अ‍ॅपशहर

मुंबई, ठाण्याला पुढील इतके दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ऑरेंज अलर्ट आणि...

Mumbai Rain News : राज्यात अनेक भागात रविवारी जोरदार पाऊस झाला. आता हवामन विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे मुंबईकरांनी सतर्क रहावं आणि खबरदारी घ्यावी. हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसांचा अंदाज वर्तवला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2022, 9:03 am
मुंबई : मुंबईत गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. पण आता श्रावण सुरू होताच पावसाचे पुनरागमन झाले आहे. मुंबईत रविवारी बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने पुढील पाच दिवसाचा अंदाज दिली आहे. यात हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरलाही ऑरेंज अलर्ट दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम weather forecast mumbai
मुंबई, ठाण्याला पुढील इतके दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ऑरेंज अलर्ट आणि...


काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने मच्छिमारांनाही इशारा दिला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये. आज आणि उद्या म्हणजे ९ ऑगस्टपर्यंत समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुढील चार दिवस धोक्याचे; आजपासून 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

उत्तर केरळपासून ते दक्षिण महाराष्ट्रात हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टी भागात हा पावसाचा इशारा दिला आहे. बंगालचा उपसागर, आंध्र प्रदेश आणि मध्य कर्नाटक या भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. तसंच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, पंचगंगेची पातळी वाढली; करूळ घाटात संरक्षक भिंत खचली

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज