सरकार नसेल तर आपलं सरकार असेल. हे आपलं सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असं सांगतानाच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला अनेक काटे असतात. अनेक खिळेही असतात. जाणारा मुख्यमंत्री दोनचार खिळे लावून जात असतो. कितीही खिळे लावले तरी हातोडा मात्र माझ्या हातात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
३० वर्ष जुन्या मित्रांनी विश्वास ठेवला नाही
आज आम्ही तीन दिशेला असणारे पक्ष एकत्र आलो आहोत. एकमेकांवर विश्वास ठेवून आपण महाराष्ट्राला वेगळी दिशा देणार आहोत, असं सांगतानाच ज्यांच्याशी ३० वर्ष मैत्री केली. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही. पण ज्यांच्याशी ३० वर्ष सामना केला. त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, असं ते म्हणाले. आयुष्यात काय कमावले आणि काय गमावले याचा विचार करण्याचा हा प्रसंग नाही. हे शिवधनुष्य आहे आणि तुमच्या साथीने हे शिवधनुष्य पेलायचे आहे, असंही ते त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विशेष आभार मानले. तसेच शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आयुष्य वेचले त्या शिवसैनिकांच्या स्मृतींनाही त्यांनी उजाळा दिला.
मुख्यमंत्री होणार स्वप्नातही वाटले नव्हते
एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल असा स्वप्नातही वाटलं नव्हतं. शिवसेना पक्षप्रमुखपद ही शक्ती आणि ताकद आहे. त्याचा सर्वसामान्यांसाठी वापर करायचा असतो. तेच मी आतापर्यंत सांभाळत आलोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मोठ्या भावाला भेटणार
आता सत्ता आपलीच आली आहे. त्यामुळे लवकरच मोठ्या भावाला भेटायला दिल्लीत जाईल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणताच आमदारांमध्ये एकच खसखस पिकली. माझा कुणाविरोधातही व्यक्तिगत संघर्ष नाही. टोकाची भूमिका मला का घ्यावी लागली याचा विचार करा. खोटं बोलणं माझ्या हिंदुत्वात नाही. खोट्याला साथ देणं हे माझ्या स्वभावात बसत नाही आणि खोट्याला कधीही साथ देणार नाही, असंही ठणकावतानाच मुख्यमंत्रिपदाबाबत आमचं काही ठरलंच नव्हतं हे आज पुन्हा ऐकल्याने अधिकच इंगळ्या डसल्या असंही ते म्हणाले. गरज वाटली तेव्हा शिवसेनेकडे यायचे, मिठ्या मारायच्या आणि गरज संपल्यावर शिवसेनेला सोडून द्यायचे. तुमच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आलेली नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी भाजपवर केला.
अजितदादा परत या;भुजबळांनी घातली साद
उद्धव ठाकरे म्हणाले...
>> जेव्हा मी संघर्षात असतो तेव्हा मला नेहमी संघर्षात तुम्हाला बाळासाहेबांची आठवण येते का? असा प्रश्न विचारला जातो. मला संघर्षात नाही, पण संघर्षात विजय मिळविल्यानंतर बाळासाहेबांची आठवण येते.
>> हे जे सरकार आपण बनवणार आहोत, किंबहुना बनलेले आहे, मला नाही वाटत एवढे ज्येष्ठ नेते या आधीच्या सरकारमध्ये कधी असतील.
>> बाळासाहेब म्हणायचे विचार करून शब्द दे आणि एकदा शब्द दिला की प्राण गेला तरी बेहत्तर, दिलेला शब्द पाडायचा नाही.
>> मला आपल्या सगळ्यांच्या साथीची, सोबतीची, सहकार्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मला पुसायचे आहेत
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीची आज हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर उपस्थितांचे आभार मानताना उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून माझ्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असलं तरी तुम्ही सर्वच माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री आहात. हे केवळ माझं सरकार नसेल तर आपलं सरकार असेल. हे आपलं सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असं सांगतानाच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला अनेक काटे असतात. अनेक खिळेही असतात. जाणारा मुख्यमंत्री दोनचार खिळे लावून जात असतो. कितीही खिळे लावले तरी हातोडा मात्र माझ्या हातात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
३० वर्ष जुन्या मित्रांनी विश्वास ठेवला नाही
आज आम्ही तीन दिशेला असणारे पक्ष एकत्र आलो आहोत. एकमेकांवर विश्वास ठेवून आपण महाराष्ट्राला वेगळी दिशा देणार आहोत, असं सांगतानाच ज्यांच्याशी ३० वर्ष मैत्री केली. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही. पण ज्यांच्याशी ३० वर्ष सामना केला. त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, असं ते म्हणाले. आयुष्यात काय कमावले आणि काय गमावले याचा विचार करण्याचा हा प्रसंग नाही. हे शिवधनुष्य आहे आणि तुमच्या साथीने हे शिवधनुष्य पेलायचे आहे, असंही ते त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विशेष आभार मानले. तसेच शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आयुष्य वेचले त्या शिवसैनिकांच्या स्मृतींनाही त्यांनी उजाळा दिला.
मुख्यमंत्री होणार स्वप्नातही वाटले नव्हते
एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल असा स्वप्नातही वाटलं नव्हतं. शिवसेना पक्षप्रमुखपद ही शक्ती आणि ताकद आहे. त्याचा सर्वसामान्यांसाठी वापर करायचा असतो. तेच मी आतापर्यंत सांभाळत आलोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मोठ्या भावाला भेटणार
आता सत्ता आपलीच आली आहे. त्यामुळे लवकरच मोठ्या भावाला भेटायला दिल्लीत जाईल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणताच आमदारांमध्ये एकच खसखस पिकली. माझा कुणाविरोधातही व्यक्तिगत संघर्ष नाही. टोकाची भूमिका मला का घ्यावी लागली याचा विचार करा. खोटं बोलणं माझ्या हिंदुत्वात नाही. खोट्याला साथ देणं हे माझ्या स्वभावात बसत नाही आणि खोट्याला कधीही साथ देणार नाही, असंही ठणकावतानाच मुख्यमंत्रिपदाबाबत आमचं काही ठरलंच नव्हतं हे आज पुन्हा ऐकल्याने अधिकच इंगळ्या डसल्या असंही ते म्हणाले. गरज वाटली तेव्हा शिवसेनेकडे यायचे, मिठ्या मारायच्या आणि गरज संपल्यावर शिवसेनेला सोडून द्यायचे. तुमच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आलेली नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी भाजपवर केला.
अजितदादा परत या;भुजबळांनी घातली साद
उद्धव ठाकरे म्हणाले...
>> जेव्हा मी संघर्षात असतो तेव्हा मला नेहमी संघर्षात तुम्हाला बाळासाहेबांची आठवण येते का? असा प्रश्न विचारला जातो. मला संघर्षात नाही, पण संघर्षात विजय मिळविल्यानंतर बाळासाहेबांची आठवण येते.
>> हे जे सरकार आपण बनवणार आहोत, किंबहुना बनलेले आहे, मला नाही वाटत एवढे ज्येष्ठ नेते या आधीच्या सरकारमध्ये कधी असतील.
>> बाळासाहेब म्हणायचे विचार करून शब्द दे आणि एकदा शब्द दिला की प्राण गेला तरी बेहत्तर, दिलेला शब्द पाडायचा नाही.
>> मला आपल्या सगळ्यांच्या साथीची, सोबतीची, सहकार्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मला पुसायचे आहेत