म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
लोकल, मेल-एक्स्प्रेसप्रमाणेच रेल्वे स्थानक परिसर तसेच रुळांभोवतीची स्वच्छता मोहीम मध्य व पश्चिम रेल्वेने तीव्र केली आहे. मध्य रेल्वेने गेल्या चार महिन्यांत ८० हजार घनमीटर परिसर स्वच्छ केला असून, पश्चिम रेल्वेने रुळांवरून सुमारे १०० टन कचरा उचलला आहे.
पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावरील मेल, एक्स्प्रेस, स्थानकातील परिसर, रेल्वे मार्ग, प्रसाधनगृह, रुळांजवळील वसाहती अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. त्यात मुख्यत: रेल्वे रुळांवर साचणारा कचरा गोळा करण्याचे आव्हान पश्चिम, मध्य रेल्वेसमोर आहे. सर्व मार्गांवर मिळून ७५ लाख प्रवासी ये-जा करीत असून मेल, एक्स्प्रेसमधील प्रवाशांचीही यामध्ये भर पडते. सर्व मार्गांजवळील वसाहतींमधून रुळांवर पडणारा तसेच प्रवासात प्रवाशांकडून रुळांवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याने नाले तुंबण्याची समस्या निर्माण होते. प्लास्टिकचा वापर काही प्रमाणात कमी झाला असला तरीही खाद्यपदार्थांचे वेष्टन, पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांची समस्या शिल्लक आहेच.
विशेष कचरा लोकल
मध्य आणि हार्बरवर दररोज चार डब्यांच्या दोन कचरा विशेष गाड्या चालवल्या जातात. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि हार्बरवर सीएसएमटी ते मानखुर्दपर्यंत कचरा विशेष चालवल्या जातात. प्रसंगी त्यात आणखी एक लोकल वाढवली जाते. दोन लोकलमधून रोज रात्री कचऱ्याच्या १२ हजार गोण्या गोळ्या होतात. अशातून सुमारे ८० हजार घनमीटर परिसर साफ करण्यात आला. डम्पिंग ग्राऊंडप्रमाणेच काही ठिकाणी पाया रचण्यासाठी त्याचा वापर होतो. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारपर्यंत कचरा उचलण्यासाठी लोकल चालवली जाते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दररोज चालवल्या जाणाऱ्या गाडीतून आतापर्यंत १०० टन इतका कचरा जमा झाला आहे. हा कचरा विरार येथील रेल्वेच्या जुन्या खाणीसह अन्य ठिकाणी जमा केला जातो.
कचरा करणाऱ्यांवर कारवाई तीव्र
'रेल्वेने कचरामुक्तीसाठी दंडाच्या रकमेत यापूर्वीच ५०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. यापुढेही कठोर कारवाई केली जाईल', असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी स्पष्ट केले. 'अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची तीव्रता वाढवण्यात येईल. त्यातून योग्य तो संदेश जाईल', असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.
लोकल, मेल-एक्स्प्रेसप्रमाणेच रेल्वे स्थानक परिसर तसेच रुळांभोवतीची स्वच्छता मोहीम मध्य व पश्चिम रेल्वेने तीव्र केली आहे. मध्य रेल्वेने गेल्या चार महिन्यांत ८० हजार घनमीटर परिसर स्वच्छ केला असून, पश्चिम रेल्वेने रुळांवरून सुमारे १०० टन कचरा उचलला आहे.
पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावरील मेल, एक्स्प्रेस, स्थानकातील परिसर, रेल्वे मार्ग, प्रसाधनगृह, रुळांजवळील वसाहती अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. त्यात मुख्यत: रेल्वे रुळांवर साचणारा कचरा गोळा करण्याचे आव्हान पश्चिम, मध्य रेल्वेसमोर आहे. सर्व मार्गांवर मिळून ७५ लाख प्रवासी ये-जा करीत असून मेल, एक्स्प्रेसमधील प्रवाशांचीही यामध्ये भर पडते. सर्व मार्गांजवळील वसाहतींमधून रुळांवर पडणारा तसेच प्रवासात प्रवाशांकडून रुळांवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याने नाले तुंबण्याची समस्या निर्माण होते. प्लास्टिकचा वापर काही प्रमाणात कमी झाला असला तरीही खाद्यपदार्थांचे वेष्टन, पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांची समस्या शिल्लक आहेच.
विशेष कचरा लोकल
मध्य आणि हार्बरवर दररोज चार डब्यांच्या दोन कचरा विशेष गाड्या चालवल्या जातात. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि हार्बरवर सीएसएमटी ते मानखुर्दपर्यंत कचरा विशेष चालवल्या जातात. प्रसंगी त्यात आणखी एक लोकल वाढवली जाते. दोन लोकलमधून रोज रात्री कचऱ्याच्या १२ हजार गोण्या गोळ्या होतात. अशातून सुमारे ८० हजार घनमीटर परिसर साफ करण्यात आला. डम्पिंग ग्राऊंडप्रमाणेच काही ठिकाणी पाया रचण्यासाठी त्याचा वापर होतो. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारपर्यंत कचरा उचलण्यासाठी लोकल चालवली जाते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दररोज चालवल्या जाणाऱ्या गाडीतून आतापर्यंत १०० टन इतका कचरा जमा झाला आहे. हा कचरा विरार येथील रेल्वेच्या जुन्या खाणीसह अन्य ठिकाणी जमा केला जातो.
कचरा करणाऱ्यांवर कारवाई तीव्र
'रेल्वेने कचरामुक्तीसाठी दंडाच्या रकमेत यापूर्वीच ५०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. यापुढेही कठोर कारवाई केली जाईल', असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी स्पष्ट केले. 'अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची तीव्रता वाढवण्यात येईल. त्यातून योग्य तो संदेश जाईल', असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.