म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
पश्चिम रेल्वेवर गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेस केबल जळाल्याने सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला. परिणामी अंधेरी ते बोरिवली व विरार दरम्यान धिम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. सायंकाळी ५.१० वाजता झालेला बिघाड रात्री ९.१५च्या सुमारास दुरुस्त झाल्यानंतर वाहतूक हळूहळू मार्गी लागली. तोवर ५० फेऱ्या रद्द झाल्या आणि १२० फेऱ्या उशिराने चालल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
अंधेरी स्थानकात केबल जळाल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर लोकल सेवेचा वेग मुंगीएवढा झाला. लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. ही गर्दीची वेळ असल्याने स्थानकांवर प्रवासी मोठ्या संख्येने जमत गेले. घरी परतण्यासाठी लोकल उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. लोकलचा वेग मंदावल्याने लोकल एकामागोमाग उभ्या राहिल्या. त्यामुळे अप आणि डाऊन धिम्या आणि जलद मार्गावरील सेवांवर परिणाम झाला. पश्चिम रेल्वेने या कालावधीत लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याचा दावा केला तरीही प्रत्यक्षात लोकल त्याहून जास्त उशिराने चालत होत्या.
हार्बर मार्गाशी जोडलेली केबल जळाल्याने लोकलसेवा विस्कळीत झाल्या. केबलला आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुका कचरा जळाल्याने वा एखाद्या गर्दुल्ल्यामुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सिग्नल व्यवस्था कुचकामी ठरल्याने मोटरमन अतिशय सावधपणे लोकल चालवत होते. देखभाल-दुरुस्ती अभावामुळे केबलमध्ये बिघाड झाल्याचा आरोप केला जात आहे.
पश्चिम रेल्वेवर गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेस केबल जळाल्याने सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला. परिणामी अंधेरी ते बोरिवली व विरार दरम्यान धिम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. सायंकाळी ५.१० वाजता झालेला बिघाड रात्री ९.१५च्या सुमारास दुरुस्त झाल्यानंतर वाहतूक हळूहळू मार्गी लागली. तोवर ५० फेऱ्या रद्द झाल्या आणि १२० फेऱ्या उशिराने चालल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
अंधेरी स्थानकात केबल जळाल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर लोकल सेवेचा वेग मुंगीएवढा झाला. लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. ही गर्दीची वेळ असल्याने स्थानकांवर प्रवासी मोठ्या संख्येने जमत गेले. घरी परतण्यासाठी लोकल उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. लोकलचा वेग मंदावल्याने लोकल एकामागोमाग उभ्या राहिल्या. त्यामुळे अप आणि डाऊन धिम्या आणि जलद मार्गावरील सेवांवर परिणाम झाला. पश्चिम रेल्वेने या कालावधीत लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याचा दावा केला तरीही प्रत्यक्षात लोकल त्याहून जास्त उशिराने चालत होत्या.
हार्बर मार्गाशी जोडलेली केबल जळाल्याने लोकलसेवा विस्कळीत झाल्या. केबलला आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुका कचरा जळाल्याने वा एखाद्या गर्दुल्ल्यामुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सिग्नल व्यवस्था कुचकामी ठरल्याने मोटरमन अतिशय सावधपणे लोकल चालवत होते. देखभाल-दुरुस्ती अभावामुळे केबलमध्ये बिघाड झाल्याचा आरोप केला जात आहे.