अ‍ॅपशहर

आज बाळासाहेब असायला हवे होते: राज ठाकरे

'हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता,' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Nov 2019, 2:41 pm

अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच; सुप्रीम कोर्टाचा निकाल

मुंबई: 'हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता,' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Raj-Thackeray



गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला. या निकालामुळे वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशभरात या निकालावर समाधान व्यक्त होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली आहे.

निकालाकडं जय-पराजय म्हणून बघू नका:RSS

'आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केलं, त्याचं आज सार्थक झालं. देशातील जनतेच्या भावना व वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो,' असं राज यांनी म्हटलं आहे. आता लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी व्हायला हवी आणि 'रामराज्य' देखील यायला हवं, असा चिमटाही त्यांनी सरकारला काढला आहे.

भाजपच्या राजकारणाचे दरवाजे बंद झाले: काँग्रेस

बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पुढं येऊन त्या घटनेची जबाबदारी घेतली होती. त्यांच्या या भूमिकेवरून देशभरात वादळ उठलं होतं. मात्र, त्यानंतर शिवसेना ही एक हिंदुत्ववादी संघटना म्हणून देशभरात पुढं आली. राज ठाकरे हे त्यावेळी शिवसेनेतच होते. याच अनुषंगानं त्यांनी आज प्रतिक्रिया देताना बाळासाहेबांचे स्मरण केले आहे.

सुप्रीम कोर्टाचा निकाल असमाधानकारक: जिलानी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज