म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मध्य रेल्वेवरील सेवाविस्तारामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली असतानाच फुकट्या प्रवाशांची संख्याही वाढल्याचे दिसून आले आहे. गतवर्षीच्या एप्रिल ते जुलै या कालावधीच्या तुलनेत यंदा या चार महिन्यांत प्रवासी संख्या ५९ लाखांनी वाढली असून या कालावधीत फुकट्या प्रवाशांच्या संख्येतही ५० हजारांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. विनातिकीट प्रवाशांचे हे प्रमाण तब्बल १० टक्क्यांनी वाढले आहे.
एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये प्रवासी संख्या वाढण्यामागे हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार हा प्रमुख घटक ठरला आहे. त्याचप्रमाणे अतिवृष्टीने काही दिवस पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीवर झालेल्या परिणामातूनही या मार्गावर प्रवासी वाढले. मध्य रेल्वेवर एप्रिल ते जुलै २०१७ या कालावधीत ४८ कोटी ६८ लाख इतकी प्रवासी संख्या नोंदवण्यात आली होती. यावर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत ही संख्या वाढून ४९ कोटी २७ लाख एवढी झाली. गतवर्षी एप्रिल ते जुलैमध्ये पाच लाख सहा हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई झाली होती. ही संख्या यंदा ५ लाख ५८ हजार ९०० पर्यंत पोहोचली आहे. ही वाढ जवळपास दहा टक्के इतकी आहे.
महसूलवृद्धी
प्रवासी वाहतूक वाढल्याने तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातही काही प्रमाणात भर पडली आहे. गतवर्षी या चार महिन्यांच्या कालावधीत महसूल २५ कोटी ८३ लाख इतका होता, त्यातुलनेत यंदा या चार महिन्यांत उत्पन्न २७ कोटी ७९ लाख इतके झाले आहे. ही वाढ साधारण साडेसात टक्क्यांची आहे.
प्रवासी संख्या आणखी वाढणार
हार्बर सेवेचा विस्तार अंधेरीहून पुढे गोरेगावपर्यंत केल्याने प्रवासी वाहतुकीमध्ये वाढ झाली आहे. पण सध्या गोरेगावहून थेट सीएसएमटीपर्यंतच्या सेवांची संख्या मर्यादित स्तरावर आहे. त्या संख्येत ऑक्टोबरपासून वाढ करण्याचे संकेत दिले जात आहेत. या फेऱ्या वाढल्या की प्रवासी संख्या आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
मध्य रेल्वेवरील सेवाविस्तारामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली असतानाच फुकट्या प्रवाशांची संख्याही वाढल्याचे दिसून आले आहे. गतवर्षीच्या एप्रिल ते जुलै या कालावधीच्या तुलनेत यंदा या चार महिन्यांत प्रवासी संख्या ५९ लाखांनी वाढली असून या कालावधीत फुकट्या प्रवाशांच्या संख्येतही ५० हजारांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. विनातिकीट प्रवाशांचे हे प्रमाण तब्बल १० टक्क्यांनी वाढले आहे.
एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये प्रवासी संख्या वाढण्यामागे हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार हा प्रमुख घटक ठरला आहे. त्याचप्रमाणे अतिवृष्टीने काही दिवस पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीवर झालेल्या परिणामातूनही या मार्गावर प्रवासी वाढले. मध्य रेल्वेवर एप्रिल ते जुलै २०१७ या कालावधीत ४८ कोटी ६८ लाख इतकी प्रवासी संख्या नोंदवण्यात आली होती. यावर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत ही संख्या वाढून ४९ कोटी २७ लाख एवढी झाली. गतवर्षी एप्रिल ते जुलैमध्ये पाच लाख सहा हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई झाली होती. ही संख्या यंदा ५ लाख ५८ हजार ९०० पर्यंत पोहोचली आहे. ही वाढ जवळपास दहा टक्के इतकी आहे.
महसूलवृद्धी
प्रवासी वाहतूक वाढल्याने तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातही काही प्रमाणात भर पडली आहे. गतवर्षी या चार महिन्यांच्या कालावधीत महसूल २५ कोटी ८३ लाख इतका होता, त्यातुलनेत यंदा या चार महिन्यांत उत्पन्न २७ कोटी ७९ लाख इतके झाले आहे. ही वाढ साधारण साडेसात टक्क्यांची आहे.
प्रवासी संख्या आणखी वाढणार
हार्बर सेवेचा विस्तार अंधेरीहून पुढे गोरेगावपर्यंत केल्याने प्रवासी वाहतुकीमध्ये वाढ झाली आहे. पण सध्या गोरेगावहून थेट सीएसएमटीपर्यंतच्या सेवांची संख्या मर्यादित स्तरावर आहे. त्या संख्येत ऑक्टोबरपासून वाढ करण्याचे संकेत दिले जात आहेत. या फेऱ्या वाढल्या की प्रवासी संख्या आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.