नागपूरमध्ये उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
naresh.kadam@timesgroup.com
Tweet : @nareshkadamMT
मुंबई : नगरपालिकेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत मुसंडी मारल्याने विधिमंडळाच्या नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. तर, राज्यातील सत्तेत दोन वर्षे पूर्ण झालेल्या भाजप- शिवसेना युती सरकारला कोंडीत पकडण्याची संधी असतानाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांना अंतर्गत वादाने घेरले आहे. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला ५ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या मैदानावर हे अधिवेशन होत आहे. त्यात नगरपालिकेत मिळालेला विजय यामुळे त्यांच्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागत असतानाच, काँग्रेस नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले. नारायण राणे यांच्या विधानसभा मतदारसंघातील मालवण नगरपालिकेत काँग्रेसचा पराभव झाला, त्यामुळे राणे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरच टीका केली. या टिकेला अशोक चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले. हा वाद संपत नाही तोच अहमदनगर जिल्हयातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चव्हाटयावर आला आहे. थोरात यांनी, विखे यांच्यावर सत्तारुढ पक्षाशी सलगी करत असल्याचा आरोप केला आहे. तर, विखे यांनीही, जिल्हयात संगमनेरपलीकडे पक्ष वाढविण्यासाठी काही केले आहे का, असा सवाल थोरात यांना केला. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांना त्यांच्या इस्लामपूर नगरपालिकेत पराभव पत्करावा लागला आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमधील नवाब मलिक आणि संजय पाटील यांच्यातील हाणामारी झाली. नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले नाही. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करुन परळी नगरपालिका जिंकली ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे.
naresh.kadam@timesgroup.com
Tweet : @nareshkadamMT
मुंबई : नगरपालिकेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत मुसंडी मारल्याने विधिमंडळाच्या नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. तर, राज्यातील सत्तेत दोन वर्षे पूर्ण झालेल्या भाजप- शिवसेना युती सरकारला कोंडीत पकडण्याची संधी असतानाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांना अंतर्गत वादाने घेरले आहे. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला ५ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या मैदानावर हे अधिवेशन होत आहे. त्यात नगरपालिकेत मिळालेला विजय यामुळे त्यांच्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागत असतानाच, काँग्रेस नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले. नारायण राणे यांच्या विधानसभा मतदारसंघातील मालवण नगरपालिकेत काँग्रेसचा पराभव झाला, त्यामुळे राणे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरच टीका केली. या टिकेला अशोक चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले. हा वाद संपत नाही तोच अहमदनगर जिल्हयातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चव्हाटयावर आला आहे. थोरात यांनी, विखे यांच्यावर सत्तारुढ पक्षाशी सलगी करत असल्याचा आरोप केला आहे. तर, विखे यांनीही, जिल्हयात संगमनेरपलीकडे पक्ष वाढविण्यासाठी काही केले आहे का, असा सवाल थोरात यांना केला. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांना त्यांच्या इस्लामपूर नगरपालिकेत पराभव पत्करावा लागला आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमधील नवाब मलिक आणि संजय पाटील यांच्यातील हाणामारी झाली. नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले नाही. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करुन परळी नगरपालिका जिंकली ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे.