म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढल्यास शंभर जागा मिळतील असा खात्रीलायक अंदाज शिवसेनेला आला असून पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा रेटा लावला आहे. त्यामुळे युती करण्यात मेहनत खर्ची घालण्यापेक्षा एकेक जागा निवडून आणण्याची रणनिती करण्यावर शिवसेनेने भर दिल्याचे कळते.
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी शिवसेना आणि भाजपाच्या जागा वाटपाच्या काही बैठका पार पडल्या असल्या तरी यामधून अद्याप काहीच निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातच युतीचा निर्णय होईल, असे दोन्ही बाजूकडून ठरविण्यात आले. मात्र त्यानंतर चर्चा पुढे सरकलेली नाही. महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना सर्वच राजकीय पक्षांनी सर्व्हे करून पक्षाच्या ताकदीचा अंदाज घेतला आहे. शिवसेनेलाही सर्व्हेतून १०० जागांच्या आसपास जागा मिळतील असा अंदाज आल्याचे कळते. तर दुसरीकडे पदाधिकाऱ्यांनीही स्वबळावर लढण्यासाठी रेटा लावला आहे.
भाजपसोबत युती झाली तर पडद्यामागून सुत्रे हलतील आणि मनसेच्या माध्यमातून भाजपकडून पाडापाडीचे राजकारण खेळले जाईल, अशी माहितीही शिवसेना नेतृत्वापर्यंत पोहोचविण्यात आली आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करून नुकसान करून घेण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढावे आणि नंतर युतीचा पर्याय आहेच, अशी शिवसेना नेतृत्वाची मानसिकता असल्याचे कळते.
मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढल्यास शंभर जागा मिळतील असा खात्रीलायक अंदाज शिवसेनेला आला असून पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा रेटा लावला आहे. त्यामुळे युती करण्यात मेहनत खर्ची घालण्यापेक्षा एकेक जागा निवडून आणण्याची रणनिती करण्यावर शिवसेनेने भर दिल्याचे कळते.
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी शिवसेना आणि भाजपाच्या जागा वाटपाच्या काही बैठका पार पडल्या असल्या तरी यामधून अद्याप काहीच निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातच युतीचा निर्णय होईल, असे दोन्ही बाजूकडून ठरविण्यात आले. मात्र त्यानंतर चर्चा पुढे सरकलेली नाही. महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना सर्वच राजकीय पक्षांनी सर्व्हे करून पक्षाच्या ताकदीचा अंदाज घेतला आहे. शिवसेनेलाही सर्व्हेतून १०० जागांच्या आसपास जागा मिळतील असा अंदाज आल्याचे कळते. तर दुसरीकडे पदाधिकाऱ्यांनीही स्वबळावर लढण्यासाठी रेटा लावला आहे.
भाजपसोबत युती झाली तर पडद्यामागून सुत्रे हलतील आणि मनसेच्या माध्यमातून भाजपकडून पाडापाडीचे राजकारण खेळले जाईल, अशी माहितीही शिवसेना नेतृत्वापर्यंत पोहोचविण्यात आली आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करून नुकसान करून घेण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढावे आणि नंतर युतीचा पर्याय आहेच, अशी शिवसेना नेतृत्वाची मानसिकता असल्याचे कळते.