म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मागील दोन महिन्यांमध्ये करोना रुग्णसंख्येचा १०० रुग्णांचा टप्पा पार न करणाऱ्या मुंबईमध्ये मंगळवारी दिवसभरात पाचशेहून अधिक रुग्णसंख्येची नोंद झाली. पर्यटन, इतर देशांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या, चाचण्यांचे कमी झालेले प्रमाण, तसेच विषाणूच्या बदलत्या स्वरूपामध्ये करोनाचा फैलाव पुन्हा होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. (Mumbai Coronavirus)
या करोना संसर्गाचा फैलाव कोणत्या प्रकारे होतो, याकडे अभ्यासकांचे लक्ष आहे. करोनासंसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा फैलाव हा शहराकडून ग्रामीण भागाकडे, त्यानंतर तो ग्रामीण भागातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये झाला होता. मागील आठवड्यात पुणे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसून येत होती.
या आठवड्यात ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ नव्हती, तिथे रुग्णसंख्येत वाढ कशी होते याकडे आरोग्यविभागाचे लक्ष लागले आहे. मुंबईमध्ये १२ ते १८ मे या कालावधीमध्ये १,००२ रुग्णांची वाढ झाली होती. १९ ते २५ मे या कालावधीमध्ये १,५३१ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. हे प्रमाण ५२.७९ टक्के इतके होते. याच कालावधीमध्ये पुणे येथे रुग्णसंख्येत ९.७३ टक्क्यांची घट दिसून आली. ठाण्यात ही २७.९२ टक्के इतकी रुग्णवाढ होती. पहिल्या पाच जिल्ह्यांध्ये झालेली रुग्णवाढ ही ३५.८६ टक्के असल्याचे आरोग्यविभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले होते. रुग्णवाढीचा वेग धीमा असून मृत्यूसंख्या वाढलेली नाही, असेही या माहितीवरून स्पष्ट होते.
विषाणूच्या उत्परावर्तित स्वरूपामुळे ही रुग्णवाढ आहे का? यादृष्टीने विचार केला जात असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी विशद केले. तर ही रुग्णवाढ काही आठवड्यांमध्ये पुन्हा कमी होईल, अशी शक्यता राज्याच्या मृत्युदर विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी वर्तवली. काही वेळा रुग्णसंख्येमध्ये वाढ होते व ती स्थिर राहून त्यानंतर ती खाली येते, तशाच प्रकारे मुंबईमध्ये रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. करोना रुग्णांना वैद्यकीय उपचार देणारे फिजिशिअन डॉ. यश पाटील यांनी ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांना सौम्य स्वरूपाचा ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसून येत आहेत. अनेक रुग्ण चाचण्या न केलेले असतात. करोनाच्या चाचण्या केल्यानंतर ते पॉझिटीव्ह असल्याचे दिसून येतात. या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे नसल्याने त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
संसर्ग नियंत्रणात राहण्यासाठी
- मास्कचे निर्बंध सैल केले असले, तरीही स्वतःचा आणि इतरांचाही करोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा
- ताप, सर्दी खोकला तसेच इतर कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसताच त्वरित चाचणी करून घ्यावी
- करोना संसर्गाचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावी
- लसीकरण पूर्ण केले नसल्यास ते करून घ्यावे
- बूस्टर मात्रा चुकवू नये
- शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणांमध्ये जाऊ नये
- रुग्णालय, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा
या करोना संसर्गाचा फैलाव कोणत्या प्रकारे होतो, याकडे अभ्यासकांचे लक्ष आहे. करोनासंसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा फैलाव हा शहराकडून ग्रामीण भागाकडे, त्यानंतर तो ग्रामीण भागातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये झाला होता. मागील आठवड्यात पुणे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसून येत होती.
या आठवड्यात ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ नव्हती, तिथे रुग्णसंख्येत वाढ कशी होते याकडे आरोग्यविभागाचे लक्ष लागले आहे. मुंबईमध्ये १२ ते १८ मे या कालावधीमध्ये १,००२ रुग्णांची वाढ झाली होती. १९ ते २५ मे या कालावधीमध्ये १,५३१ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. हे प्रमाण ५२.७९ टक्के इतके होते. याच कालावधीमध्ये पुणे येथे रुग्णसंख्येत ९.७३ टक्क्यांची घट दिसून आली. ठाण्यात ही २७.९२ टक्के इतकी रुग्णवाढ होती. पहिल्या पाच जिल्ह्यांध्ये झालेली रुग्णवाढ ही ३५.८६ टक्के असल्याचे आरोग्यविभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले होते. रुग्णवाढीचा वेग धीमा असून मृत्यूसंख्या वाढलेली नाही, असेही या माहितीवरून स्पष्ट होते.
विषाणूच्या उत्परावर्तित स्वरूपामुळे ही रुग्णवाढ आहे का? यादृष्टीने विचार केला जात असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी विशद केले. तर ही रुग्णवाढ काही आठवड्यांमध्ये पुन्हा कमी होईल, अशी शक्यता राज्याच्या मृत्युदर विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी वर्तवली. काही वेळा रुग्णसंख्येमध्ये वाढ होते व ती स्थिर राहून त्यानंतर ती खाली येते, तशाच प्रकारे मुंबईमध्ये रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. करोना रुग्णांना वैद्यकीय उपचार देणारे फिजिशिअन डॉ. यश पाटील यांनी ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांना सौम्य स्वरूपाचा ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसून येत आहेत. अनेक रुग्ण चाचण्या न केलेले असतात. करोनाच्या चाचण्या केल्यानंतर ते पॉझिटीव्ह असल्याचे दिसून येतात. या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे नसल्याने त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
संसर्ग नियंत्रणात राहण्यासाठी
- मास्कचे निर्बंध सैल केले असले, तरीही स्वतःचा आणि इतरांचाही करोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा
- ताप, सर्दी खोकला तसेच इतर कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसताच त्वरित चाचणी करून घ्यावी
- करोना संसर्गाचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावी
- लसीकरण पूर्ण केले नसल्यास ते करून घ्यावे
- बूस्टर मात्रा चुकवू नये
- शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणांमध्ये जाऊ नये
- रुग्णालय, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा