मुंबई: नाशिक येथे दाखल एफआयआर प्रकरणात पुढील सुनावणीपर्यंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी आज मुंबई हायकोर्टात दिली. ( Narayan Rane HC Plea Latest Update ) वाचा: तर नारायण राणे आता बोलणार नाहीत!; चंद्रकांत पाटील यांनी केलं मोठं विधान
नारायण राणे यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल तिन्ही एफआयआरना आव्हान देणारी याचिका आज मुंबई हायकोर्टात केली. राणेंचे वकील अॅड. अनिकेत निकम यांनी यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यावर न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने सरकारी वकिलांना याचिकेची प्रत सरकारी वकील कार्यालयात मिळाली आहे की नाही, याची खातरजमा करण्यास सांगून दुपारी अडीच वाजता माहिती देण्यास सांगितले होते. ही माहिती देण्यात आल्यानंतर याचिकेवर सुनावणी घेण्यात आली असता राणे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
वाचा: विनायक राऊत यांच्या बंगल्यावर सोडा बॉटल फेकल्या; 'ते' हल्लेखोर कोण?
नाशिक येथील एफआयआर प्रकरणात पुढील सुनावणीपर्यंत नारायण राणे यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही. तोपर्यंत राणे यांच्याकडून अशी कोणतीही आक्षेपार्ह विधाने होऊ नयेत जेणेकरून आम्हाला कारवाई करणे भाग पडेल, असे म्हणणे राज्य सरकारतर्फे मांडण्यात आले. मात्र, अशी कोणतीही हमी देता येणार नाही, कारण तसे केल्यास याचिकादाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखे होईल, असा युक्तिवाद राणे यांच्यातर्फे अॅड. सतीश मानेशिंदे यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने याप्रकरणी पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला ठेवली आहे. इतर एफआयआरनाही याचिकेत आव्हान देता यावे यासाठी याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभाही खंडपीठाने राणे यांच्या वकिलांना दिली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नाराय राणे यांना मंगळवारी रत्नागिरीतील संगमेश्वर येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री त्यांना महाड येथील कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने जामीन मंजूर केला. राणे यांच्याविरुद्ध नाशिक, पुण्यासह आणखीही काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असून या सर्व गुन्ह्यांना आव्हान देणारी याचिका राणे यांनी हायकोर्टात केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली असता राणे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे राणे यांच्या विधानाचे तीव्र पडसाद काल राज्यात उमटले. त्यातून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष उफाळून आला. अद्याप हा तणाव निवळलेला नाही. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
वाचा: तणाव निवळेना; भाजपच्या आंदोलनात ठाकरे-पवारांविरुद्ध आक्षेपार्ह घोषणा
नारायण राणे यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल तिन्ही एफआयआरना आव्हान देणारी याचिका आज मुंबई हायकोर्टात केली. राणेंचे वकील अॅड. अनिकेत निकम यांनी यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यावर न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने सरकारी वकिलांना याचिकेची प्रत सरकारी वकील कार्यालयात मिळाली आहे की नाही, याची खातरजमा करण्यास सांगून दुपारी अडीच वाजता माहिती देण्यास सांगितले होते. ही माहिती देण्यात आल्यानंतर याचिकेवर सुनावणी घेण्यात आली असता राणे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
वाचा: विनायक राऊत यांच्या बंगल्यावर सोडा बॉटल फेकल्या; 'ते' हल्लेखोर कोण?
नाशिक येथील एफआयआर प्रकरणात पुढील सुनावणीपर्यंत नारायण राणे यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही. तोपर्यंत राणे यांच्याकडून अशी कोणतीही आक्षेपार्ह विधाने होऊ नयेत जेणेकरून आम्हाला कारवाई करणे भाग पडेल, असे म्हणणे राज्य सरकारतर्फे मांडण्यात आले. मात्र, अशी कोणतीही हमी देता येणार नाही, कारण तसे केल्यास याचिकादाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखे होईल, असा युक्तिवाद राणे यांच्यातर्फे अॅड. सतीश मानेशिंदे यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने याप्रकरणी पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला ठेवली आहे. इतर एफआयआरनाही याचिकेत आव्हान देता यावे यासाठी याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभाही खंडपीठाने राणे यांच्या वकिलांना दिली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नाराय राणे यांना मंगळवारी रत्नागिरीतील संगमेश्वर येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री त्यांना महाड येथील कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने जामीन मंजूर केला. राणे यांच्याविरुद्ध नाशिक, पुण्यासह आणखीही काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असून या सर्व गुन्ह्यांना आव्हान देणारी याचिका राणे यांनी हायकोर्टात केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली असता राणे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे राणे यांच्या विधानाचे तीव्र पडसाद काल राज्यात उमटले. त्यातून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष उफाळून आला. अद्याप हा तणाव निवळलेला नाही. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
वाचा: तणाव निवळेना; भाजपच्या आंदोलनात ठाकरे-पवारांविरुद्ध आक्षेपार्ह घोषणा