अ‍ॅपशहर

स्पर्धेतून उद्योगाकडे झेप

आजच्या तरुण पिढीतून उद्याचे उद्योजक घडावेत, या हेतूने विलेपार्लेच्या पार्ले टिळक विद्यालय असोशिएशनच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटतर्फे ‘विंग्स ऑफ व्हिजन’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात कमालीची चुरस पाहायला मिळत असून, उद्योगाशी निगडीत अनेक कल्पना यानिमित्ताने स्पर्धकांनी परीक्षकांसमोर मांडल्या. शुक्रवारी या स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली तर आज, ​शनिवारी अंतिम फेरी होणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ याचा मीडिया पार्टनर आहे.

Maharashtra Times 13 Jan 2018, 4:00 am
कौन्तेय कुडतरकर, कार्तिक जाधव (कॉलेज क्लब रिपोर्टर ) मुंबई :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wings of vision competition
स्पर्धेतून उद्योगाकडे झेप


आजच्या तरुण पिढीतून उद्याचे उद्योजक घडावेत, या हेतूने विलेपार्लेच्या पार्ले टिळक विद्यालय असोशिएशनच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटतर्फे ‘विंग्स ऑफ व्हिजन’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात कमालीची चुरस पाहायला मिळत असून, उद्योगाशी निगडीत अनेक कल्पना यानिमित्ताने स्पर्धकांनी परीक्षकांसमोर मांडल्या. शुक्रवारी या स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली तर आज, ​शनिवारी अंतिम फेरी होणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ याचा मीडिया पार्टनर आहे.

सध्याच्या स्पर्धात्मक जगात स्पर्धकांच्या नवनवीन कल्पनांना योग्य ते मार्गदर्शन करताना परीक्षकांनी उद्योगाप्रति विद्यार्थ्यांची असलेली उपयुक्तता व निश्चयशक्ती जाणून घेतली. अनेक सादरीकरणांमध्ये परीक्षक व स्पर्धकांमध्ये खुला संवाद दिसून आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अनोख्या संकल्पनांचे कौतुक करताना त्यांच्या काही उणिवा परीक्षकांनी लक्षात आणून दिल्या.

'रिअॅलिटी एक्सेंज', 'ऑनलाइन वेबसाइट', 'इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड' यांसह विविध प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी सादर केले. आजच्या स्टार्टअप स्पर्धेत आपली उद्योग संकल्पना सत्यात उतरू शकेल का? उतरल्यास त्याचे भविष्य काय? या प्रश्नांसह व्यवसायासाठी आर्थिक गणित जुळवताना येणाऱ्या विविध अडचणींची जाणीव या निमित्ताने परीक्षकांनी विद्यार्थ्यांना करून दिली. या स्पर्धेत पार्ले टिळक संस्थेशी निगडीत डहाणूकर, साठ्ये, एम.सी.सी. व मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट या कॉलेजांमधील ५१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेबद्दल ज्येष्ठ उद्योजिका डॉ. ज्योती गोगटे म्हणाल्या की, ‘तरुणांचे विचार खूपच नावीन्यपूर्ण आहेत. पण काही उणिवांमुळे त्यांना पुढे जाताना अडचण येत आहे. त्यांच्या या उणिवा जाणून घेऊन योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते या क्षेत्रात नक्कीच यशस्वी कामगिरी करतील.’

मान्यवरांची उपस्थिती

आज स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार असून, परीक्षक म्हणून प्रसिद्ध उद्योजक डॉ. विठ्ठल कामत, उमेश श्रीखंडे, मोहन टांकसाळे, अर्थतज्ज्ञ दीपक घैसास व डॉ. ज्योती गोगटे उपस्थित राहणार आहेत. तसेच बी. एस. नागेश यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहेत.

तरुणांचा नोकरीकडे असलेला कल उद्योगाकडे वळावा हा या स्पर्धेचा मूळ हेतू आहे. सध्या शिक्षणासोबत तंत्रज्ञानाची साथ विद्यार्थ्यांकडे आहेच, सोबत सरकारची या क्षेत्रातील धोरणेही सकारात्मक आहेत. केवळ गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.

- सुचेता पवार, सीओईआय हेड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज