अ‍ॅपशहर

'त्या' राज्यांत करोना का वाढत नाही?; महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स करणार अभ्यास

देशात फक्त महाराष्ट्रातच एवढ्या झपाट्याने करोना वाढत असताना, निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये मात्र करोना वाढताना दिसत नाही.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 13 Apr 2021, 8:02 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम त्या राज्यात करोना का वाढत नाही? मंत्री अस्लम शेख यांचा सवाल


देशात फक्त महाराष्ट्रातच एवढ्या झपाट्याने करोना वाढत असताना, निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये मात्र करोना वाढताना दिसत नाही. त्यामुळे यासंदर्भात आम्ही टास्क फोर्सला अभ्यास करायला सांगतल्याची माहिती महाविकास आघाडीतील मंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी दिली.

वाचा: लॉकडाउनची तयारी पूर्ण; घोषणा कधी करायची यावर खल

राज्यात वाढत्या करोना संसर्गामुळे परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अशावेळी करोनाच्या या वाढत्या रुग्णसंख्येवर अस्लम शेख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सला याबाबत माहिती घेण्यास सांगितले असल्याची माहिती शेख यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आम्ही यासंदर्भात टास्क फोर्सला अभ्यास करायला सांगितले आहे. महाराष्ट्रातच का करोना संसर्ग वाढत आहे?ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तेथे का नाही? निवडणुका असलेल्या राज्यांत हजारोंच्या संख्येने प्रचार सभा होत आहेत. तरी देखील तिथे करोना संसर्ग कसा वाढत नाही, असा सवालही शेख यांनी केला.

वाचा: जूननंतर महावितरणची वीज आणखी महागणार?

दरम्यान, राज्यात रविवारी ६३ हजारांहून अधिक करोनारुग्णांची नोंद झाली. त्यामुळे दररोज ५० हजारांहून अधिक वाढत जाणाऱ्या करोना रुग्णांमुळे राज्यात लॉकडाउन लावण्याची स्थिती आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली. करोनाची साखळी तोडण्यासाठी किमान १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावणे गरजेचे असल्याचे मत टास्क फोर्सने व्यक्त केले आहे.

वाचा: रुग्णवाहिकांच्या तुटवड्यावर प्रशासनाचा 'असा' तोडगा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज