अ‍ॅपशहर

Maharashtra Politics: शिंदेंच्या बंडानंतर भाजपने पहिला डाव टाकला, आमदारांना दिले आदेश

Devendra Fadnavis Meeting in Mumbai: राज्यातील महाविकास आघाडीमधील बंडाच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने देखील हलचाली सुरू आहेत. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत पाहा काय निर्णय झाला.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jun 2022, 12:24 pm
मुंबई: राज्यातील उद्धव ठाकरे सरकारवरील संकट अधिक गडद होत चालले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जवळ जवळ ४० आमदारांच्या बंडाला सामोरे जावे लागत आहे. अशात भाजपने देखील हलचाली सुरू केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करण्याच्या हलचाली सुरू केल्या असून भाजपने त्यांच्या १०५ आमदारांना एक महत्त्वाचा आदेश दिलाय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस


सत्तासंघर्षात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करोनाची लागण झाल्याने महाविकास आघाडी सरकार समोरच्या अडचणीत वाढ झाली आहे. सत्ताधारी गटात सुरू असलेल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने त्यांच्या आमदारांना संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीहून मुंबईत दाखल झाले असून सागर बंगल्यावर त्यांची बैठक झाली असून तेथूनच पक्षाच्या सर्व आमदारांना आदेश पाठवण्यात आलेत. पक्षाच्या आमदारांना कोणत्याही क्षणी मुंबईला यावे लागू शकते, असे आदेशात म्हटले आहे.

वाचा- एकनाथ शिंदे यांनी टाकला मोठा बॉम्ब; थेट उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले...

दरम्यान, एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी होत असताना दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी ट्विट करून या सत्तासंघर्षात सेनेचा पराभव झाल्याचे मान्य केले आहे. राऊतांनी ट्विट करून, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने.. असे म्हटले आहे. त्याआधी आदित्य ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावरील बायोमधून मंत्रीपद काढून टाकले होते.

वाचा-काय सांगतोय पक्षांतरबंदी कायदा

नाराज आमदारांसह गुवाहाटी शिंदे यांनी आपल्यासोबत ४५ आमदार असल्याचा दावा केलाय. मी कोणाच्या विरोधात बोललो नाही किंवा अशी कोणतीही गोष्ट केली नाही जी चुकीची आहे. तरी देखील मला गटनेतेपदावरून हटवले, माझे पुतळे जाळले, माझ्याविरोधात आंदोलन करत आहेत आणि मला बदनाम केले जात आहे, हे योग्य नसल्याचे शिंदे म्हणाले.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख