अ‍ॅपशहर

Maharashtra Monsoon Alert : राज्यात दोन दिवस अस्मानी संकट, मुंबईला ऑरेंज तर ५ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

Maharashtra Weather News : पुढील ३ दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल अशा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेतच घराबाहेर पडावं अशा सूचना IMD कडून देण्यात आल्या आहेत. अशात, काय आहे हवामानाचा अंदाज? वाचा सविस्तर...

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jul 2022, 10:52 am
मुंबई : राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहिल असा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत १४ जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट असून यासोबतच पालघर, नाशिक, पुणे यासह ४ जिल्ह्यांमध्ये १५ जुलै या कालावधीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra Rain Update


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा आहे. मुंबईतील उपनगरांत रात्रीपासून पाऊस सुरू आहे तर पालघरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पालघरमध्ये भूस्खलन होऊन अनेक लोक अडकल्याची बातमी आहे. वसई परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली. इथे घरांचे नुकसान झाले असून अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
Mumbai Rain: मुंबईत सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस; मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने
दोन दिवस 'रेड अलर्ट'

येत्या १५ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा, पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून 'आयएमडी'तर्फे या दोन विभागांना पुढील दोन दिवसांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
हिंगोलीत पावसाचं रौद्ररूप: जनजीवन विस्कळीत; पुरामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला
मुंबईत भरती-ओहोटीचा इशारा

हवामान खात्याने महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत रेड अलर्ट तर सहा जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसानंतर मुंबईत हाय टायड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात जूनपासून अतिवृष्टीमुळे ८० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला असून समुद्रकिनारी जाण्यासाठीही बंदी घालण्यात आली आहे.

नागपुरात स्कॉर्पिओला प्रवाहात वाहिली, तीन ठार, तीन बेपत्ता

नागपुरात एक स्कॉर्पिओ वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण बेपत्ता आहेत. सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. या घटनेबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून एनडीआरएफकडूनही मदत घेतली जात आहे.

संपूर्ण आठवड्याचा वेदर रिपोर्ट (Weather Report Weekly )

उत्तर कोकण (North Konkan )- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १५ जुलैपर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे. यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण कोकण आणि गोवा (South Konkan & Goa )- दक्षिण कोकण आणि गोव्यातही १३ ते १५ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Jalgaon News: निर्दयीपणाचा कळस! स्कॉर्पिओचा दरवाजा उघडताच सगळे हादरले, पोलिसांची मोठी कारवाई
उत्तर मध्य महाराष्ट्र (North Madhya Maharashtra )- उत्तर मध्य महाराष्ट्रातही हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून यामुळे सर्वत्र पाऊस कोसळेल.

दक्षिण मध्य महाराष्ट्र (South Madhya Maharashtra )- हवामान खात्याकडून दक्षिण मध्य महाराष्ट्रात १३ ते १५ जुलैपर्यंत तुफान पावसाचा इशारा दिला आहे.

मराठवाडा (Marathawada )- १३ ते १५ जुलैपर्यंत मराठवाड्यालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र पाऊस होऊन अनेक गावांमध्ये नद्यांना पूर येण्याचा धोका आहे.

पूर्व विदर्भ - पश्चिम विदर्भ (East Vidarbha - West Vidarbha )- मुंबई आयमडीकडून पूर्व विदर्भ - पश्चिम विदर्भात १३ ते १५ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज