म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
निवडणुकीत समाधानकारक यश मिळवू न शकल्याने भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे तसेच काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम राजीनामा देण्याची भाषा करीत असताना मुंबईत स्वतःच्या मतदारसंघातील वॉर्ड देखील सांभाळू न शकणारे शिवसेनेची मंत्री का राजीनामा देत नाहीत, अशी विचारणा शिवसैनिकांकडूनच केली जात आहे.
मुंबई महापालिका निवडणुक शिवसेना नेतृत्वाने प्रतिष्ठेची बनवली होती. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या जाळ्याच्या सहाय्याने अपार मेहनत घेतली. मुंबईत २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ७५ जागा जिंकल्या होत्या. मात्र आता आघाडी घेत शिवसेनेने ७५ वरून ८४ जागांवर उडी मारली. शिवसेना क्रमांक एकचा पक्ष बनली तरी भाजपने ८२ जागा जिंकल्याने एकहातील सत्ता मिळवत मुंबईत शिवसेनेचा महापौर बसविण्याचे शिवसेना नेतृत्वाचे स्वप्न काहीसे अडचणीत आले आहे. त्यातही अपक्षांचे मत वळवत शिवसेना महापौर बनवेल असा विश्वास शिवसैनिकांना वाटत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर गिरगाव, मुलुंड, गोरेगाव, जोगेश्वरी या पट्ट्यात शिवसेनेने जो फटका खाल्ला आहे त्याकडे शिवसैनिक लक्ष वेधत आहेत. ज्या ठिकाणी पक्षाकडे पुरेसे संघटनेचे पाठबळ नव्हते तिथे भविष्यात संघटना वाढविण्यासाठी पक्षनेतृत्वाकडून प्रयत्न होतील. मात्र ज्या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री, राज्यमंत्री आहेत तिथे पक्षाला बसलेला धोका अत्यंत गंभीर असून त्याची जवाबदारी हे मंत्री का घेत नाहीत, राजीनामे का देऊ करीत नाहीत अशी विचारणा शिवसैनिक करीत आहेत. गोरेगाव मध्ये पक्ष कमकुवत पडल्याने तिथे विधानसभेला पराभव झाला होता, मग मधल्या दोन वर्षांत तिथे का लक्ष दिले गेले नाही, असा सवालही शिवसैनिक विचारत आहेत.
शिवसेनेच्या काही मंत्र्यांकडे उद्धव ठाकरे यांनी जिल्हा परिषदेचीही जवाबदारी सोपवली होती. जिल्हा परिषदेतही शिवसेनेला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे काम न करणाऱ्या मंत्र्यांना बाजूला करून पक्षासाठी झोकून देणाऱ्यांना मंत्रिपदे द्यावीत असा सूरही सर्वसामान्य शिवसैनिकांकडून आळवला जात आहे.
मुंबईत हवे ठाणे मॉडेल
राज्यात सर्वत्र लाट असताना ठाण्यामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकहाती ठाण्यात शिवसेनेची सत्ता आणली. शिवाय त्यांनी भाजपलाही पद्धतशीरपणे रोखले. त्यामुळे ठाण्यातील मॉडेल मुंबईत आणायला हवे होते, आता वेळ गेली असली तरी भविष्यात विधानसभेला तशाप्रकारची मोर्चेबांधणी करायला हवी असे मतही शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.
निवडणुकीत समाधानकारक यश मिळवू न शकल्याने भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे तसेच काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम राजीनामा देण्याची भाषा करीत असताना मुंबईत स्वतःच्या मतदारसंघातील वॉर्ड देखील सांभाळू न शकणारे शिवसेनेची मंत्री का राजीनामा देत नाहीत, अशी विचारणा शिवसैनिकांकडूनच केली जात आहे.
मुंबई महापालिका निवडणुक शिवसेना नेतृत्वाने प्रतिष्ठेची बनवली होती. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या जाळ्याच्या सहाय्याने अपार मेहनत घेतली. मुंबईत २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ७५ जागा जिंकल्या होत्या. मात्र आता आघाडी घेत शिवसेनेने ७५ वरून ८४ जागांवर उडी मारली. शिवसेना क्रमांक एकचा पक्ष बनली तरी भाजपने ८२ जागा जिंकल्याने एकहातील सत्ता मिळवत मुंबईत शिवसेनेचा महापौर बसविण्याचे शिवसेना नेतृत्वाचे स्वप्न काहीसे अडचणीत आले आहे. त्यातही अपक्षांचे मत वळवत शिवसेना महापौर बनवेल असा विश्वास शिवसैनिकांना वाटत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर गिरगाव, मुलुंड, गोरेगाव, जोगेश्वरी या पट्ट्यात शिवसेनेने जो फटका खाल्ला आहे त्याकडे शिवसैनिक लक्ष वेधत आहेत. ज्या ठिकाणी पक्षाकडे पुरेसे संघटनेचे पाठबळ नव्हते तिथे भविष्यात संघटना वाढविण्यासाठी पक्षनेतृत्वाकडून प्रयत्न होतील. मात्र ज्या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री, राज्यमंत्री आहेत तिथे पक्षाला बसलेला धोका अत्यंत गंभीर असून त्याची जवाबदारी हे मंत्री का घेत नाहीत, राजीनामे का देऊ करीत नाहीत अशी विचारणा शिवसैनिक करीत आहेत. गोरेगाव मध्ये पक्ष कमकुवत पडल्याने तिथे विधानसभेला पराभव झाला होता, मग मधल्या दोन वर्षांत तिथे का लक्ष दिले गेले नाही, असा सवालही शिवसैनिक विचारत आहेत.
शिवसेनेच्या काही मंत्र्यांकडे उद्धव ठाकरे यांनी जिल्हा परिषदेचीही जवाबदारी सोपवली होती. जिल्हा परिषदेतही शिवसेनेला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे काम न करणाऱ्या मंत्र्यांना बाजूला करून पक्षासाठी झोकून देणाऱ्यांना मंत्रिपदे द्यावीत असा सूरही सर्वसामान्य शिवसैनिकांकडून आळवला जात आहे.
मुंबईत हवे ठाणे मॉडेल
राज्यात सर्वत्र लाट असताना ठाण्यामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकहाती ठाण्यात शिवसेनेची सत्ता आणली. शिवाय त्यांनी भाजपलाही पद्धतशीरपणे रोखले. त्यामुळे ठाण्यातील मॉडेल मुंबईत आणायला हवे होते, आता वेळ गेली असली तरी भविष्यात विधानसभेला तशाप्रकारची मोर्चेबांधणी करायला हवी असे मतही शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.